नवीन लेखन...

निळ्या डोळ्यांचा जादूगार !

राजच्या चित्रपटात प्रत्येक कलावंत किती वेगळा आणि खराखुरा,ताजा वाटतो. स्वतःचे कलारंग अस्सलपणे उधळताना जाणवतो. ही राजची छाप त्यांच्यातून उणीच करता येत नाही. तोच कलाकार इतर चित्रपटांमधून फिका,निस्तेज वाटतो. प्रत्येकाचं आतलं सर्वस्व काढून घेऊन त्याने कलाकारांचे शिल्प सजीव केले. त्याच्या परिसस्पर्शाची झळाळी लेऊन कितीतरी कलादेह इथे चिरंतन होऊन गेलेत. […]

चैत्र शुद्ध प्रतिपदा

चैत्र वर्ष दाराशी आले, डोकावुनी ते मला म्हणाले, वर्तमान मी आहे तुमचा, झाले गेले गंगेस मिळाले. नवे वर्ष अन् नव्या कल्पना, घेऊन क्षितिजावर अवतरू पुन्हा. विसरुनी सरत्या ‘काळां ‘ आपण, होऊ सज्ज, समजावू मना. नवे वर्ष, उमेद नवी ती, ठाम निश्चया घेऊनी सोबती, लाभेल उभारी पुन्हा एकदा, स्वप्ने फुलतील पुन्हा सभोवती. लिहित रहा, वाचीत रहा तू […]

शिवाजी ‘दी बाॅस’

जॅकी चेन या आशिया खंडात चित्रपटाचे सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यानंतर रजनीकांतचा दुसरा नंबर लागतो. २००७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिवाजी दी बाॅस’ या चित्रपटासाठी त्याने सर्वाधिक म्हणजे २६ कोटी रुपये मानधन घेतले होते. गेली पंचेचाळीस वर्षे सलग चित्रपट सृष्टीमध्ये टिकून राहणे हे रजनीकांतच करु जाणे. […]

कर्नाटकातील सिद्धगंगा मठाचे मठाधीश शिवकुमार स्वामी

१९६५ मध्ये कर्नाटक विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली होती. त्यांना २००७ मध्ये कर्नाटक रत्न पुरस्काराने तर २०१५ मध्ये पदमभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते. सिद्धगंगा मठाची सिद्धगंगा एज्युकेशन सोसायटी ही शिक्षण संस्था कर्नाटकात सुमारे १२५ शैक्षणिक संस्था चालविते. कर्नाटकातील राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज व्यक्ती शिवकुमार स्वामींचे भक्त आहेत. […]

मुंबई अग्निशमन दलाचा वाढदिवस

हे दल आगी विझवण्यासोबतच इमारती कोसळणे, वायू गळती, तेल गळती इत्यादी आपत्ती निवारण्याचे काम करते. दलाचे मुंबईत ३३ बंबखाने आहेत आणि दलाचे मनुष्यबळ २७०० आहे. […]

काही राहिलेले काही सुटलेले

काही राहिलेले काही सुटलेले प्रश्नच ते तुला कळतील का रे? काही मोहरलेले काही बहरलेले क्षणच ते तुला समजतील का रे? काही उमललेले काही फुललेले भावच ते तुला उमजतील का रे? काही मंतरलेले काही गुंफलेले मनच ते तुला कळेल का रे? काही धडधडणारे काही लाजणारे हृदयच ते तुला कळेल का रे? काही व्यक्तसे काही अबोलसे शब्दच ते […]

आयुष्य

सरतेच आहे आयुष्य सारे तरी मी कोण कळले नाही धावलो, मी मृगजळापाठी कां? कसा ते कळले नाही लाभली नाती ऋणानुबंधी ओढ कधी जाणवली नाही भावनां, साऱ्याच कोरड्या मनांतर कधी भिजले नाही जगणे सारेच भोग भाळीचे मी त्यास कधी टाळले नाही जे लाभले ते निमूट भोगीले त्रागा कधीच मी केला नाही सत्संगास मी सदा भुकेलेला तो मार्ग […]

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एन. के. पी. साळवे

व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या साळवेंचा आंतरराष्ट्रीय अर्थकारणापासून जागतिक करव्यवस्थेपर्यंत गाढा अभ्यास होता. भारत हा सर्वाधिक करवसुली करणारा देश आहे, असे त्यांचे मत होते. इन्कम टॅक्स व प्रॉपटी टॅक्स कमी झाले पाहिजेत, याविषयी ते आग्रही होते. इंदिरा गांधी यांच्या कारकिदीर्त साळवे यांच्या अध्यक्षतेखालील संसदेच्या संयुक्त समितीच्या शिफारशींनुसार, १९७५ साली भारतीय कर व्यवस्थेत महत्त्वाचे बदल झाले. […]

‘मराठी भाषेचा नाट्यप्रवास’ – रायपूर !

मार्च २३- माझे रायपूरला “मराठी भाषेचा नाटयप्रवास ” या विषयावर व्याख्यान झाले. संयोजक होते – महाराष्ट्र मंडळ ! १९३५ पासून कार्यरत असलेले आणि मराठी मातीपासून दूर रुजलेले हे बी आता फोफावले आहे. त्यांचे वर्षभर अनेकविध उपक्रम सुरु असतात. मी पूर्वी रायपूरला असताना त्यांच्या कर्तृत्वाचा साक्षीदार होतो. आता तर renovation चे प्रचंड काम त्यांनी हाती घेतलेले आहे. […]

कथा कॅटोन्मेंटची

एकेकाळी शहरांपासून दूर असलेल्या कँटोन्मेंटसना आता अनेक ठिकाणी शहरांनी वेढले आहे. काळानुसार कँटोन्मेंटमधील विकासाचे, लोकवस्तीचे आणि व्यवसायांचे प्रमाण वाढत गेले. त्याबरोबर नागरिकांच्या राहणीमानातही बदल झाला. त्यांच्या अपेक्षा उंचावत गेल्या. रस्त्यांमधील वाहतूक आणि वर्दळीचे प्रमाण वाढले. देशाच्या कानाकोपऱ्यात वसलेल्या कँटोन्मेंटवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षिततेच्या आव्हानाला आणखी एक गंभीर परिमाण लाभले; लष्करी साधनसुविधा, हत्यारे आणि मालमत्ता यांची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली. […]

1 35 36 37 38
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..