नवीन लेखन...

मराठी संस्कृती विषयक लेख

आठवणीतील दिवाळी..

माझ्या लहानपणीची दिवाळी खुप छान असायची. माझा लहानपण म्हणजे मला समजू लागल्यापासून समज येईपर्यंतचं वय. नेमकं सांगायचं म्हणजे ६८-६९ सालापासून ते ८०-८५सालापर्यंतचा काळ. मी तेंव्हा अंधेरी पूर्वेच्या पंपहाऊस येथील एका बैठ्या चाळीत राहायचो. तेंव्हा चाळीच असायच्या आणि दुसरा वर्ग थेट बंगला. बलाक, फ्लॅट अद्याप जन्मले नव्हते. आणि चाळीला चाळच म्हणत, ‘स्लम’ हा तुच्छतादर्शक शब्द अवतरला नव्हता. […]

दिवाळी आणि फटाके….!

भारतात सण आणि उत्सवांचा एक वेगळा इतिहास आहे आणि त्यात दिवाळीचा सण वेगळा नाही. दिवाळी साजरी करण्याची परंपरा प्राचीन काळा पासून चालत आली आहे. दिवाळीचा आणि फटाक्यांच्या तसं बघता काही जवळचा संबंध नाही. तरीही काही काळापासून दिवाळीत फटाके उडवले जातात फोडले जातात. बर दिवाळीतच फोडले जातात म्हंटल तर तसंही नाही कुठल्याही आनंदाच्या क्षणी फटाके फोडून तो साजरा केला जातो पण त्यामुळे ध्वनी आणि वायू प्रदूषण होते हे आनंदाच्या भरात आपल्या लक्षात येत नाही. […]

घटस्फोट टाळणारी प्रश्नपत्रिका…?

लग्नासारखे पवित्र संस्काररूपी बंधन झुगारून कित्येक संसार घटस्फोटाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज करण्यापूर्वी पती-पत्नीला एकमेकांना समजून घेण्याचा सल्ला दिला जातो. लग्न टिकविण्याचे प्रयत्न केले जातात आणि त्यातून काही निष्पन्न झालं नाही के मग घटस्फोटासाठी न्यायालयीन प्रक्रिया सुरु होते. […]

दिन दिन दिवाळी…!

दिन दिन दिवाळी शब्द कानी पडती आली आली दिवाळी ! खमंग रुचकर स्वाद काय पदार्थांच्या लगबगी बनविण्या गृहिणी सजती ! नटण्याची हौस किती चारचौघीत उठून दिसण्या पैठणी झुलती अंगावरी ! मुलींची लगबग रांगोळीसाठी तर्हे तर्हेचे रंग किती? रंगसंगती किचकट भारी ! घाई कंदिलासाठी मुलांची पंचकोनी का षटकोनी पारंपरिकच बरा दिसे ! गोवत्स द्वादशी दिन गोवत्साचे पूजन […]

आली दिवाळी – धनत्रयोदशी

आज धनत्रयोदशी. पारंपारीक दिवाळीचा दुसरा दिवस. धनाची पूजा करण्याचा हा दिवस. दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरू झालेला कापणीचा हंगाम ओसरत आलेला असतो. शेतकऱ्याच्या खळ्यात धान्याच्या राशी लागलेल्या असतात. शेतकयांच्या नजरेतून खळ्यातल्या धान्याच्या राशी हेच त्यांचे धन..! ‘धान्य’ या शब्दातूनच ‘धन’ शब्दाचा जन्म झाला असावा, उगाच नाही ‘धन-धान्य’ हा जोडशब्द तयार झाला. आणि आज पैसा जे विनिमयाचं काम करतो, तेच काम पूर्वी ‘धान्य’ करायचं. म्हणजे बार्टर एक्स्चेंजच्या काळात धान्य हे महत्वाचं धन असायचं. […]

विझलेल्या दिव्याची महती

अंधार आहे म्हणून प्रकाशाला किंमत आहे. वेदना आहे म्हणून आनंदाला महत्व आहे. प्रकाश हा अंधारातून जन्म घेतो. म्हणून विझलेला दिवासुध्दा आपण पहायलाच हवा तरच तेजोमय दिव्याचे महत्त्व कळेल. […]

