नवीन लेखन...

भारतमातेच्या वीरांगना – २७ – अहिल्याबाई रांगणेकर

१९४२ चा वणवा भारतभर पेटला. अहिल्याबाई त्यावेळी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज ला शिकत होत्या. विद्यार्थ्यांनी सुद्धा ह्यात भाग घ्यावा म्हणून सगळ्या विदयार्थ्यांना एकत्रित केले आणि “चलेजाव” चळवळीत भाग घेतला, साडे तीन महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागला. फ्लस्वरूप फर्ग्युसन कॉलेज ने त्यांना पुढील शिक्षणासाठी बंदी केली. […]

भारतमातेच्या वीरांगना – २६ – राजकुमारी गुप्ता

हम को जो करना था हमने किया…. किती शक्तीशाली वाक्य आहे हे, हे नुसतेच शब्द नव्हे तर ही कृती आहे. जी कुठल्याही परिस्थितीशी समझोता न करता केली गेली, वारंवार केली गेली. इतक्या पक्क्या विचारांच्या होत्या आपल्या भारतमातेच्या वीरांगना राजकुमारी गुप्ता. […]

भारतमातेच्या वीरांगना – २४ – कुंतला कुमारी सबत

“ह्या इंग्रजी सरकारचे डोके तर ठिकाणावर आहे ना?” “ने मजसी ने परत मातृभूमीला….” “राष्ट्रस्वातंत्र्य द्या, हिंदभूला नवे! धर्म-स्वातंत्र्य तें हिंदभूला हवे! ज्ञानस्वातंत्र्य ती प्रार्थुनी मागते! हिंदभू वांछिते सकल स्वातंत्र्य तें!” लेखणीची धार ही नेहमीच आपले काम चोख बजावत आली आहे. आपल्या स्वातंत्र्य संग्रामात या लेखणीने खूपच मोलाची कामगिरी बजावली आहे, मग ती टिळकांची लेखणी असो ज्यांनी […]

भारतमातेच्या वीरांगना – २२ – कॅप्टन लक्ष्मी सहगल

सिंगापूर मध्ये अनेक भारतीय क्रांतिकारी कार्यरत होते. १९४२ साली ब्रिटिशांनी सिंगापूरवरचा आपला ताबा सोडला, जपान कडे सिंगापूर परत आले. त्यावेळी तिथल्या जखमी सैनिकांना वैद्यकीय उपचार करण्याचे काम डॉ लक्ष्मी ह्यांनी केले. […]

भारतमातेच्या वीरांगना – २१ – डॉ उषा मेहता

१४ ऑगस्ट १९४२ साली उषाजी आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी काँग्रेस गुप्त रेडिओ स्टेशन सुरू केले. त्याची सुरवात उषाजींच्या आवाजाने झाली, ‘हा काँग्रेस रेडिओ आहे ४२.३४ मिटर्स भारतातून’. ह्या वरून गांधीजींचे विचार, इतर मोठ्या नेत्यांचे विचार, देशभक्ती पर गाणे, कविता इत्यादी प्रसारित केले जायचे. इंग्रजांच्या तावडीतुन बचाविण्यासाठी हे आपल्या रेडीओची जागा जवळपास रोज बदलायचे. एवढी काळजी घेऊनसुद्धा इंग्रजांच्या हाती हे प्रकरण लागले. १२ नोव्हेम्बर १९४२ साली उषाजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अटक झाली आणि ४ वर्ष सश्रम कारावास दिला गेला. […]

