नवीन लेखन...
नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

जातीयवाद आणि अस्पृश्यतेला मुठमाती

हल्ली वर्तमानपत्रात महिन्यातून एक-दोन तरी ठळक बातम्या येतात की जातीबाह्य विवाह केला म्हणून तसा विवाह करणाऱ्या मुला-मुलीला जिवंत जाळलं, ठार मारलं किंया मग त्या संपूर्ण कुटूंबाची लहान-मोठं न बघता जाहीर विटंबना केली.. हे सर्व आपल्याला वारशात नको असताना मिळालेल्या ‘जाती’मुळे होतं. जातींवर आधारीत समाजरचना हे जगात कदाचित आपल्याच देशाचं लाजीरवाणं वैशिष्ट्य असावं..आपल्या देशात जीव जन्माला येतो […]

गोष्ट धारावीच्या ‘काळ्या किल्ल्या’ची – (भाग दोन)

या कथेच्या पहिल्या भागात बघितलेला ‘काळा किल्ला’ जरी भौगोलिक दृष्टीने धारावीत असला तरी ‘धारावी किल्ला’ या नावाचा किल्ला हा चक्क ठाणे जिल्ह्यातील भाईंदर येथे असल्याचा उल्लेख सापडतो. या ठिकाणी ‘धारावी देवी’ असल्याचाही उल्लेख आहे. आता भाईंदरच्या या किल्ल्याचे नाव देवीवरून पडले की देवीवरून किल्ल्याचे नाव पाडले हे समजणे कठीण आहे. ‘काळा किल्ल्या’चे कागदोपत्री नाव ‘रीवाचा किल्ला’ […]

गोष्ट धारावीच्या ‘काळ्या किल्ल्या’ची – (भाग एक )

धारावी. आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी..या आक्राळ विक्राळ पसरलेल्या झोपडपट्टीच्या एका कोपऱ्यात मुंबईच्या इतिहासाचा मूक साक्षीदार असणारा एक ऐतिहासीक किल्ला आपलं अस्तित्व टिकवायला धडपडतोय. या किल्ल्याची बहुसंख्य ‘मुंबई आमची, नाही कोनाच्या बापाची’ म्हणणाऱ्यांना खबरही नसेल हे निश्चित..! इसवी सन १७३७ मध्ये उभारलेल्या या किल्ल्याचं नांव ‘फोर्ट रिवा किंवा रेवा’ असं असलं तरी पूर्वीपासून हा किल्ला ‘काळा किल्ला’ […]

सरकार आणि सौंदर्यदृष्टी !!

माझं काही कामानिमित्त फोर्ट-चर्चगेट परिसरात जाणं होतं..हा परिसरच मुळी माझ्यावर गारूड करतो..सीएसटी पासून रमत गमत चालत निघायचं, ते सरळ  काळ्या घोड्यापर्यंत. तिथून पुढे रिगलच्या दारात असलेल्या विलिंग्डन फाऊंटनला वळसा घालून, सायन्स इन्स्टिट्यूट उजव्या हाताला ठेवून, पुढे त्याच रस्त्याने पुढे उजव्या बाजूचा वळसा घेऊन युनिव्हर्सिटी,  हायकोर्टाची मागली बाजू धरून  चर्चगेटला यायचं आणि मग लोकलने  घराच्या दिशेने.. कित्येकदा […]

पोर्तूगीजांच्या मुंबईतील पाऊलखुणा, ‘गिरीजाघर’ आणि ‘पुराण’..

सोळाव्या शतकाच्या प्रारंभी मुंबईच्या इतिहासाच्या रंगमंचावर पोर्तुगीजांचा प्रवेश झाला आणि मुंबई खऱ्या अर्थाने जागतिक नकाशावर उगम पावायला सुरूवात झाली. शेवटचा गुजराथी सुलतान बहादूरशहा याने उत्तरेकडून मोगलांचे दडपण व दक्षिणेत वाढणारे पोर्तुगीजांचे आक्रमक सामर्थ्य या पेचातून अंशत: मोकळे होण्यासाठी सोळाव्या शतकाच्या मध्यावर मुंबई आणि वसई ही दोन समुद्राकाठची ठिकाणे पोर्तुगीजांच्या हवाली केली. सन १५३४ साली मुंबई पोर्तुगीजांच्या […]

मुंबईत अजूनही शिल्लक असलेल्या ब्रिटीशकालीन इतिहासाच्या खुणा..

आपला, आपल्या शहराचा व देशाचाही इतिहास आपल्याला माहित हवा..जे आपला भूतकाळ विसरतात त्यांना भविष्य क्षमा करत नाही हे अनेक विचारवंतांनी सांगून ठेवलंय.. मी मुंबईत जन्मलो, वाढलो व त्यामुळे मला सहाजीकच मुंबईच्या इतिहासात रस आहे आणि तो निर्माण करण्याचं काम केलं मुंबईच्या फोर्ट परिसराने.. मुंबईचा फोर्ट परिसर आपल्यावर गारूड करतोच..मग त्या इतिहासाचा मागोवा घेत गेलं की अनेक […]

मुंबईचा ‘फोर्ट’..

मुंबईच्या दक्षिण टोकावर असलेला ‘फोर्ट’ एरिया ज्याने पाहिला नाही त्यानं मुंबई पाहिली नाही असं म्हणायला हरकत नाही..किंबहूना, मुंबई हे संबोधन मुख्यत्वेकरून याच विभागाला लागू होतं असं म्हटलं तरी चुकणार नाही..फोर्टातले ते प्रशस्त रस्ते आणि फुटपाथ, त्या ब्रिटीशकालीन भव्य आणि देखण्या इमारती, प्रत्येक इमारतीला असलेला घाटदार घुमट वा उंचं मनोरा याची भुरळ न पडणारा विरळाच..! हा सारा […]

“बोला, मराठी बोला..”

“लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी..!” या ओळींचा आज महापूर येणार..आजचा मराठीचा ‘दिन’ केला की आपले कर्तव्य पार पाडले एवढीच त्यामागील भूमिका.. मराठीतून बोलणं मागासलेपणाचं लक्षण  आहे असं आपण मराठी माणसांनीच ठरवून टाकलंय त्यामुळे, ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी…’ या ओळीला एक सुंदर ओळ या पलीकडे काहीच अर्थ उरत नाही. या ओळीत […]

‘मेक इन इंडीया’, सोशल मिडीया आणि आपण सामान्यजन..

मान. पंतप्रधान मोदींच्या पुढाकाराने मुंबईत भरवलेल्या ‘मेक इन इंडीया’ या ‘समर्थ भारता’चं समग्र दर्शन घडवणाऱ्या प्रदर्शनावर मी एक लेख लिहीला होता..रोहीत वेमुला, जेएनयु, भुजबळ आणि न्यायाधीशाच्या भुमिकेतील एकतर्फी मिडीया या सर्व केवळ निराशाच पैदा करणाऱ्या घटनाच्या पार्श्वभूमीवर, देशात काहीतरी ठोस पाॅझिटीव्ह आणि देश व देशवासीयांचा अात्मविश्वास वाढवणाऱ्या घटनाही देशात घडतायत, ही बाब माझ्या व्हाट्सअप व फेसबुकवरील […]

1 34 35 36 37 38
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..