आली दिवाळी – वसुबारस

वर्षभर ज्या सणाची आतुरतेने वाट पाह्यची सवय लहाणपणापासुनच लागलेली आहे, तो दिवाळसण आजपासून सुरु झाला. यंदा गणपती, नववरात्राप्रमाणे दिवाळीवरही पावसाची सावट असल्याने आणि फटाक्यांमुळे होऊ शकणाऱ्या प्रदुषणाचा बागलबोवा उगाचंच उभा केला गेला असल्यामुळे थोडासा हिरमोड झाला हे खरं असलं तरी उत्साह मात्र कणभरही कमी झालेला नाही. परिस्थिती नैसर्गिक असो वा मानव निर्मित, सणांची राणी असलेल्या दिवाळीचं स्वागत तिच्या इतमामाने, पारंपारीक पद्धतीनेच केलं पाहिजे हे माझं आग्रहाचं मत आहे, मग पाऊस काही करो आणि कायदा काही म्हणो. दिवाळी हा कृषी संस्कृतीतला सण असल्याने या दिवसांत पाऊस हा असायचाच कारण शेतीचा तो अविभाज्य भाग आहे, पण या सणात कायद्याची लुडबूड मात्र अनाकलनीय आहे. असो, आपण आपला सण पारंपारीक पद्धतीनेच साजरा करावा असं मला वाटतं, क गाढव असतो..! […]

आली दिवाळी..

गणपती गेल्यानंतर वेध लागतात ते नवरात्राचे व त्यानंतर येणाऱ्या दसरा दिवाळीचे..दुकाने नविन कपड्यांनी सजू लागतात, सेल सुरू होतात..वर्तमानपत्रांत इलेक्ट्रॉनिक वस्तू, गाड्यांच्या मोठमोठ्या जाहीराती प्रसिद्ध होऊ लागतात अन् चाहुल लागते ती दिवाळीची..आणि दिवाळी म्हटलं की हटकून आठवतं ते अजरामर बालगीत– “दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी” […]

दसरा या सणाचे अनन्यसाधारण महत्त्व

हिंदूंचा एक प्रमुख सण असलेला दसरा (विजयादशमी) या सणाचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व आहे. दसरा शब्दाची एक व्युत्पत्ती दशहरा अशीही आहे. दश म्हणजे दहा आणि हरा म्हणजे हरल्या आहेत. दसर्‍याच्या आधीच्या नऊ दिवसांच्या नवरात्रात दाही दिशा देवीच्या शक्तीने भारलेल्या असतात. नियंत्रणात आलेल्या असतात, म्हणजेच दाही दिशांतील दिक्भव,गण इत्यादीं वर नियंत्रण आलेले असते, दाही दिशांवर विजय मिळालेला असतो. दुर्गानवरात्र संपल्यानंतर लगेच हा दिवस येतो; म्हणून याला ‘नवरात्रीच्या समाप्तीचा दिवस’ असेही मानतात.’ […]

आजचा राम

विजयादशमी. आपल्या साडेतिन मुहुर्तापैकी एक महत्वाचा मुहुर्त. श्रीरामाने रावणाचा वध केलेला दिवस. रामाने-रावणाचा केलेला वध म्हणजे चांगल्याने वाईटावर मिळवलेला विजय. या दिवशी अनेक ठिकाणी रावण दहनाचा कार्यक्रम मोठ्या धामधुमीत साजरा होतो. पण होतं काय, की आपण सर्वच या एका दिवसापुरते राम बनून छाती काढून चालत असतो; बाकीच्या दिवशी मात्र आपण साक्षात रावणही लाजेल अशी कृत्य उजळमाथ्याने करत असतो. उजळमाथ्याने याचा अर्थ अगदी उघडपणे, निर्लज्जपणे. कारण आपल्याला रामाचा चेहेरा धारण करायला आवडतं परंतू काम मात्र रावणाचं करायला आवडतं. […]

1 36 37 38 39 40 70
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..