नवीन लेखन...

निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग अठ्ठावीस

जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे चौतीस
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा
निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग अठ्ठावीस

बाबा सांगतात…

बाबा म्हणजे आप्त म्हणजेच ग्रंथकार सांगतात,
सज्जन मित्रांशी मोठ्या प्रीतीने स्नेह करावा आणि दुर्जनापासून लांब रहावे.
हिंसा, चोरी, व्यभिचार, चहाडी, अप्रिय, असत्य आणि असंबद्ध भाषा, दुसऱ्याचा नाश करण्याची बुद्धी, मात्सर्य, आणि शास्त्र विरूद्ध विचार ही दहा प्रकारची पापकर्मे होत. यांचा काया, वाचा आणि मनेकरून त्याग करावा.

या सर्व उपदेशात्मक उपचारांना हितोपदेश असे म्हटलेले आहे. जसे योग शिकताना, अष्टांग योगामधील यम नियम प्रथम पाळायचे असतात, त्यानंतरच त्यापुढील आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी या अंगांचा विचार करावा. तसेच आयुर्वेद शिकताना प्रथम हितोपदेश शिकावा, आचरावा, कृतीत आणावा. म्हणजे पुढील उपचार शिकणे सोपे असते.

आजच्या काळात हे नियम पाळणे शक्य आहे का, असे म्हणून नियम टाळणे तर नक्कीच समर्थनीय नाहीत. काळानुरुप यात बदल अवश्य करावेत, पण ग्रंथातील मूळ सूत्र सोडू नये.

ही दहा पापकर्म सांगितलेली आहेत.
ही अशा प्रकारची कर्मे करू नयेत. असं सांगण्याचं कारण, कथनी और करनी मे यदी एकता नही है तो मन मे खोट जरूर पैदा होती है । जे आत असेल तेच बाहेर येते.

विहिरीत किंवा टाकीमधे जे पाणी असते, बाहेर काढल्यावर तेच पाणी येणार ना. आपल्याला जर चांगले पाणी हवं असेल तर जिथून घेणार तो मूळ स्रोतदेखील चांगलाच हवा. म्हणजेच मन स्वच्छ असेल तर मनात काही पापभावना नसतील तर शरीरातील दोष देखील जरा अपथ्य झालं तरी संतुलीत रहातात. कारण या मनाचा संबंध थेट हार्मोन्सशी आहे. मन स्थिर आणि उच्च विचारांनी प्रेरीत असेल तर अंतःस्रावी ग्रंथींची कामे देखील स्थिर आणि उच्च दर्जाची होतात.

या प्रत्येक शब्दावर भाष्य करण्याची आवश्यकता वाटत नाही. कधी कोणाची शाब्दीक हिंसा देखील करू नये, कठोर बोलू नये, हे गांधीनी पण सांगितले होते. पण भविष्यातील सोय पाहून, सर्वधर्म समभावच्या नावाखाली काही ठिकाणी गांधींनी सोयीस्कर दुर्लक्ष देखील केले होते. या असत्याचाच राग पुढे व्यक्त झाला असे आफळेबुवांच्या एका किर्तनात ऐकले होते. नरो वा कुंजरो वा असे म्हणून धर्मराजाने देखील असत्य भाषण केले होते, ज्यामुळे त्याचा रथ पुढे स्वर्गापासून दोन बोटे लांब राहीला होता. नुकसान झालेच होते. याच असत्यामुळे गांधीना आपला प्राण गमवावा लागला होता, हे सत्य लक्षात घ्यावे.

भविष्यात आपल्याला जे संभाव्य आजारपण येणार आहे, त्याचा आतापासूनच नीट विचार करावा. यासाठी आपल्याला उपयोगी होणाऱ्या मंडळींना प्रेमाने जिंकून घ्यावे. ही माणसे तुटु नयेत, यासाठी प्रयत्नशील रहावे. प्रयत्न करूनही काही फायदा होत नसेल तर समजावणे सोडून द्यावे. भविष्यात येणाऱ्या आजारपणात, आपत्तीत जी माणसे उपयोगी ठरतील अशांना हाताशी धरावे.

केवळ आपलेच नव्हे तर आपल्या पुढच्या पिढीचे हित कशात आहे, हे ओळखून पावले उचलावीत.

या हितोपदेशांचा आजच्या राजकीय परिस्थितीशी काहीही संबंध नाही. असे आढळून आल्यास तो केवळ योगायोग समजावा.

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..