भारतमातेच्या वीरांगना – २० – बसंती देवी

पुढे येणाऱ्या काळात त्यांनी आपल्या नणंदा उर्मिला देवी आणि सुनीता देवी ह्याच्या बरोबर ‘नारी कर्म मंदिर’ ची स्थापना केली. हे एक प्रशिक्षण केंद्र होतं, नव्याने क्रांतीत उडी घेणाऱ्या महिलांसाठी. विविध क्रांतिकारी चळवळीसाठी लागणार पैसा मग त्यात सोन्याचे दागिने असो किव्हा पैसा असो, गोळा करणे ह्यात त्यांचा हातखंडा होता. असहकार चळवळ सगळीकडे पेट घेत होती, त्याचाच एक भाग म्हणजे स्वदेशी, खादी प्रचार आणि विदेशी वस्तूंची होळी. कलक्त्याच्या रस्त्यावर उतरून बसंती देवींनी खादी विकली आणि त्यासाठीच त्यांना तुरुंगवास झाला. […]

भारतमातेच्या वीरांगना – 19 – बिना दास

बिनाजींचा पदवीदान समारंभ त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. त्या समारंभ साठी बंगाल चे गव्हर्नर स्टेनली जॅक्सन येणार होते. बिनाजीं ने आपल्या सह क्रांतिकारी कमला दास गुप्ता ह्यांच्याकरवी एक पिस्तुल मिळवले. स्टेनली जसे सभागृहात आले त्यांच्यावर बिना जींने गोळी झाडली, ती त्यांना न लागता त्यांच्या कानाजवळून गेली आणि स्टेनली जमिनीवर झोपले. […]

भारतमातेच्या वीरांगना – 18 – भीकाजी कामा

२२ ऑगस्ट १९०७ साली जर्मनीत झालेल्या दुसऱ्या समाजवादी काँग्रेस अधिवेशनात कामा ह्यांनी भाग घेतला. मानवी हक्क, समानता आणि स्वातंत्र्य ह्या मुद्यावर उपस्थित लोकांना त्यांनी भारताकडे पाहायला प्रेरित केले. भारताचा स्वातंत्र्य हा हक्क आहे हे उपस्थितांना जाणवून दिले. ह्याच अधिवेशनात त्यांनी स्वतंत्र भारताचा तिरंगा फडकवला. आत्ताचा तिरंगा हा मॅडम कामा आणि इतर उपलब्ध डिझाईनचे तिरंग्याचे सुधारित रूप आहे. […]

भारतमातेच्या वीरांगना – 17 – अवंतीकाबाई गोखले

पहिल्या गोलमेज परिषदेवर भारताने बहिष्कार टाकला आणि त्यानंतर २६ ऑक्टोबर रोजी आझाद मैदानावर ध्वजारोहण करण्याचे ठरले. अवंतीकाबाई १३ व्या तुकडीचे नेतृत्व करत होत्या. त्यांनी सकाळी ८.१५ ला ध्वजारोहण केले. दुसऱ्या दिवशी पालिकेच्या सभेला हजर असतांना त्यांना अटक झाली आणि ६ महिने कैद व ४०० रुपये दंड करण्यात आला. […]

भारतमातेच्या वीरांगना – 16 – तारा राणी श्रीवास्तव

१२ ऑगस्ट १९४२ भारत-छोडो आंदोलनाचे पडसाद देशभरातून उमटत होते. ताराराणी आणि त्यांचे पती श्री फुलेंदू बाबू ह्यांनी हेच औचित्य साधून एक पद-यात्रा काढायचे ठरवले. सीवान पोलीस चौकीवर तिरंगा फडकणे हा उद्देश ठेऊन. ह्या अश्या पदयात्रांवर ताबा मिळविण्यासाठी पोलिसांनी लाठी चार्ज सुरू केला. त्यानेही गावातली लोकं मागे सरली नाही, तेव्हा पोलिसांनी ह्या सगळ्या निःशस्त्र लोकांवर गोळ्या झाडायला सुरवात केली. फुलेंदू बाबू आणि ताराराणी आघाडी सांभाळत होते. फुलेंदू बाबूंना गोळी लागली. आपल्याच साडीचा तुकडा जखमेला तात्पुरता बांधून तारा राणींनी आपली यात्रा परत सुरू केली. […]

1 2 3 4 5 6
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..