नवीन लेखन...
चिंतामणी कारखानीस
About चिंतामणी कारखानीस
चिंतामणी कारखानीस हे ग्राहक संरक्षण सेवा समिती या संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष होते. त्यांना या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल २०१० चा Consumer Awareness Award हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. ठाणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे ते माजी अध्यक्ष आहेत. विविध वृत्तपत्रांत व मासिकांत त्यांचे लेख प्रकाशित झाले असून आकाशवाणीवर भाषणेही प्रसारित झाली आहेत. ते शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रवक्ते आहेत.

छत्रपतींच्या काळातील गुप्तहेर खाते

छत्रपती शिवरायांच्या काळात त्यांचे हेर खाते कसे काम करत होते ते खालील ओव्या दर्शवतात .सदर माहिती मला श्री नरेंद्र नाडकर्णी यांच्या ई मेल वरून मिळाली. अफझलखान स्वराज्या वर चाल करून येत आहे हे महाराजांना कळवण्य साठी हि युक्ती वापरली होती. रामदास स्वामींचे शिष्य स्वराज्यात किती महत्वाचे काम करीत होते हे यावरून लक्षांत येते. अफझलखान निघाला हे […]

समर्थ रामदास स्वामी ……९

समाजात रज , तम , आणि सत्व या तिन्ही गुणांची माणसे असतात.या पैकी रजोगुणी माणसांची संख्या प्रचंड आहे. आपण तमोगुण कसा असतो हे दासबोधातून जाणून घेतले.तमोगुण हा अत्यंत हीन दर्जाचा गुण आहे.त्या पेक्षा बरा आहे तो रजो गुण .या गुणाची माणसे दुस-याला ठार मारण्या पर्यंत जात नाहीत परंतु अशा लोकांना समर्थ अप्पलपोटे असे म्हणतात. माझे घर […]

समर्थ रामदास स्वामी …….८

समर्थांनी दासबोधात सत्व गुण , रजो गुण , आणि तमोगुणांचे वर्णन केले आहे.हे तीनही गुण असलेली माणसे आपल्या आजूबाजूला फिरत असतात.सर्व प्रथम आपण तमोगुण पाहू. समर्थांचा दासबोध वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते कि त्यांनी केलेले भाष्य हे त्रिकाळ बाधित सत्य आहे हे नंतरच्या काळात सिद्ध झालेले आहे. समर्थ ज्या काळात वावरत होते त्या काळात शहरे […]

समर्थ रामदास स्वामी ……७

शिवप्रभूंच्या महानिर्वाणा नंतर महाराष्ट्रात एक अभूत पूर्व पेच प्रसंग निर्माण झाला. संभाजी महाराजांच्या आई महाराणी सईबाई त्यांच्या लहानपणीच निवर्तल्या होत्या.आई शिवाय वाढलेले मुल कधी कधी हट्टी असते.शिवरायांच्या आई राजमाता जिजाबाई यांचे संभाजी महाराजांवर अत्यंत प्रेम होते.आईचे दुध नशिबी नसलेल्या संभाजी युवराजांवर हिरडस मावळातील एका नव्याने बाळंत झालेल्या तरुणीला राजमातेने “दुधाची आई “म्हणून गडावर पाचारण केले.या गुंजवणी […]

समर्थ रामदास स्वामी ………६

समर्थांनी मराठी छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांना लिहिलेली दोन पत्रे इतिहासाला ज्ञात आहेत.या पैकी शिवरायांनी जो अभूत पूर्व पराक्रम केला त्याबद्दल त्याची स्तुती करणारे एक पत्र आहे.त्याच प्रमाणे शिवरायांच्या स्वर्गवासानंतर त्याचे सुपुत्र महा पराक्रमी छत्रपती संभाजी महाराजांना लिहिलेले दुसरे पत्र आहे.पहिल्या पत्रात शिवरायांची स्तुती आहे तर दुस-या पत्रात शिव छत्रपतींच्या गादीवर आरूढ झालेल्या संभाजी महाराजांना उपदेश […]

