नवीन लेखन...

शिक्षणाच्या आयचा घो..!!

दि. ३० मेला १२वी एचएससी बोर्डाचा निकाल लागला. त्या अगोदर काही दिवस आयसीएसई बोर्डाचा निर्णय आला व त्याही अगोदर काही दिवस सीबीएसई बोर्डाचा रिझल्ट लागला. एकाच १२वीचे तिन तिन वेगळे रिझल्ट तिन वेगवेगळ्या दिवशी लागले.

‘बोर्डों के विविधता मे एकता’ ही घोषणा भारताच्या विविधतेच्या तालावर बोलण्याचे माझ्या कंठापर्यत येते पण मी ही राष्ट्रप्रेमाची उबळ मोठ्या कष्टाने आवरतो. कारण मला यात भविष्यातील फुटीची आणि विषमतेची बिजं दिसतात. एचएससी, सीबीएसई व आयसीएसई या तिनही परिक्षा एकाच देशात घेतल्या जात असल्या तरी, त्यांच्या अभ्यासक्रमात एकमेकांपेक्षा मोठा फरक आहे आणि हा फरक लहान मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या मनात आपली शिक्षण व्यवस्था, कळत की नकळत हे कळत नाही, पण ठळकपणे बिंबवते हे नक्की. जातीववस्थेचा शाप आणि ताप कमी आहे म्हणून की काय, देशाच्या भावी नागरीकांमधे आपण नविन शैक्षणिक आणि म्हणून मानसिक जातीव्यवस्था निर्माण करतोय की काय, अशी शंका घ्यायला भरपूर जागा आहे..

पूर्ण वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा..

https://www.facebook.com/nitin.salunke.1297/posts/1354803944574459

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..