नवीन लेखन...

माती

आज डोळे उघडताना
रंगलेले दिसले सनईचे सूर
पहाटेच्या क्षितीजावर…

सातच पावलं चालून
मी पोचले आभाळाकडे
पण देहाचं नातं मातीशी
अजून तुटलं नाही…
तसं काहीच विसरले नाही,
विसरता येणार नाही
या मातीनंच माझे घुंगुरवाळे मळवलेत
हळूवार खेळवलेत…

माझ्या कणाकणात मिसळलेली ही माती..
आठवतंय – श्रावणातल्या धारांनी ही माती थरारताना
माझा कणन्कण झेलायचा तिचा शहारा
वसंतात ती यायची उमलून
वेलीतून –फुलाफुलातून
तेव्हा नकळत गाणं उमलायचं
..माझ्याही ओठातून
तिची शिशिरी शुष्कता उदास करायची मलाही
आठवतंय, स्वप्न तिच्यात मिसळून
मी केली होती स्वप्नांकित बोळकी, भांडी
एक छोटीशी चूल
आणि एकटीनंच होतं उभारलं
एक सुंदर घरकूल

या मातीतच !
आज पुसल्यायत खुणा म्हणून काय झालं?
माझ्या सातव्या पावलाशी माती अवघडली तेव्हा तिला मी म्हटलं
“अशी होऊ नकोस वादळी या वळणावरती
मी काहीच विसरले नाही…विसरता येणार नाही बघ,
मी मांडलेल्या सोन्याच्या संसाराला
अजून गंध येतोय –
ओल्या मातीचा !”

-सौ. राजलक्ष्मी देशपांडे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..