नवीन लेखन...

नजर

एकदा एका कुटुंबाच्या समोरच्या घरात नविन भाडेकरु राहायला येतात.
खिड़कीतून त्यांचे दोरीवर वाळत घातलेले कपडे पाहुन बायको नवर्याकडे तक्रार करते की,
“लोक खुप चांगले आहेत पण ते कपडे स्वच्छ धुवत नाहीत”.
नवरा म्हणतो साबण संपला असेल.
दुसर्‍या दिवशी वाळत घातलेले कपडे पाहुन बायको परत तेच वाक्य म्हणते की,
“लोक खुप चांगले आहेत पण ते कपडे स्वच्छ धुवत नाहीत”
कदाचित तिला कपडे चांगले धुता येत नसतील.
नवरा फक्त ऐकून घेतो. असे रोजच चालते.
एक दिवस पहाते तर काय चमत्कार एकदम स्वच्छ धुतलेले कपडे पाहुन बायको नवर्‍याला म्हणते
“अहो ऐकलंत का?
समोरच्या वहिनी सुधारल्या.
त्यांना कुणीतरी कपडे धुवायला शिकवलेले दिसते.
आज कपडे अगदी चकाचक धुवून वाळत घातलेत”
तेवढयात नवरा बोलतो
“राणी, मी आज सकाळी लवकर उठलो आणि आपल्या खिडक्या साफ केल्या.
काचा आतून आणि बाहेरून ओल्या फडक्याने पुसून घेतल्या त्यामुळे तुला ते कपडे स्वच्छ दिसतात.
समोरचे रोजच कपडे स्वच्छ धुवत होते.
परंतु आपल्या खिडकीच्या काचा खराब असल्यामुळे त्यांची कपडे तुला खराब दिसत होती.
समोरचे नाही आपणच सुधारलोय.
आपला दृष्टीकोन स्वच्छ ठेवून आपण दुसर्‍या कडे पाहिले पाहिजे.
नेहमी नजर चांगली ठेवा,
जग खुप सुंदर आहे…

” विचार ” असे मांडा की, तुमच्या विचारांवर कुणीतरी  “विचार”केलाच पाहिजे
?

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..