नवीन लेखन...

आज जडी-बूटी दिवस

वर्षाऋतुत आकाशातून अमृत धारा बरसतात. धरतीच्या कोखातून जीवनदायनी वनस्पती प्रगट होतात. भारतात १८,००० च्या वर औषधी वनस्पती आहेत. पण दुर्भाग्य या घटकेला फक्त ११०० वनस्पतींचा उपयोग आयुर्वैदिक औषधीत वापर होतो. याचा विपरीत चीन मध्ये तिथल्या १३००० वनस्पतींचा उपयोग चीनी हर्बल मेडीसीन मध्ये होतो. आज आयुर्वैदिक औषधींना जागतिक मान्यता नाही. कारण आधुनिक विज्ञानाच्या कसौटीवर औषधी वनस्पतींना पारखण्याचा प्रयत्न झाला नाही. जास्तीस्जास्त फूड सप्लीमेंट रुपात आयुर्वेदिक औषधी निर्यात होतात.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हि आयुर्वेदावर अनुसंधानचे कार्य फारच कमी झाले. त्याचे मुख्य कारण आंग्ल भाषेत कार्य करणाऱ्या कार्यपालिकेची गुलाम मानसिकता. विदेशी औषधी कंपन्यांचा दबाव आणि राजनेत्यांची अनिच्छा (आज हि जीएसटी एलोपेथी औषधींंवर ४ टक्के आणि भारतात निर्मित आयुर्वैदिक औषधींवर १८ टक्के) विचित्रच आहे ना. एकीकडे आयुर्वेदिक कंपन्यांंची अनुसंधानवर अब्जावधी रुपये खर्च करण्याची क्षमता नाही, दुसरीकडे सरकारस्तरावर कुठलीही अपेक्षा ठेवणे व्यर्थ. हि आजची परिस्थिती.

आपले सौभाग्य आजच्या दिवशी आचार्य बाळकृष्ण प्रगट झाले. (महान लोक प्रगट होतात). केवळ कागदी शिक्षण नव्हे तर गंगोत्री ते आसाम पर्यंतच हिमालय, उत्तर ते दक्षिण भारतातील जंगले, आपल्या पायदळी तुटवली. स्थानीयस्तरावर वापरल्या जाणार्या अनेक वनस्पती औषधींचे ज्ञान प्राप्त केले. आजच्या दिवशी त्यांनी आयुर्वेदिक अनुसंधान केंद्र उभारण्याचा संकल्प केला होता. आज पतंजलि रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये ३००च्या वर वैज्ञानिक आयुर्वेदात प्रयोग होणार्या वनस्पती आणि इतर घटक द्रव्यांवर अनुसंधान कार्य करीत आहे. ३००० जवळ वनस्पतींवर सध्या प्रयोग सुरु आहे. पतंजलि फूड पार्क मध्ये होणार्या नफ्याचा एक भला मोठा हिस्सा यावर खर्च होतो. एलोपेथी औषधीत प्रयोग होणारे घटक पदार्थ मानवी शरीरात कश्या रीतीने कार्य करतात, त्यांचे चांगले व वाईट परिणाम, औषध घेणार्याला माहित असते. त्याच प्रमाणे आयुर्वेदिक औषधांत वनस्पती मानवी शरीरात कश्या रीतीने कार्य करतात, हे कळल्यावर उत्तम दर्जाच्या औषधींंचे निर्माण शक्य होईल. लोकांचा आयुर्वेदावर विश्वास वाढेल. कमी खर्चात रोगराई दूर होईल. आयुर्वेदाला जागतिक मान्यता मिळेल. भारताचा औषधी निर्यात हि मोठ्या प्रमाणावर वाढेल.

आचार्य बाळकृष्ण यांनी आयुर्वेदावर तथा औषधी वनस्पतींवर अनेक पुस्तके तर लिहली आहेच. त्यांच्या पुस्तकांचे अनेक विदेशी भाषांत अनुवाद हि झालेले आहे. या शिवाय त्यांच्या नेतृत्वाखाली ५०,००० पेक्षा जास्त जुन्या संस्कृत आणि आयुर्वेदावर असलेल्या ग्रंथांचे डीजीटलाइजेशन झाले आहे, अजूनही कार्य सुरु आहे. अनेक जुन्या पांडुलिपींचे प्रकाशन झाले आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली World Herbal Encyclopedia ज्यात जगातल्या ६०,००० हून औषधी वनस्पतींचे वर्णन असेल, जगातील सर्वात मोठा ग्रंथ  (जवळपास १०० खंड) प्रकाशाचे कार्य सुरु आहे. पहिला खंड प्रधानमंत्रीच्याहस्ते काही महिन्यांपूर्वी प्रकाशित झाला होता. भारतातील औषधीय वनस्पतींच्या क्षेत्रात आचार्य बाळकृष्णच्या योगदानाच्या प्रीथर्थ त्यांचा जन्मदिवस जडी-बुटी दिवस म्हणून साजरा करणे सुरु केले आहे. आजच्या दिवशी पतंजलिचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पती वितरीत करतात. आज सामान्य जनतेच्या घरातल्या गमल्यांत गिलोय, एलोविरा पोहचली आहे.

आचार्य बाळकृष्ण यांच्या वाढदिवस निमित्त सर्वांना जडी-बूटी दिवसाच्या शुभेच्छा.

— विवेक पटाईत 

Avatar
About विवेक पटाईत 194 Articles
संवेदनशील मन, लेखन व वाचनाची आवड मराठीसृष्टी वर नियमित लेखन.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..