नवीन लेखन...

शैक्षणिक

जगातील निरनिराळ्या कालगणना पध्दती

जगातील निरनिराळ्या देशात आणि धर्मात, कालगणना करण्याच्या आपापल्या पध्दती आहेत. हजारो वर्षापासून त्या पध्दतींनी प्रत्येक दिवसाची तिथी ठरविली जाते. बव्हंशी, या कालगणनेची सुरूवात, एखाद्या धर्मसंस्थापकाच्या, एखाद्या महापुरूषाच्या, सत्तासम्राटाच्या किंवा युगपुरूषाच्या  जन्मतिथीशी निगडीत असते.  एखादी पवित्र घटना किंवा युध्दातला मोठा विजय स्मरणात रहावा म्हणूनही एखादी कालगणनपध्दती सुरू केली जाते.
[…]

शेवाळ्यापासून प्रथिन समृद्ध अन्न !

मानवाने निसर्गावर सातत्याने केलेल्या कुरघोडीने ऋतुमानात बदल होत आहेत. कुठे जास्त पाऊस पडून ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होते तर काही ठिकाणी पाऊस कमी पडून कोरडया दुष्काळाचा सामना करावा लागतो आहे. पाण्यासाठी गावकऱ्यांना दाहीदिशा भटकंती करावी लागते.
[…]

नाशिकचे ऐतिहासिक संग्रहालय

प्रत्येक शहराला व गावाला एक ऐतिहासिक वारसा असतो. त्यातून त्या शहराचे ,गावाचे ऐतिहासिक महत्व लक्षात येते. असे म्हणतात की नाशिक शहराचा इतिहास हा फार जुना म्हणजे ६० हजार वर्षापूर्वीचा आहे. या कालावधीतील काही महत्वपूर्ण इतिहास नाशिकच्या श्री व्यास रिसर्च सेंटरचे श्री दिनेश वैदय , श्रीदेवेन कापडणीस , श्रीमती अनिता जोशी यांच्या प्रयत्नामुळे एका छताखाली पहावयास‍ मिळणार […]

विचार आंबेडकरी जलशांचा

अलीकडील काळात कुटुंब नियोजन, दारुबंदी, निर्मलग्राम, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम आणि मुली वाचवा अभियानातील संदेशही जनतेपर्यंत पोहचवला. त्यामुळे आजही हे आंबेडकरी जलशे समाज प्रबोधनात निश्चितच अग्रेसर आहेत यात दुमत नाही. […]

माझी चेन्नई सफर

माझा हा चेन्नई प्रवास साधारणपणे २७ तासांचा होता व गेली कित्येक वर्षे मी इतक्या लांबवरचा प्रवास केलेला नसल्यामुळे हे २७ तास कसे पार पडणार याबद्दल शंकाच होती. त्यात हा दक्षिणेकडचा प्रदेश अगोदरच मिळालेल्या ब-या-वाईट अशा ब-याच मत-मतांतरांमुळे मनात उगीचच घर करून बसलेला. परंतु चिरंजीवांना भेटण्याच्या निमित्ताने व आनंदात नवीन प्रदेश पहावयास मिळणार असल्यामुळे दुःखापेक्षा सुखच अधिक वाटत होते
[…]

शिक्षा पद्धती – एक दृष्टीक्षेप

आधुनिक शिक्षा शास्त्रज्ञांना एक महत्वाचा प्रश्न सतावीत असतो की, जुन्या काळच्या शिक्षा नवीन गुन्हेगारांनादेखील चालू ठेवणे योग्य ठरेल का? त्यात आवश्यक बदल करता येतील का? बदल कोणत्या प्रकारच्या गुन्हेगारांना करता येईल? गुन्हेगारांना समाजाच्या मुख्य प्रवाहात कशा प्रकारे सामील करावे आणि त्यांचा गुन्हेगारीचा डाग नाहीसा करून ते समाजाचे चांगले घटक कसे बनतील?
[…]

हवामानशास्त्र……..

सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात इतर अनेक महत्त्वाची शास्त्रे सर्वसामान्य विद्यार्थ्यांकडून दुर्लक्षित झालेली दिसतात. मात्र माहिती तंत्रज्ञानाची जोड या अनेक शास्त्रांना मिळाली आणि या प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग सकारात्मकपणे केला तर ते मानवी जीवनासाठी उपयुक्त ठरते, हे हवामानशास्त्राद्वारे सिद्ध झाले आहे. सुनामी किंवा चक्रीवादळ, अतिपर्जन्यवृष्टी या सारख्या आपत्ती उद्भवण्यापूर्वीची सूचना सहज मिळते. याचे कारण म्हणजे प्रगत असे हवामानशास्त्र होय.
[…]

प्रथम ट्रस्ट, अलिबाग

अलिबागमधील प्रथम ट्रस्टने अशाच काही अभ्यासात मागे पडलेल्या मुलांना केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रथम आणण्याचा जणु विडाच उचलला आहे. अभ्यासाव्यतिरिक्त मुलांमधील अनेक पैलु हेरुन, त्यांच्यामधील जिद्दीला व आत्मविश्वासाला नवसंजीवनी देण्याचे महान कार्य ‘प्रथम’ अनेक वर्षांपासून रायगड जिल्हा परिषदेच्या काही शाळांमध्ये करत आहे. […]

नेत्याने अपयशावर कशी मात करावयाची?

श्री. कलाम म्हणतात, त्या दिवशी त्यांनी आपल्या आयुष्यातील एक मोठा धडा घेतला. ज्यावेळेस अपयश आले त्यावेळेस संस्थेचा अध्यक्ष म्हणून अध्यक्षांनी ते आपल्या शिरावर घेतले. परंतु ज्यावेळेस, यश पदरात पडले त्यावेळेस ते त्यांनी ते न घेता आपल्या संपूर्ण गटाला दिले. यावरून हे दिसून येते की, व्यवस्थापनाचे धडे हे पुस्तकात वाचून मिळत नसतात, तर ते अनुभवातून येत असतात.
[…]

1 149 150 151 152 153 155
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..