पाकिस्तानात सत्ता कुणाचीही असो, पंतप्रधान किंवा राष्ट्रपती कुणीही असो, खरी सत्ता तर लष्कराचीच असते. पाकिस्तानी राष्ट्रपती किंवा पंतप्रधानापेक्षा पाक लष्कराचा सेनापती अधिक शक्तिशाली असतो. सध्या पाकिस्तानात निवडणुकांचे वातावरण आहे त्यामुळेच खरी राजवट कुणाची हा प्रश्न उद्भवला. निवडणुकीत जिंकून कुणीही येवो, सत्ता तर लष्कराचीच असणार आहे. तहिरुल कादरीसुध्दा दहा दिवसांतच गप्प झाले. पाकिस्तानमधील सर्वोच्च न्यायालयाने काही निर्णय जाहीर केले. […]
क आमेरिकेच्या वैद्यकीय मासिकांत, वैद्यकीय जीवशास्त्र Biomedical Science ह्याच्यावर आधारीत एक अहवाल वजा लेख वाचण्यांत आला. लेख मनोरंजक परंतु खुप माहीतीपर होता. […]
हैदराबाद बॉम्बस्फोटांत सांडलेले निरपराध्यांचे रक्त अद्याप सुकलेले नाही. आक्रोश आणि किंकाळ्या अद्याप थांबलेल्या नाहीत. पाकिस्तानी अतिरेक्यांनी श्रीनगरमधील ‘सीआरपीएफ’च्या कॅम्पवर १३/०३/२०१३ ला आत्मघाती हल्ला केला. ‘अतिथी देवो भव:’ ही भारताची संस्कृती आहे. मात्र, ती विश्वासघातकी अतिथीला लागू पडत नाही. भारताचा सतत द्वेष करणार्या, सतत भारताशी जमेल तेथे शत्रुत्व करणार्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांना मात्र पायघड्या घालत हे सरकार जाणार, हे अत्यंत आक्षेपार्ह आहे. […]
बांगलादेश आणि भारत या देशांत अस्वस्थता कशी नांदेल हे पाहणे हे पाकिस्तानी नेतृत्वाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. त्यामुळे बांगलादेशातील विद्यमान घडामोडींबाबत आपण अधिक सजग असणे गरजेचे आहे. गेले काही आठवडे त्या देशात साचलेल्या खदखदीचे रूपांतर धर्माध आणि निधर्मी शक्ती यांच्यातील संघर्षांत झाले असून या संघर्षांची झळ आपल्याला लागणार आहे. […]
मालदीव, श्रीलंकेतील अलीकडच्या घडामोडींच्या निमित्ताने शेजारी राष्ट्रांबाबतच्या भारताच्या अनाकलनीय धोरणाचा पुन्हा प्रत्यय आला. पाकिस्तान, चीनबरोबरची डोकेदुखी कायम असताना बांगला देश, नेपाळ आदी शेजार्यांशीदेखील आपण सुरळीत संबंध राखू शकत नाही याला कारणीभूत ठरतात आपली चुकीची गृहितके. फ्रान्सच्या अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर फ्रान्स्वा ओलॉद यांनी युरोपबाहेरील पहिल्या परदेश दौर्यासाठी भारताची निवड करावी, यावरून भारताबरोबरच्या संबंधांना तो देश किती महत्त्व देत आहे, ते कळते. […]
मी माझ्या नातवाला घेऊन मित्र गणपत पवार याचेकडे गेलो होतो. त्याचा नातू माझ्या नातवाशी समवयाचा. दोघेही एकाच कक्षेत शिकणारे. आम्ही दोघे मोठ्या झोपाळ्यावर ….. […]
ब्रह्मपुत्रा नदीवर भारत-चीन सीमेजवळच ‘ग्रेट बेंड’ येथे चीनकडून बांधल्या जाणार्या मोठय़ा धरणाबाबत भारताने आक्षेप घेतले आहेत. फराक्का येथील बॅरेजवरून भारताकडे वळवल्या जाणार्या पाण्याबाबत भारत आणि बांगलादेश यांच्यात वाद सुरूच आहेत. भारताकडून जास्त प्रमाणात पाणी वळवले जात असल्याचा आरोप बांगलादेशकडून होत आहे. […]
पाकिस्तानच्या तालावर नाचणार्या हुर्रियत परिषदेच्या नेत्यांना अफजलच्या फाशीचे हत्यार, राज्यात पुन्हा असंतोषाचा वणवा पेटवायला उपयोगी पडेल, असे वाटते. अफजल काही राष्ट्रभक्त नव्हता. तो देशद्रोही होता. पाकिस्तानातल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा तो सदस्य होता. संसदेवर हल्ला चढवून मोठ्या नेत्यांचे मुडदे पाडायचा कट त्याने रचलेला होता. पण हुर्रियतवाल्यांना मात्र तो नायक वाटत होता. […]
हैदराबादमध्ये आमदार असलेले अकबरूद्दीन ओवेसी यांनी आमदार असूनही आपण पाकिस्तानमध्ये असल्याप्रमाणेच
वक्तव्ये केली आहेत आणि त्यामुळे भारतातील लोकशाही धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लोकशाहीला धोका निर्माण होईल अशी वक्तव्ये हल्ली सर्रास केली जात आहेत. याला भाषण स्वातंत्र्य म्हणायचे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य? संविधानाने प्रत्येकाला स्वातंत्र्य दिले आहे, याचा अर्थ लोकशाही धोक्यात येईल, असे वक्तव्य करणे कितपत योग्य आहे. […]
जीवनातील अंतिम परंतु महान सत्य म्हणजेच “मृत्यू”. जो ह्या विश्वात आला तो एक दिवस जाणारच ह्यात तिळमात्र शंका नाही. ज्ञान असो वा विज्ञान आजपर्यंत तरी कुणीही मृत्यूच्या सत्यतेविषयी आक्षेप घेतला नाही. […]