नवीन लेखन...

।। सद्गुरु श्री राऊळ महाराज ||

गुरुतत्त्व मासिकाचा फेब्रुवारी महिन्याचा अंक हा सद्गुरु श्री राऊळ महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित आहे. महाराजांचे चरीत्र वाचन करताना आपल्याला त्याची अनुभूती येईलच. हे सर्व संत माहात्म्ये हे गुरुतत्त्वाचेच अवतार आहेत. जे मनुष्याला अध्यात्मिक प्रगती करून देण्यासाठी स्वतः खडतर असे जीवन जगून कुठल्याही परिस्थितीत साधना करून परमार्थिक उन्नती करुशकतो याचे मार्गदर्शन करीत असतात. सर्व सामान्यपणे जीवन […]

गुढी पाडवा – माहात्म

सनातन भारतीय संस्कृतिनुसार वर्षातील साडेतीन मुहूर्त अतिशय महत्वाचे आहेत. गुढीपाडवा, अक्षयतृतीया व विजयादमी हे पूर्ण मुहूर्त आहेत. कार्तीक शुक्ल बलि प्रतिपदा हा अर्धामुहूर्त आहे. या दिवशी कार्यरंभ केल्यास कार्य सिध्दीस जाते. हा अनेक भाविकांचा अनुभव आहे. वर्षातील पहिला मुहूर्त गुढीपाडवा होय म्हणूनच याला विशेष महत्व आहे. वर्ष भरा चे सद्संकल्प या दिवशी करावयाचे असतात. सृष्टीच्या निर्मितीचा […]

।। श्री राम समर्थ ।। समर्थांचा स्त्री दृष्टीकोन व समर्थ शिष्या

“जाम समर्थ” या समर्थांच्या जन्मगावी श्रीराम मंदिर आहे. तेथे जगातील १० वे आश्चर्य अनुभवावयास येते. तेथे सीतामाई श्रीरामांच्या उजव्या बाजूस उभ्या आहेत व येवढेच नाही तर तेथे लग्नकरुन पहिल्यांदा दर्शनास आलेल्या नवरदेवाने आपल्या नवविवाहित पत्निस नमस्कार करावा लागतो हा प्रघात आहे. ही पुरुष प्रधान संस्कृतीला बगल देणारी प्रथा ४५० वर्षापूर्वी श्री समर्थांनी आपल्या राममंदिरात घालून तत्कालीन […]

अध्यात्मात सद्गुणांचे महत्व

मार्गांधारे वर्तावि । विश्व हे मोहोरे लावावे ।। या ज्ञानदेवांच्या उक्तीप्रमाणे पू. स्वामी स्वरुपानंदाचे जीवन होते. सहज बोलण्यातून, अत्यंत हळुवारपणे ते साधकाला मार्गर्शन करीत असत. या सर्वांतून सर्वांच्या साधनेला गती मिळत असे. मानवी जीवन हे निवृत्ती व प्रवृत्तीच्या किनाऱ्यातून वाहत असते. साधकही या गतिमान जीवनात हेलकावे घेत असतो. तेव्हा आपले ज्ञानेश्वरी, दासबोध, श्रीमद्भागवतासारखे ग्रंथ, संतांचे अभंग, […]

सदगुरु श्री स्वामी स्वरूपानंद

घरातील सांप्रदायिक वातावरणामुळे पारमार्थिक संस्कार लहानपणापासून झाले होते. ते अलौकिक बुद्धिमत्तेमुळे विविध विषयांत पारंगत होत होते. रामचंद्रांना संस्कृत विषयात रस होता. एकीकडे त्यांचे आध्यात्मिक विषयांचे वाचन, श्रवण, मनन, निदिध्यास सुरु होते, तर दुसरीकडे त्यांच्या शैक्षणिक जडणघडणीच्या काळात पारतंत्र्याच्या जोखडाखाली सापडलेल्या भारत देशात स्वातंत्र्याचे वारे वाहत होते. तरुणाई नवचैतन्याने भारुन गेली होती. […]

