नवीन लेखन...

महाराष्ट्रात गोसंवर्धन मंत्री नेमण्याची मागणी

गोवंश हत्याबंदी कायदा केल्याविषयी युती शासनाचे अभिनंदन : आता महाराष्ट्रात गोसंवर्धन मंत्री नेमावा ! – वारकरी प्रबोधन महासमिती

नुकताच युती शासनाने गोवंश हत्या बंदी कायदा संमत केला. या कायद्याची मागणी वारकर्‍यांनी अनेक वर्षांपासून लावून धरली होती. काँग्रेस शासनाच्या काळात मुंबई-नागपूर अधिवेशनावर भव्य निषेध मोर्चे, जेल भरो आंदोलन, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना श्रीविठ्ठलाची पूजाबंदी अशा विविध तर्‍हेने प्रयत्न केले आहेत. अखेर या लढ्याला १९ वर्षांनी यश आले. त्याविषयी प्रथम युती शासनाचे मन:पूर्वक अभिनंदन ! गोवंश हत्याबंदी कायद्यापाठोपाठ आता महाराष्ट्र शासानाने विशेष गोसंवर्धन खाते तयार करून या क्षेत्रातील एका अभ्यासू तज्ञ व्यक्तीला गोवसंर्धन मंत्री म्हणून नेमावे, अशी मागणी श्रीवारकरी प्रबोधन महासमितीचे संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि अखिल भारतीय संत समितीचे महामंत्री ह.भ.प. रामेश्‍वर महाराज शास्त्री यांनी समस्त वारकर्‍यांच्या वतीने शासनाकडे केली आहे.

महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात हजारो कत्तलखाने काढून दरवर्षी कोट्यवधी देशी गायींची कत्तल होत आहे. देशी गोवंश नष्ट केला जात आहे. देश वाचावा, अशी वारकर्‍यांची भूमिका आहे. गाय, बैल वाचविले, तर शेती आणि शेतकरी वाचेल आणि देश वाचेल. अस्सल देशी गायीपासून पर्यावरण आणि आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी असलेले गोमूत्र, शेणापासून यार केलेले पंचगव्य, गोवर्‍या, तसेच दुध, दही, तूप मिळते. या सर्व गोष्टी हिंदु धर्मांत पवित्र मानल्या आहेत. यामुळे गीता, गंगा आणि गाय यांचे रक्षण झाले पाहिजे. स्वत: भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गायीच्या सेवेसाठी या देशात अवतार घेतला आहे.

राज्यात गोपालन करणार्‍या अनेक संघटना आणि गोप्रेमी व्यक्ती आहेत. शासनाने त्यांना सर्व सहकार्य करावे. गायी सांभाळणार्‍यांना आर्थिक साहाय्य करावे. गोशाळांसाठी वनखात्याच्या उपलब्ध असलेल्या जमिनी द्याव्यात. गायीचे अनन्यसाधारण महत्त्व शेतकर्‍यांना लक्षात यावे, यासाठी एक शासकीय समिती स्थापन करून राज्यभर शिबिरे घ्यावीत. ज्याप्रमाणे सांस्कृतिक मंत्रालय आहे, कुंभमेळ्यासाठी कुंभमेळा मंत्री आहे, तसेच गोसंवर्धन खाते तयार करावे आणि राजस्थानच्या धर्तीवर गोसंवर्धन मंत्री नेमावा, अशा आमच्या मागण्या आहेत. त्याचा शासनाने विचार करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

आपला नम्र,
रामेश्‍वर शास्त्री महाराज, अध्यक्ष,
श्रीवारकरी प्रबोधन महासमिती
संपर्क क्र.: ९८२२४४३६९०

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..