नवीन लेखन...

वनवास

कोण म्हणतं वनवास दःखाचा होता?
तिथे तर राम फक्त माझा होता।
ती पर्णशाला उभारलेली त्याच्या समर्थ बाहूंनी
मीच तर होते – तिथली अनाभिषिक्त महाराणी
तिला प्रीतीच्या सुवास होता.. कष्टाचा सुगंध होता
कोण म्हणतं वनवास दुःखाचा होता?
कधी तो जायचा रानात दूर..
तेव्हा उरायचे मी नि माझं घर
मला एकांत सुसह्य व्हावा म्हणून
लता हसायच्या सुरेख फुलांच्या पाकळ्यातून
नि एखादा उतरायचा अंगणात दिगंचर
साद घालायचा मला हलकेच खुणावून
तिथला एकांत इथल्या परक्या गर्दीहून
फार वेगळा होता!
कोण म्हणतं वनवास दु:खाचा होता?
प्रत्येक दगडाशी पाऊल अडखळलं
राजधानीत परतताना
माझे मृत्तिकाकुंभ… तीन दगडांची चूल..
माझा संसार सोडताना
डोळ्यात अश्रू दडला होता
कोण म्हणतं वनवास दुःखाचा होता?
राजधानीत कृत्रिम कुंज नि उपवनं…
या नृत्यशाला – चित्रशाला मनोरंजनासाठी
यातलं काहीच नाही माझ्यासाठी
माझा रामसुध्दा
तो इथे फक्त एक सम्राट
निमी… ‘महाराणी’ ..फक्त जनकल्याणासाठी
मखमली पायघड्यांवर अदबीनं चालताना
मी आठवते – ते मुक्त विहरण
फुलातून… काट्यातून
त्यांचा हात तेव्हा माझ्या हातात होता।
कोण म्हणतं वनवास दुःखाचा होता?
तिथेच फक्त माझ्या स्वप्नांचा संसार होता!

सौ. राजलक्ष्मी देशपांडे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..