नवीन लेखन...

मराठे आणि दिल्‍ली – १८वे शतक – भाग ६

भाग ६  – थोडे मानसशास्‍त्रीय विश्लेषण 

१८व्‍या शतकातील मराठे दिल्‍लीस जाऊन पोचले परंतु दिल्‍लीचे अधिपती झाले नाहीत, ह्या गोष्‍टीचा विचार करतांना दिल्‍लीला धडक देणार्‍या व्‍यक्‍ती कोण होत्‍या, हे पुन्‍हा एकदा विचारात घेणे आवश्‍यक आहे. आधी हा उल्‍लेख आलाच आहे की, बाजीराव, सदाशिवराव भाऊ व महादजी या तिघांमधील एकही जण स्‍वतः राजा नव्‍हता, ते कुणा दुसर्‍याचे सेवक होते, अंकित होते. सर्व निर्णय स्‍वतः घेण्‍याचे स्‍वातंत्र्य त्‍यांना नव्‍हते. धोरण ठरवणारे त्‍यांचे धनी ( आणि त्‍या धन्‍यांच्‍या जवळचे इतर राजकारणी ) एक हजार मैल दूर, लांब दक्षिणेत बसलेले होते. दिल्‍लीस जाऊन धडकल्‍यावर, मराठ्यांना दिल्‍लीपती बनवण्‍यासाठी बाजीराव, भाऊ व महादजी या तिघांपुढे दोनच पर्याय असू शकले असते – एक पर्याय म्‍हणजे छत्रपतीच्‍या द्वारे दिल्‍लीश्वर म्‍हणून ग्‍वाही फिरवणे आणि दुसरा म्‍हणजे स्‍वतःच दिल्‍लीपती बनणे.

ज्‍या काळात स्‍वामिनिष्‍ठेला व इमानाला अत्‍याधिक महत्त्व दिले जात असे, त्‍या काळात स्‍वामीला दूर सारून, किंवा त्‍याच्‍या मर्जीविरुद्ध स्‍वतःच अधिपती बनणे, त्‍यांच्‍या विरोधात गेले असते. महादजीला जहागिरीचा अधिकार प्राप्‍त झाला, तोच मुळे माधवराव पेशव्‍यामुळे. म्‍हणून त्‍याच्‍या मनात पेशव्‍यांबद्दल कृतज्ञतेची भावना असणे स्‍वाभाविक आहे. नानासाहेबाने अधिकार हातात घेतले, तरी तो स्‍वतः छत्रपती बनला नाही. बाजीरावाला आणि नानासाहेबाला तरूण वयातच, पेशवाईचा अधिकार वंशपरंपरागत नसतांनाही, आणि अंतर्गत विरोध असूनही, शाहूने पेशवा म्‍हणून नेमले होते, त्‍याबद्दल त्‍यांच्‍या मनात शाहूबद्दल आणि छत्रपतींच्‍या गादीबद्दल आदराची व कृतज्ञतेची भावना असणार, हे उघड आहे. भाऊ तर नानासाहेबाचा चुलत बंधूच आणि स्‍वतः पेशवाईचा कारभारी. त्‍याची निष्‍ठ पेशव्‍यांच्‍या गादीवर आणि पर्यायाने छत्रपतींच्‍या गादीवर असणारच. अशा स्थितीत, बेइमानी करून स्‍वतःलाच दिल्‍लीपती म्‍हणून घोषित करणे त्‍या कोणालाही पटले नसते. स्‍वामिनिष्‍ठा हा मध्‍ययुगातील हिंदू समाजाच्‍याच मनोरचनेचा भाग होता.

स्‍वामिनिष्‍ठेचा विचार बाजूला ठेवला तरीही आपण त्‍याच निष्‍कर्षाला पोचतो. जर बाजीराव, भाऊ किंवा महादजीने स्‍वतःला दिल्‍लीपती म्‍हणून घोषित केले असते, तर ते धन्‍याविरुद्ध बंडच मानले गेले असते. आजूबाजूला बाहेरील शत्रू सिद्ध होतेच, पण तशा परिस्थितीत त्‍या तिघांना अंतर्गत शत्रूंशीही युद्ध करावे लागले असते. तशी निर्णायक शक्‍ती त्‍या तिघांकडेही नव्‍हती आणि तशी शक्‍ती आपल्‍याकडे नाही हे जाणण्‍याचा विवेक त्‍यांना खचितच होता.

त्‍यांच्‍यापुढील जो अन्‍य पर्याय असू शकला असता, तो म्‍हणजे छत्रपतीला दिल्‍लीचा अधिपती म्‍हणून घोषित करणे, परंतु त्‍यासाठी बाजीरावास शाहूची आणि इतर दोघांना किमान पेशव्‍याची तरी परवानगी लागली असती. योग्‍य वेळ आलेली आहे असे नानासाहेबाला वाटत नव्‍हते. महादजीला पेशवा (म्‍हणजे खरे तर नाना फडणीस ) तशी परवानगी देईल असा संभव नव्‍हता.

शिवाय बादशहाला नामधारी म्‍हणून तसाच ठेवून त्‍याद्वारे मराठी सत्ता वाढवावी असे शाहूसकट सर्वांनाच वाटत होते. त्‍यामुळे बादशहाला दूर सारून स्‍वतःच घाईघाईने दिल्‍लीपती होण्‍याची मराठ्यांना निकड भासली नाही. तसे करणे त्‍यांना त्‍या परिस्थितीत योग्‍यही वाटले नाही व आवश्‍यकही वाटले नाही.

( पुढे चालू )

— सुभाष स नाईक

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..