समर्थ रामदास स्वामी …….५

समर्थांनी मनावर भाष्य करणारे २०५ श्लोक लिहिले त्यांनाच मनाचे श्लोक असे म्हणतात.मानवाच्या अशांतीचे मूळ म्हणजे त्याचे मन ! या मनापासून मुक्त होण्यासाठी मनच कसे उपयोगी पडते याचे विवेचन समर्थांनी मनाच्या श्लोकात केले आहे.संत एकनाथांनी ‘जोशी’ या नावाचे भारुड लिहिले आहे.त्यात भारुडात ते मनाचा उल्लेख करताना म्हणतात — ” मानाजी पाटील देहागावीचा विश्वास धरू नका त्याचा. ” […]

समर्थ रामदास स्वामी …..३

समर्थांनी शिवथर घळीत त्याचे पट्ट शिष्य कल्याण स्वामी यांना दासबोध सांगितला आणि कल्याण स्वामी यांनी तो लिहून काढला. दासबोधा शिवाय समर्थांनी निर्माण केलेले वाङ्मय प्रचंड आहे . या शिवथर घळीचे महात्म खूप मोठे आहे. महाड- भोर रस्त्यावर माजेरी हे गाव लागते. त्या गावा पासून ४ मैलावर शिवथर घळ आहे. समर्थांनी या ठिकाणी वाङ्मय निर्मिती केली.दासबोध लिहिला […]

समर्थ रामदास स्वामी …..४

शिवराय आणि रामदास स्वामी यांचे प्रत्यक्ष सान्निध्यात राहिलेल्या हनुमंत स्वामी याची बखर उपलब्ध आहे. त्या बखरीत असा उल्लेख आहे कि समर्थ सज्जन गडावर (परळीचा किल्ला )वास्तव्याला असताना त्यांनी कल्याण स्वामी यांना दासबोधाची प्रत शिवरायांना भेट देण्यास सांगितले होते.सुदैवाने बखरीतील लिहिलेल्या या घटनेला शिव चरित्रकार पाठींबा देतात.छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला दक्षिण दिग्विजय आटोपताच प्रताप गडावर श्री भवानीच्या […]

विदर्भ – दोन लंगड्या आणि आंधळ्या मित्रांची कथा

एक होता आंधळा. एक होता पांगळा. दोघेही एका देवळासमोर भिक मागत असत. अगदी सुरवातीला त्यांच्यात सख्य नव्हते. दोघेही वेगवेगळे बसून भिक्षा मागत. आंधळ्याला डोळे नसल्यामुळे लोक भिक्षा घालत. आंधळा अंदाजाने भिक्षा मोजत असे. पांगळा एकाच ठिकाणी बसून असे. त्याला भिक्षा कमी मिळे. एके दिवशी पांगळा आंधळ्याला म्हणाला, आपण एकत्र भिक्षा मागू. त्यामुळे आपल्या दोघांचा फायदा नक्की […]

समर्थ रामदास स्वामी – भाग २

एखाद्याच्या वर प्रभू रामचंद्र प्रसन्न होतात पण त्यासाठी जशी त्याची भक्ती कारणीभूत असते तशी त्याचे पूर्व सुकृत सुद्धा जबाबदार असते. समर्थांच्या बाबतीत त्याचे पूर्व सुकृत प्रचंड होते. त्यांच्या आधीच्या २१ पिढ्या रामाची उपासना करीत होत्या. २१ पिढ्या गेल्यावर प्रत्यक्ष हनुमान त्यांच्या रूपाने पुन्हा रामनामाचा प्रचार करण्यासाठी त्याच्या कुळात प्रगट झाला. अशा या परम पावन कुळात, राम […]

1 3 4 5 6 7 8
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..