श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड.
लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण.
२०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.
आपले सन्माननीय पंतप्रधान श्री. नरेन्द्र मोदी यांनी काळा पैसा बाहेर काढण्यासाठी जी कठोर पावले उचलली आहेत त्याची तारीफ करावी तेवढी कमीच आहे..देशातील सामान्य जनतेला नोटा रद्द केल्याचा त्रास जरूर होतोय तरीदेखील सामान्य जनता मोदींच्या बाजूने ठाम उभी असल्याचं चित्र आहे..आणि जनतेचं असं मोदींच्या बाजूने ठाम उभं असल्याचं एकमेंव कारण म्हणजे मोदी करतायत ते देशासाठी, आपल्यासाठी आणि […]
आयुष्यात ज्या ज्या गोष्टी कराव्यात असे तीव्रतेने वाटते, त्या करताना कसलाही संकोच बाळगू नका.. सिगारेट ओढावीशी वाटली, ओढा.. दारू प्यावीशी वाटते, जरूर प्या.. प्रेमात पडावंस वाटतं, तसा प्रयत्न करा.. इतकंच कशाला, एखाद ‘प्रकरण’ करावंस वाटलं तर तेही करा.. पण…, हे सर्व करताना ‘याची खरोखरच काही गरज आहे का’ याचा प्रथम विचार करा..!! — गणेश साळुंखे
मुंबईतील बहुतेक सर्व मुख्य रस्त्यांना स्वतःचा असा इतिहास आहे.. मुंबईवर राज्य केलेल्या (आताच्या नाही, पूर्वीच्या) राज्यकर्त्यांप्रमाणेच मुंबईतील काही रस्त्यांनी मुंबईला जागतिक दर्जाचे महानगर बनवण्यात अहं भूमिका बजावलेली आहे..या रस्त्यांच्या निर्मितीची एक स्वतंत्र कथा आहे तश्याच याच्या शेजारी असलेल्या वास्तुंच्याही कथा-कहाण्या आहेत.. आपल्याला व्यवसाय-धंद्यानिमित्त अनेक ठिकाणी फिरावं लागत..आपण ज्या रस्त्यावरून रोज ये-जा करतो त्या रस्त्याचे ऐतिहासिक महत्व […]
डार्विनचा सिद्धांत सांगतो की माकडापासून माणूस उत्क्रांत झाला.. मला वाटते हा सिद्धांत मनुष्याच्या शरीरापुरताच खरा असावा..! कारण, एकूणच मनुष्याचे आचरट वर्तन पाहाता तो मानसीक पातळीवर अद्याप आपल्या पुर्वजांच्याच पातळीवर असावा अशी शंका घेण्यास भरपूर जागा आहे..!! (आपले राजकीय नेते, अध्यात्मीक ‘बाबा’, मेणबत्ती संप्रदाय आणि दुटप्पी ‘आम आदमी’ म्हणजे आपण सर्व यांच्यामूळे मी प्रसवलेला ‘सिद्धांत’) — गणेश […]
प्राचीन काळापासून मानव शहर वसवत आलाय..बरीशी जागा, आजूबाजूला पाण्याची सोय बघायची आणि वसती करायची हा पुरातन परिपाठ आहे..प्राचीन हरप्पा किंवा मोहोन्जादारो शहर असतील किंवा अगदी आता-आता पर्यंत वसलेली शहर असोत, अगदी याच पद्धतीने त्यांची निर्मिती झाली आहे..या सर्व शहरात आणि मुंबई शहरात एक जमीन अस्मानाचा फरक आहे आणि तो म्हणजे मुंबईला वसण्यासाठी तिची, स्वतःची अशी जमीनच […]
हा पत्ता रोज या ठिकाणाहून जा-ये करणार्यालाही लक्षात येणार नाही. पण ‘ र्हिदम हाऊस’ म्हटलं की चटकन, ‘च्यायला हा ऱ्हिदम हाऊसचा पत्ताय होय’ असे उद्गार ऐकू येतील..! […]
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी ५०० व २००० च्या नोटा का चालू ठेवल्या असाव्यात? मला वाटणारे एक कारण. देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी ५०० व १००० च्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयाचे सर्वच थरातून स्वागत होत आहे. विशेषतः सामन्यांसाठी हा निर्णय अतिशय योग्य असल्याच्या प्रतिक्रिया मुंबईतल्या ट्रेन मध्ये, रस्त्यावर फिरताना प्रवासी, रिक्षा-टॅक्सीवाले, किरकोळ भाजी विक्रेते […]
आज भाऊबिज. भावाला बहिणीने ओवाळायचा दिवस. आपल्या हिन्दू संस्कृतीत प्रत्येक नात्याची पूजा बांधली आहे..बाकी सर्व सोडा पण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ‘धद्या’ची पूजा करून ‘गल्ल्या’चीही कृतज्ञता व्यक्त करण्याची पद्धत मला नाही वाटत अन्य कुठल्या धर्म-पंथात असेल म्हणून..तसंच भाऊबिजेचंही..! भावा-बहिणीच्या नात्यातील प्रेम अधिक गहीरं करणारा हा दिवस मला नाही वाटत अन्य कुठल्या धर्म-पंथात असेल म्हणून..सर्वसंपन्न, सामर्थ्यवान पण ज्याला बहिण […]
दिवाळीचा आजचा दिवस पाडव्याचा.. नविन विक्रमसंवताचा आज आरंभ..कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे पाडवा..प्रतिपदा या शब्दाचं बहुजनांनी केलेलं सुलभीकरण म्हणजे ‘पाडवा’ हा शब्द..’भाद्ररपदा’चं कसं ‘भादवा’ होतं, अगदी तसच..! या दिवसाला ‘बलीप्रतिपदा’ असंही म्हणतात..शेतकऱ्यांचा लोककल्याणकारी आद्य राजा बळी याचं स्मरण करण्याचा दिवाळीतील हा सर्वाधीक महत्वाचा दिवस..याच दिवशी वामनाने बळीला पृथ्वीवरून पाताळात ढकलले अशी पुराण कथा आहे..खरं तर ते एक […]