नवीन लेखन...

शैक्षणिक

स्त्रियांची सखी : शतावरी

‘शतावरी’ ही एक उत्तम औषधी वनस्पती असून ती काटेरी झुपकेदार वेल स्वरूपात असते. कडू-गोड चवीची, शीतवीर्य असलेल्या शतावरीची मुळे व पाने औषध म्हणून वापरली जातात. शतावरीचा उपयोग स्त्रियांच्या लैंगिक इच्छाशक्तीत वाढ होणे, बाळंतपणातील अशक्तपणा दूर करण्यासाठी, दूध वृद्धीसाठी व प्रजोत्पादनासाठी होतो. […]

अपंगांच्या समस्या सुटल्या प्रेरणेतून

अनेक वर्ष दुःखात, दारिद्र्यात, अज्ञानात असलेल्या समाजाला त्या त्यावेळी त्या त्या व्यक्तींनी प्रेरणाची पायवाट निर्माण केल्यामुळेच समाज त्यातून बाहेर येऊ शकला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज यांच्यामुळे आज खितपत पडलेला समाज यशाची मजल गाठू शकलां. […]

नशिबाची व्याख्या

नशिबाची मुळ व्याख्या समजावुन देण्याचा प्रयत्न… आपण मानव म्हणुन जन्मलो हेच आपलं मोठं नशिब आहे. करोडो रुपयाचे शरीर फुकट मिळाले… हे आपलं नशिब आहे.. फुकटात प्राणवायु मिळाला हे पण आपलं नशिब आहे… आभाळातून पडणारं पाणी हे पण आपलं नशिब आहे. […]

अरण्यातील ‘लाल सोनं’ : रक्त चंदन

रक्त चंदन म्हटले की बहुतेक जणांना चंदनाचाच प्रकार असावा, असे वाटते. परंतु खूप कमी लोकांना याची माहिती असल्याने येथे आवर्जून त्याची माहिती द्यावीशी वाटते. सफेद चंदनाचे फेसपॅक, अगरबत्ती, किंवा औषधी गुणधर्म सर्वानाच परिचित आहेत. परंतु रक्त चंदन आणि सफेद चंदन यात जमीन अस्मानाचा फरक आहे. तो कसा ते आपण जाणून घेऊ यात. […]

रूट कॅनल – एक माहिती

आपल्या दातांना आपले आरोग्य व सौंदर्याचा आरसा मानला जातो. मात्र बहुतेक जणांना कमी वयातच दातांच्या दुखण्याला सामोरे जावे लागत असते. दात व तोंड व्यवस्थित स्वच्छ न करणे हेच दातांच्या दुखणामागील प्रमुख कारण असते. दातांच्या अस्वच्छतेमुळे होणाऱ्या आजाराला पायोरिया असे म्हटले जाते. तोंडाची दुर्गंधी, हिरड्यांमधून रक्त येणे, दात दुखणे, दात ठिसूळ होणे अशी या आजाराची लक्षणे आहेत. […]

जातिभेदाला पहिली थप्पड

जुन्या मुंबईत चहाचे हॉटेल आणि पाव-बिस्कुटाची बेकरी हे दोन धंदे प्रामुख्याने भंडारी लोकांच्या हातांत होते. सबंध मुंबईला ब्रेड, पाव, लिमजी बिस्किटे या भंडारी बेकऱ्याच पुरवीत असत आणि गोऱ्या लोकांच्या खाणवळीतही त्या ब्रेड पावांची लज्जत वाखाणली जात असे. काही भंडारी हॉटेलात चहाशिवाय मांसाहाराची फार चोखट सोय असे आणि अशी तीन-चार जुन्यांतली जुनी भंडारी हॉटेले कोटांत नि गिरगांवात अजून चालू आहेत. भंडारी हॉटेलातच चहा मिळत असल्यामुळे, बामणांची पंचाईत व्हायची. […]

अनुभव वास्तुतज्ज्ञाचे

व्यवसायातले अनुभव म्हणजे एक प्रकारचे शिक्षणच आहे. म्हणतात ना, अनुभवातून माणूस शिकतो, सावरतो, कधी शहाणपण येते तर कधी सर्किटही बनतो, मात्र संवेदना जागृत होऊन सिंहावलोकन ही करता येते आयुष्याचे.. […]

चहाची गाथा

चहा म्हणजे ना, आपला वीक पॉईंट. अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत चहा लागतो असं नाही म्हणता येणार, कारण परदेशातील लोकांप्रमाणे रात्री जेवणानंतर चहा पिण्याची फॅशन अजून तरी आपण स्वीकारलेली नाही. पण चहाचं नाव जरी काढलं ना तरी चहाचा एक तरी घोट पोटात जावा म्हणून आपण धडपडू लागतो आणि तो ग्रहण केल्यावर अगदी तृप्त झाल्यासारखं वाटतं. चहा मिळाली नाही तर आपण किती अस्वस्थ होतो, नाही का? सकाळी उठल्यावर अंघोळ नाही करता आली तर चालेल, पण चहा पाहिजे. […]

गोव्यातील बामण भट

सोळाव्या शतकात पोर्तूगिजांनी त्या काळच्या गोव्याच्या १३४ गावातील हजारभर देवळे नेस्तनाबूत केली. या देवळात सेवा देणारे पुजारी, पुराणिक, अभिषेकी या भटांना (पुरोहितांना) गोव्यातून हाकलून लावले. त्याकाळी या भटांच्या ताब्यात उत्पन घेऊन निर्वाहासाठी दिलेल्या देवतेच्या मालकीची चांगल पिक देणीरी जमीन/बागायती होती. […]

1 6 7 8 9 10 167
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..