नवीन लेखन...

अद्भुत

आता सारे भासते अद्भुत जणु मायाजाल सभोवती हवे ते आता उपलब्ध सारे वेदना एक, दुरावली नाती… आता शोधावी मायाममता दुर्लभ आता वात्सल्यप्रीती कुणास कुणाची ओढ़ नाही वास्तवता ही साऱ्या जगती… मानवता आज कशा म्हणावे भासे अद्भुत सारे कल्पनांती… मरणासाठी कां जगणे असते हा प्रश्न भेडसावतो विचारांती… — वि.ग.सातपुते (भावकवी) 9766544908 रचना क्र.२४८  २६/९/२०२२

प्रारब्ध

शोधावी आत्मसुखदा लाभणे भाग्य भाळीचे वर्तावे जगी वात्सल्ये कुंभ भरावे सत्कर्माचे जगी सर्वसुखी कोण ? दुःख, हेच मनांतरीचे देवांनाही नाही चुकले भोग सारे पूर्वकर्माचे मानवी, जन्म विवेकी जाणुया अर्थ मानवतेचे सुखदु:खांच्या झुल्यावरती जगावे, संचित प्रारब्धाचे — वि.ग.सातपुते (भावकवी) 9766544908 रचना क्र.२२१ ३१/८/ २०२२

प्रबोधन सूर्य : संत तुकाराम

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये प्राचार्य किसन पाटील यांनी लिहिलेला हा लेख संत तुकाराम म्हणजे देहू गावच्या मोरे – अंबिले घराण्यात जन्म घेतलेला एक सुपुत्र . वोल्होबा आणि कनकाई या मातापित्यांच्या उदरातील एक बालक . शेती – भाती आणि दुकानदारी करणाऱ्या या आर्थिकदृष्ट्या सुबत्ता असलेल्या कुटुंबाचा वारस . आपणा सर्वांच्या प्रपंचात येणारे दुःख , भोग […]

महाविद्यालयीन स्पर्धा- निर्णय आणि वादळे !

स्पर्धा पारितोषिकांसाठी(करंडक, ढाल ,चषक वगैरे)असतात की बक्षिसाच्या रकमेसाठी की मिळालेल्या व्यासपीठावर स्वतःला पारखून घेण्यासाठी असतात कां मैत्र नको, शत्रू हवा याचा सर्वांनीच यानिमित्ताने (पुन्हा एकदा) विचार करण्याची पाळी आलीय. […]

बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – ८ – सावरकरांची चिंतानात्मक वृत्ती

सावरकरांच्या अनेक पैलू पैकी आणखी एक पैलू म्हणजे त्यांचे लेखन.  १९३७ साली सरकारने सावरकरांची पूर्ण मुक्तता केल्यावर १९३८ मधील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सावरकर निवडले गेले. एक राजकारणी,क्रांतिकारक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष निवडले जाण्याची ही पहिलीच वेळ. […]

।। सद्गुरु संत श्री बाळुमामा ।।

गुरुतत्त्व कधी, कुठे, कसे आणि कोणत्या स्वरुपात प्रकट होईल हे सांगता येत नाही. घरच्या बकऱ्या, मेंढ्या जंगलात चरायला नेणारा धनगर कुटुंबातील लहानगा मुलगा अंगभूत कर्तृत्वाने पुढे मोठा होऊन जगाच्या कल्याणासाठी धनगर समाजातील रूढी व अनिष्ट विकृतीच्या मार्गाने जाऊ पाहणाऱ्या समाजाला सन्मार्गावर आणले. ३ ऑक्टोबर १८९२ रोजी बेळगावनजीक चिक्कोडी तालुक्यातील “अक्कोळ” या खेडेगावात गुरुतत्त्व अवतरले. मायाप्पा-सत्यवा या […]

श्री क्षेत्र औदंबर

श्री नृसिंह सरस्वती कारंजा या आपल्या जन्म स्थानावर मातेला वचन दिल्याप्रमाणे आले व. इ. स. १४१६ या वर्षी आपल्या उत्तर यात्रेस निघाले काशी येथे त्यानी मुक्काम केला. इ. स. १३८८ या वर्षी त्यानी वृध्द कृष्ण सरस्वती यांच्या कडुन संन्यास दीक्षा घेतली व आपली नवखंड यात्रा पूर्ण केली. क्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिक गौतमी तथा गोदावरी तटाक यात्रा करीत […]

नवरात्रातील गणपतीची कहाणी..

प्रत्येक घराण्याचा एक इतिहास असतो, परंपरा असतात… जाणुन घेऊया अशाच एक अजब परंपरेची ही कथा…. अश्विन महिन्यात… नवरात्रीत येणाऱ्या गणपतीबाप्पांची ! […]

“बुनियाद-टेलिव्हिजन सिरीजचा शोले”

कासवाच्या गतीने वाढणाऱ्या भारतीय टेलिव्हिजन क्षेत्राला खरा बुस्टर मिळाला तो ऐंशीच्या दशकात. १९८२ मधे दिल्लीतील एसियाड गेम्स च्या निमीत्ताने क्रिडा स्पर्धेचे थेट प्रक्षेपण, १९८३ मधे एकदिवसीय क्रिकेटमधे भारतीय टीमचा विश्व विजय, आणि १९८४ मधे पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हत्येनंतर लाइव्ह टेलेकास्ट झालेला त्यांचा अंत्यसंस्काराचा सोहळा, या सर्व घटनांमुळे भारतात घरोघरी टेलिव्हिजनचा प्रसार झपाट्याने होउ लागला होता. टिव्ही […]

गावाकडची गोष्ट – हिरा मावशी

मी शाळेत शिकायला असताना अनेक गोष्टी मी पाहिल्या आहेत. खरंतर मराठी शाळेमध्ये शिकायला मला फार आनंद वाटत असे. वर्गामध्ये भिताडवर रंगीबिरंगी लावलेले सुरेख अक्षरातील तकते वेगवेगळी काढलेली सुरेख चित्रे. डोळ्याचे पारणे फेडणारा हा सुरेख देखावा पुन्हा पुन्हा पहावा व या चित्रावर ती काहीतरी लिहावे असे माझ्या मनाला नेहमी वाटत होते. त्यातील काही म्हणी अजून आठवतात खत […]

1 2 3 4 23
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..