नवीन लेखन...

जागतिक ई कचरा दिवस

पर्यावरण आणि मानवी आरोग्यासाठी धोकादायक ई-कचऱ्याची निर्मिती महाराष्ट्रात सर्वाधिक होते. दर वर्षी राज्यात सुमारे ५० हजार टना हून अधिक ई-कचरा तयार होतो. अधिकृत पुनप्र्क्रियेची क्षमता केवळ २४ हजार टन असून, अजूनही कचरा प्रक्रियेच्या बाबती राज्याचे चाचपडणेच सुरू आहे.

देशात सुमारे ५ लाख टन ई-कचरा दर वर्षी तयार होतो. महाराष्ट्राखालोखाल आंध्र प्रदेश, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात ई-कचरा तयार होतो. ई-कचरा निर्मितीत सर्वाधिक वाटा असलेल्या शहरांमध्ये राज्यातील मुंबई, नागपूर आणि पुणे या तीन शहरांचा समावेश आहे. मुंबई आणि पुणे परिसरातूनच दर वर्षी सुमारे २० हजार टन ई-कचरा गोळा होतो, अशी माहिती केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ताज्या अहवालातून देण्यात आली आहे.

आयटी कंपन्यांमधून मोठय़ा प्रमाणावर ई-कचरा तयार होतो. कॉम्प्युटर्सचे मॉनिटर, की-बोर्ड, माऊस, मोबाइलचे खराब झालेले सुटे भाग, बंद पडलेली इलेक्ट्रॉनिक उपकरणे ही ई-कचरा या प्रकारात मोडतात. टेलिव्हिजन, इलेक्ट्रॉनिक खेळणी, क्षमता संपलेले सेल, अशा अनेक वस्तू सामान्य कचऱ्यात मिसळून डम्पिंग ग्राऊंडपर्यंत पोचतात. राज्यात हजारो टन ई-कचरा पारंपरिक भंगारवालेच खरेदी करतात. अशा प्रकारचा कचरा खरेदी करण्यासाठी त्यांना परवानगी नाही आणि वैज्ञानिक पद्धतीने त्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्थाही त्यांच्याकडे नाही. ई-कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न त्यामुळे गंभीर वळणावर पोचला आहे. ई-कचऱ्यात असलेल्या पारा, शिसे, कॅडमिअम, क्रोमिअम, बेरिअम आणि ब्लॅक कार्बन अशा धोकादायक पदार्थामुळे होणाऱ्या दुष्परिणामांविषयी अजूनही जागरूकता नाही.

पर्यावरणाच्या दृष्टीने परिपूर्ण तंत्रज्ञान असलेल्या २३ उद्योगांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने अधिकृत केले आहे. मात्र, त्यांची पूनप्र्रक्रिया करण्याची वार्षिक क्षमता २४ हजार ३२० टन आहे, अशी माहिती मंडळातील सूत्रांनी दिली.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ई-कचऱ्याचे व्यवस्थापन करून तो नष्ट करण्यासाठी २००८ मध्ये काही नियम बनवले होते. २०१२ पासून ‘ई-वेस्ट मॅनेजमेंट अॅूण्ड हॅन्डलिंग अॅक्ट’ लागू झाला आहे, पण या कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होऊ शकलेली नाही. संयुक्त राष्ट्र पर्यावरण संरक्षण संस्थेच्या (यूएनईपीए) अहवालानुसार पुढील दशकभरात भारतासारख्या देशात मोबाइल फोन आणि कॉम्प्युटरमुळे तयार होणाऱ्या ई-कचऱ्याच्या प्रमाणात सुमारे ५०० टक्क्यांची प्रचंड वाढ होणार आहे. या कचऱ्याच्या पुनप्र्रक्रियेची किंवा तो नष्ट करण्याची व्यवस्था तोकडी असल्याने हा प्रश्न बिकट होण्याची शक्यता आहे.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4231 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..