नवीन लेखन...

भूतदया जागविली

चिंव चिंव करीत चिमणा चिमणी       खोलीमध्ये माझ्या आली अवती भवती नजर टाकून        माळ्यावरती ती बसली   वाचन करण्यात रंगून गेलो   लक्ष्य नव्हते तिकडे आश्चर्य वाटले बघून मजला    काड्या गवताचे तुकडे   घरटे बांधण्या रंगून गेली      आणती कडी कचरा मनांत बांधे एकच खुणगांठ    तयार करणे निवारा   भंग पावता शांत वातावरण      वैताग आला मला कचरा आणि घरटे काढून      खिडकीतुनी  फेकला   काम संपवूनी सांज समयी    घरी परत मी आलो त्याच चिमण्या तसेच घरटे     पाहून चकित झालो   पहाट होता चिमण्या उडाल्या    काढून […]

वेडा अहंकार !

एक पुरातन मंदिर दिसले माझ्या दृष्टीला   । शिवलिंग ते सुंदर असुनी नन्दी दारी बैसला   ।।१।। जुनी वास्तू, पडझड दिसली अवती  भवती   । झाडे जुडपे वाढून तेथे जागा ते अडविती   ।।२।। किडे मुंग्या झुरूळ नि कोळी यांची वस्ती तेथे   । रान फुले ती उग्र वास तो दरवळीत  होते.   ।।३।। विषण्य  झाले मन बघुनी अस्वच्छ परिसर   । राहील कसा ह्या वातावरणी मग तो ईश्वर   ।।४।। पूजा नव्हती पाठ नव्हता भजन नव्हते तेथे   । पवित्र विधींचा अभाव असुनी दुर्लक्ष ते होते   ।।५।। संकल्प केला त्याचक्षणी मी आपल्या मनाशी   । परिसर तो निर्मळ करुनी […]

राधानगरी धरण परिसर …. डोंगरमाथा … 

राधानगरी धरण परिसर …. डोंगरमाथा … गूढरम्य …. बेलाग सह्याद्री …. ! माझ्या व्याकुळल्या मना …. नको साकळून राहू सख्या आपुल्या गतीने तू मी निरंतर वाहू …. नित्य चांगले स्मरावे .. ओखटे ते विसरावे अहंतेचे द्वाडपण नीट ओळखून घ्यावे ….. आपुली ही पायपीट येथे थोडया दिवसांची वाट पहाते पहाट सोसलेल्या अवसांची …. साकळलेपणामुळे विष प्रसवते जिणे […]

दु:खाने शिकवले

रंग बदलले ढंग बदलले,  साऱ्या जीवनाचे बदलणाऱ्या परिस्थितीने,  तत्व शिकवले जगण्याचे….१, कैफ चढूनी झेपावलो, नभात स्वच्छंदे यश पायऱ्या चढत असतां, नाचे मनीं  आनंदे….२, धुंदीमध्यें असता एका,  अर्थ न कळला जीवनाचा आले संकट दाखवूनी देयी,  खरा हेतू जगण्याचा….३, दु:खामध्ये होरपळून जाता,  धावलो इतरांपाठीं अनेक दु:खे दिसून येता,  झालो अतिशय कष्टी….४, दु:ख आपले निवारण्याते,  आनंद वाटे मनीं इतर […]

खूप भेटल्या……

तुझ्या सारख्या खूप भेटल्या , पण आपलंसं कोणी वाटलं नाही का कुणास ठाऊक.. तुझा विचार सोडून दुसर्‍याच्या विचार करणं…. माझ्या मनाला ही पटलं नाही. स्वप्न आहे एक माझं, मला ते पूर्ण करायचंय…. पाल्याचा कुड लावलेल्या घराला, बंगल्याच रुपडं आणायचंय….. जिद्द आहे उरी, त्यात पूरता गुंतलोय जरा….. दमलेल्या आई वडिलांना, आत्ता सुखाचा तरी घास देतो खरा …… […]

स्वातंत्र्यवीर सावरकरांची भाषाशुध्दी चळवळ

1924 साली स्वातंत्र्यवीरांनी,भाषाशुध्दीचं आंदोलन सुरू केलं.तेव्हाच त्यांनी भाषाशुध्दि ही पुस्तिका लिहीली. या पुस्तिकेत अ ची बाराखडी तर वापरली आहेच, शिवाय अर्धा (लंगडा)र,अैवजी र् हे चिन्ह वापरलं आहे.
गीर्वाण,तुर्क,सर्वांची हे शब्द ..अर् धा, गीर् वाण, तुर् क, सर् वांची…असे लिहीले आहेत. (माझ्या संगणकावर हा र् नीट लिहीता आला नाही. प्रिंटवर हातानं दुरूस्ती करावी लागेल.). ‍‍ […]

२६ जुलै २०१९ : स्मृती कारगिल युद्धाच्या

२६ जुलै २०१९ ला कारगिल युद्धाला २० वर्षे पूर्ण होतील. कारगिल युद्धाची वीरगाथा प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये आजही जिवंत आहे. आजपर्यंतच्या युद्धांपैकी केवळ कारगिल युद्धाचा प्रसार वर्तमानपत्रे आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवर फार मोठ्या प्रमाणात करण्यात आला. आजच्या घडीला देशाच्या सुरक्षिततेला बहुआयामी धोके आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणावर सैन्याबरोबरच देशप्रेमी नागरिकांचीही भारताला गरज आहे. २६ जुलै ‘कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने देशाकरता प्राणार्पण करणार्या, भारतीय सशस्त्र दलांतील शूर अधिकारी आणि सैनिकांना, देशवासीयांची आदरांजली. […]

निसर्गकवी माधव केशव काटदरे

‘हिरवे तळकोकण’ लिहिणारे निसर्गकवी माधव केशव काटदरे हे अर्थातच कोकणातील होते. पण त्यांचे बरेचसे आयुष्य नोकरीनिमित्त मुंबईत गेले. माधव काटदरे यांनी केवळ निसर्गकविताच लिहिली, असे नाही. ऐतिहासिक कविताही त्यांनी विपुल लिहिली. छत्रपती शिवाजीमहाराज, शाहूमहाराज, सवाई माधवराव, मस्तानी अशा विविध व्यक्तिरेखा त्यांनी काव्यबद्ध केल्या. याशिवाय शिशुगीते, विनोदी कविताही त्यांच्या लेखणीतून झरल्या. […]

प्रसिद्ध संगीतकार सुनिल शामराव प्रभूदेसाई

रत्नागिरीतील प्रसिद्ध संगीतकार आंनद उर्फ सुनिल शामराव प्रभूदेसाई यांनी संगीतातील एम.ए. पदवी प्राप्त केली होती. त्यांना संगीत तज्ज्ञ डॉ. भारती वैशंपायन व अरूण तसचे मुंबईतील डॉ. अशोक रानडे यांचे मार्गदर्शन लाभले होते. याचबरोबर नाट्यसंगीत अभिनयाबाबत जयमाला शिलेदार-पुणे यांच्याकडून त्यांना धडे मिळाले होते. […]

1 2 3 4 5 12
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..