एका महासिद्धाचे जीवनदर्शन

स्वामी स्वरूपानंद आत्मज्ञानी होते. आत्मज्ञानी मनूष्य ब्रह्मज्ञानाच्या तेजोवलयात वास करीत असतो. तसे स्वामी होत. म्हणून जनात असूनही ते जनावेगळे होते. हाडामांसाचा देह त्यांनी धारण केला होता. तथापि त्याच्या बंधनात ते वावरले नाहीत. किंबहुना हाडामांसाचा देह ज्या पंचतत्त्वांपासून निर्माण होतो त्या पंचतत्त्वाशी त्यांनी एकरूपता साधलेली होती. त्यामुळे ते श्रीमंतीचे वैभवही भोगत होते आणि दीन दरिद्री दुःखी, दुबळ्यांची आर्तताही आत्मीयतेने जाणत होते. एक विराट विलक्षण तथा सहज, सामान्य या सगळ्यांची राखण करून प्रेमाने ओतप्रोत भरलेले जीवन ते जगत होते. […]

बेळगांव निवासी प. पू. आई श्री कलावतीदेवी यांच्या सहवसातील अनुभव

प. पू. आईंचा अनुग्रह घेतल्यापासून माझ्या आईचे मन त्यांनी घालून दिलेल्या भजनाच्या नेमामध्ये स्थिर झाले आणि तिचा आणि तिच्यामुळे माझा (माझी शाळा सांभाळून) भजनाचा नेम चालू झाला. देवाच्या कृपेने माझ्या आईचा व माझा आवाज चांगला असल्यामुळे आम्ही भजनात उंच पट्टीत भजन म्हणायचो. भजनात सतत आमचा आवाज येत असल्याने आमच्या समोर आई भजनाच्या वेळेत येऊन बसायच्या त्यावेळी मध्येच डोळे उघडून न्याहाळणी करायच्या. त्यावेळी आईंनी आमच्यावर टाकलेल्या कृपाकटाक्षाने आम्हाला भजन म्हणण्यात अधिक स्फूर्ती मिळावयाची. […]

प. पू. आईंचे भजन-चिंतन

प. पू. माता कलावती या थोर महिला संत ज्या प. पू. सिद्धारुढ महाराजांच्या कृपांकीत होत्या. प. पू. महाराजांनी त्यांना वेदांताचे तत्त्वज्ञान शिकवले आणि सर्वसामान्य अज्ञजन महिलांसाठी कीर्तनसेवेतून उद्धार करण्याच्या परिस्थितीतून त्यांनी स्वतःचा एक शिस्तपूर्ण भजन संप्रदाय निर्माण केला. आज देश विदेशात लाखो भक्त त्यांच्या आज्ञेनुसार सामुदायिक भजनोपासना तसेच बालकांसाठी बालोपासना करत आहे. श्रीगुरूतत्त्वाची अनुभूती ही घेत […]

परमपूज्य सद्गुरु कलावती आई – (संपादकीय)

संत, महात्मे, सद्गुरु हे पृथ्वीतलावर जन्म घेऊनी प्रचार-प्रसार करीत आहे. त्याचा उद्देश हाच आहे की प्रत्येक जीव हा शीव व्हावा म्हणजे आनंदी व्हावा त्यासाठी त्याने साधना करावी यासाठी पृथ्वीतलावरील प्रत्येक संत मार्गदर्शन करीत असतो. असेच मार्गदर्शन करुन परमपूज्य आईंनी भक्तांना “भक्ती करीत भगवंत” होण्यासाठी मार्गदर्शन केले त्याप्रमाणे साधना करून घेतली. […]

श्री स्वामी समर्थ अवतार रहस्य – अलौकिक व कर्तृत्व

अनादी काळापासून भारतीय संस्कृती ही श्री दत्त अवतारांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे. त्यांच्या आत्मज्ञानाचा, ब्रह्मज्ञानाचा संजीवन प्रवाह विश्वाच्या स्पंदनातून, चराचरातुन अखंड अविरतपणे धर्मरक्षणासाठी कार्य करीत आहे. श्री. दत्तात्रेयांचा पहिला अवतार सत्ययुगात महान तपस्वी श्री. अत्रीऋषी आणि महापतिव्रता साध्वी श्री. अनसुया यांच्या तपोबलामुळे झाला. व तो अखंड, शाश्वत. चिरंतन अवतार असल्याने त्याच परंपरेत त्यांचा अवतार मानले जाणारे […]

1 2 3
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..