नवीन लेखन...

फुलांची रांगोळी

रांगोळी कसली काढलेय यापेक्षा ती काढण्यामागची दृष्टी महत्त्वाची. ही सुरेख रांगोळी काढलेय फुले आणि पानांपासून.. रांगोळीसाठी तुम्ही किती खर्च करता हे दुय्यम आहे. निसर्ग सर्वांपेक्षा श्रीमंत आहे.  

राष्ट्रीय आयुर्वेद दिवस : एक आत्मचिंतन

आंतरराष्ट्रीय योग दिनापाठोपाठच भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने उचललेले कौतुकास्पद आणि अभिमानास्पद पाऊल म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी ‘राष्ट्रीय आयुर्वेद दिवस’ म्हणून घोषित करणे हे होय. आपल्या मातीतल्या या वैद्यकशास्त्राला स्वतंत्र असा दिन जाहीर होण्यास सुमारे सत्तर वर्षे वाट पाहावी लागणे ही अतिशय दुःखद घटना म्हणावी लागेल. त्यामुळे हा निर्णय घेतल्याबद्दल सर्वप्रथम मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मा. केंद्रीय […]

शहिदांच्या घरची दिवाळी

बाबा बघा ना..दिवाळी आलीय (शहिदांच्या घरची दिवाळी) बाबा…. देशासाठी सिमेवर लढताना शहीद झाले तुम्ही, तुमच्या या विरमरणाने मात्र पोरके झालो आम्ही. तुमच्या शिवाय ऐन सणासुदित घरावर अवकळा पसरलीय.! बाबा…बघा ना दिवाळी आलीय.!! सांगितले होते तुम्ही या दिवाळीला सुट्टी घेइंन, माझ्या साठी फटाके अन् चिंगीला कपडे आणीन. वाट बघतोय तुमची आम्ही खोटिच आशा लागलीय.! बाबा..बघा ना दिवाळी आलीय.!! […]

आहारातील बदल – चवदार आहार – भाग २

चवीनं खाणार त्याला देव देणार, अशी एक म्हण आहे. पानातली डावी बाजू ही चवींनी भरलेली असते. हे पदार्थ किती खावेत, याचे प्रमाण लक्षात घेणे, महत्वाचे असते. म्हणून ते किती वाढावेत, हे पण ठरलेलेच असते. लिंबामधे व्हिटामिन सी असते म्हणे. पण रोज किती लिंबे खावीत याचे काही ठरलेले प्रमाण ? माहिती नाही. ते आपल्याला ताट वाढण्यातून आपसूकपणे […]

कष्टमेव जयते

आज ऐन सनासुदीचं आभाळ आलं व्हतं, तळहाताच्या फाॅडावाणी जपलेलं आमच्या रानातलं ह्ये पिवळं सोनं उघड्यावरच व्हतं, आमच्या रानातला समदा कारभार हाकणारं आण्णा आन् दादा ह्येन्ला एकच चिंता पडली. आता सनासुदीमुळं लेबर मिळायचंबी आवघड झालतं मग काय तोंडातला घास पावसात भिजुनी म्हणुनशान घरातल्या समद्या पावण्या रावळ्यांसहीत मी आन माझं भाऊबंद निघालोकी रानात. आमचं दादा आन् आण्णा सकाळपसुनच […]

आदर्श आई आणि मुलगी

एकंदरीत आदर्श आई कशी असावी आणि त्याचा मुलांनी आपल्या जीवनात स्वत:च्या सर्वांगीण विकास आणि उन्नतीसाठी कसा उपयोग करून घ्यावा हे यूट्यूब वरील दूरदर्शनच्या ‘माझी माय’ कार्यक्रम बघून आम्हीं उनुभवावा. […]

केवळ कृषी पर्यटन नव्हे. . . . .तर एक संस्कार !

लक्ष्मीपूजन आटोपलं की दुसऱ्या दिवसापासून भटकंतीला निघण्याचा शिरस्ता आम्ही कसोशीने पाळतो. कृषी क्षेत्रातील कामाच्या निमित्ताने मी सतत देशभर भटकत असलो तरी आम्हा तिघांना एकत्र भटकंती करण्याची ही एकमेव संधी आम्ही कधीही सोडत नाही. या वर्षीच्या भटकंतीचा प्रारंभ झाला ‘आमंत्रण’ या कृषी पर्यटन केंद्राला भेट देऊन. पुणे व मुंबईपासून केवळ ९५ किमी अंतरावर असलेलं व सह्याद्रीच्या कुशीत […]

गोवा हिंदू असोसिएशन’ निर्मित ‘लेकुरे उदंड जाली’ ची पन्नाशी

३० ऑक्टोबर १९६६ रोजी दि गोवा हिंदू असोसिएशन’ निर्मित, वसंत कानेटकर लिखित व मो. ग. रांगणेकर दिग्दर्शित ‘लेकुरे  उदंड जाली’ या म्युझिकल  नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग मुंबईच्या रवींद्र नाटय़ मंदिरात सादर झाला. या घटनेला ३० ऑक्टोबर रोजी पन्नास वर्षे पूर्ण झाली. मराठी रंगभूमीवरील या आगळ्या नाटकाला संगीत पं. जीतेंद्र अभिषेकी यांनी खूप उत्तम प्रकारे नाटकातील सर्व गाण्यांच्या चाली बांधल्या होत्या. ताल, सूर व शब्द सगळे कसे चपखल बसवले होते. या नाटकातील मुक्तछंदातल्या संवादांना आणि छंदाला प्राधान्य असलेल्या गोव्यातल्या किरिस्तावांच्या तियात्रा या नाट्यप्रकारातल्या […]

1 32 33 34 35 36
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..