नवीन लेखन...

समर्थ रामदास स्वामी …..३

समर्थांनी शिवथर घळीत त्याचे पट्ट शिष्य कल्याण स्वामी यांना दासबोध सांगितला आणि कल्याण स्वामी यांनी तो लिहून काढला. दासबोधा शिवाय समर्थांनी निर्माण केलेले वाङ्मय प्रचंड आहे . या शिवथर घळीचे महात्म खूप मोठे आहे. महाड- भोर रस्त्यावर माजेरी हे गाव लागते. त्या गावा पासून ४ मैलावर शिवथर घळ आहे. समर्थांनी या ठिकाणी वाङ्मय निर्मिती केली.दासबोध लिहिला गेला. महाराष्ट्रात दोन ठिकाणे अशी आहेत कि तिथे कंपास दक्षिण -उत्तर दिशा दाखवत नाही.शिवथर घळ आणि ठाणे जिल्ह्यातील गणेश पुरी जवळ तुंगारेश्वर पर्वतावर एक प्रचंड मोठी पांडव कालीन शिळा आहे तिथे कंपास दिशा दाखवत नाही.गणेश पुरी येथील नित्यानंद स्वामी त्याठिकाणी एकांतात बसायचे.आता श्री सदानंद स्वामी त्याठिकाणी ध्यान धारणा करतात.

दासबोधा शिवाय त्यांनी करुणाष्टके, मनाचे श्लोक ,आनंदवनभुवनी, आनंदवनभुवनम् (संस्कृत) आत्माराम अंतर्भाव,सार्थ अंतर्भाव,चत्वारमान, जनस्वभावगोसावी ,जुनाटपुरुष, पंचसमासी, पंचीकरणयोग,पूर्वारंभ, बाग प्रकरण,कारखाने प्रकरण,मनोबोध ,मान पंचक , षड्रिपुनिरुपण ,सवाया, समर्थ-वेण्णास्वामी संवाद, समर्थ- कल्याणस्वामी संवाद, समर्थ- केशवस्वामी संवाद, सार्थ भीमरूपी स्तोत्र, श्री सूर्यस्तुती, गुरुगीता, अशी अनेक स्त्रोत्र , कवने आणि आरत्यांची निर्मिती केली .

चिंतामणी कारखानीस

चिंतामणी कारखानीस
About चिंतामणी कारखानीस 75 Articles
चिंतामणी कारखानीस हे ग्राहक संरक्षण सेवा समिती या संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष होते. त्यांना या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल २०१० चा Consumer Awareness Award हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. ठाणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे ते माजी अध्यक्ष आहेत. विविध वृत्तपत्रांत व मासिकांत त्यांचे लेख प्रकाशित झाले असून आकाशवाणीवर भाषणेही प्रसारित झाली आहेत. ते शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रवक्ते आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..