नवीन लेखन...

छत्रपतींच्या काळातील गुप्तहेर खाते

छत्रपती शिवरायांच्या काळात त्यांचे हेर खाते कसे काम करत होते ते खालील ओव्या दर्शवतात .सदर माहिती मला श्री नरेंद्र नाडकर्णी यांच्या ई मेल वरून मिळाली.

अफझलखान स्वराज्या वर चाल करून येत आहे हे महाराजांना कळवण्य साठी हि युक्ती वापरली होती. रामदास स्वामींचे शिष्य स्वराज्यात किती महत्वाचे काम करीत होते हे यावरून लक्षांत येते.

अफझलखान निघाला हे सांगणारे पत्र सन १६५९

वि वेके करावे कार्य साधन ।
जा णार नरतनु हे जाणोन ।
पू ढील भविष्यार्थी मन ।
र हातोची नये ।।१।।

चा लू नये असन्मार्गि ।
स त्यता बाणल्या अंगी ।
र घुवीर कृपा ते प्रसंगी ।
दा समहात्म्य वाढवी ।।२।।

र जनीनाथ आणि दिनकर ।
नि त्य करिती संचार ।
घा लिताती येरझार ।
ला विले भ्रमण जगदिशे ।।३।।

आ दिमाया मूळभवानी ।
हे सकल ब्रह्मांडाची स्वामिनी ।
येकांती विवेक करोनी ।
इष्ट योजना करावी ।।४।।

पत्राच्या प्रत्येक ओवीचरण अद्दाक्षर घेतल्यास ‘विजापूरचा सरदार निघाला आहे’ ही सूचना मिळते.

Communication च्या अनेक पद्धती त्याकाळात वापरल्या जात होत्या. बहुजन समाजाचे अनेक कलाकार त्यात वाकबगार होते. संबळ,मशालीच्या हालचाली,बोटांनी केलेल्या खुणा,कसरतीच्या प्रकारातून message देणे इत्यादी अनेक प्रकार होते.

अफजलखान निघाला आहे हेच जर गुप्त हेरांना शिवरायांना सांगायचे असेल तर ? त्याकाळात वासुदेव,गोंधळी,बहुरूपी , रामदासी अशा अनेक प्रकारच्या लोकांना महाराज हेरगिरी करायला सांगायचे.आजही हि मंडळी आपले कार्यक्रम सदर करतात आणि message पाठवण्याचे प्रात्यक्षिक दाखवतात.

श्री समर्थ रामदास स्वामींना शिवरायांच्या स्वराज्य निर्मितीचे महत्व पटले असल्याने आणि त्यांचे शिष्य सतत भ्रमण करीत असल्याने त्यांनी स्वराज्य निर्मितीसाठी हेरगिरी करण्यासाठी त्यांच्या शिष्यांना प्रोत्साहन दिले असण्याची दाट शक्यता आहे. शिवाय समर्थ स्वतः स्वसंरक्षणासाठी गुप्ती बाळगत असत आणि त्यांचे शिष्य सुद्धा बाळगत असत.पण या गोष्टींचे त्यांनी प्रदर्शन केले नाही.

मला मिळालेल्या माहिती नुसार समर्थांचे शिष्य ज्या सत्ताधीशांच्या सरदार ,जमीनदार यांच्या घरी माधुकरी मागायला जात त्या ठिकाणी ते राजकीय निरोप देत असत .

— चिंतामणी कारखानीस

चिंतामणी कारखानीस
About चिंतामणी कारखानीस 75 Articles
चिंतामणी कारखानीस हे ग्राहक संरक्षण सेवा समिती या संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष होते. त्यांना या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल २०१० चा Consumer Awareness Award हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. ठाणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे ते माजी अध्यक्ष आहेत. विविध वृत्तपत्रांत व मासिकांत त्यांचे लेख प्रकाशित झाले असून आकाशवाणीवर भाषणेही प्रसारित झाली आहेत. ते शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रवक्ते आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..