भारतावर परचक्र आलेलं आहे याची किती लोकांना कल्पना आहे ? आपण परकीयांची गुलामगिरी स्वेच्छेने पत्करली आहे याची किती लोकांना जाणीव आहे ? ही गुलामगिरी बौद्धिक, आर्थिक, औद्योगिक व सांस्कृतिक आहे हे किती लोकांच्या लक्षात आलं आहे ? अन् अशा तर्हेची गुलामगिरी राजकीय पारतंत्र्याइतकीच भयानक आहे. याचा किती लोकांनी विचार केला आहे ? […]
एक गोष्ट आम्ही ध्यानात घेत नाहीं, अन् ती ही की भारताचा एकएक प्रांत युरोपातल्या एकएक देशाएवढा आहे. युरोपात एखादी भाषा जेवढ्या लोकांची मातृभाषा आहे, तेवढ्याच, किंवा संख्येने त्याहून अधिक लोकांची कुठलीही एक भारतीय भाषा ही मातृभाषा आहे. […]
प्रस्तुत लेखकानें १९९३ सालीं जागतिकीकरणातील धोक्यांविषयीं एक लेख लिहिला होता, व तो ‘जागतिक मराठी अकादमी, बडोदा चॅप्टर’ यांच्या ‘संवाद’ या अनियतकालिकात १९९४ मध्ये प्रसिद्ध झालेला होता. परिस्थितीत , या १९९३च्या लेखाची पुनर्भेट प्रस्तुत लेखकाला आवश्यक व उपयुक्त वाटली. कांहीं तत्कालीन कारणांनें हा लेख भाषणसदृश लिहिलेला आहे, हें ध्यानांत घ्यावें. तसेंच, परकीय जन हे कसे भारतीय विचारांवर परिणाम करत आलेले आहेत, याचा ऊहापोह इतिहासात जाऊन, लेखाच्या सुरुवातीच्या भागात, केलेला आहे, याचीही वाचकांनी नोंद घ्यावी. […]
भारतीय भाषांचा विचार करतांना, भारतीयांचं बहुभाषिकत्वही विचारात घ्यायला हवं. अगदी २००० वर्षांपूर्वी पाहिलं तरी, संस्कृतच्या बरोबरच पाली व अर्धमागधी व शौरसेनी, पैशाची, महाराष्ट्री ह्या भाषा अस्तित्वात होत्या. […]
आपण भाषेच्या शुद्धपणाचा परकीय भाषेच्या संदर्भात विचार केला. आतां आपण त्याचा विचार लोकभाषेच्या दृष्टीकोनातून करूं या. त्यावरून पाहूं या, इंग्रजी भारतीय भाषांचं अस्तित्व नाहीसं करून टाकील, असा निष्कर्ष निघतो कां तें. आपण आधी पाहिलंच आहे की जी लोकभाषा असते, ती टिकून राहते, कारण ती जनसामान्यांची भाषा असते. तिला प्रतिष्ठा असो वा नसो, पण तिचं अस्तित्व टिकून राहतं. […]
लहानपणी सर्वाना गोष्टी ऐकायला किंवा वाचायला आवडतात. गोष्टीमधून आपण एका नवीन दुनियेची सफर करून येतो. जसे आपण मोठे होतो, तसे आपण कामामध्ये अडकत जातो आणि लहानपणातील गोष्टीच्या दुनियेतून बाहेर पडून वास्तविक दुनियेत रमून जातो. […]
मनुष्य स्व इच्छेने जगतो मग इच्छा अनुसार झाले की सुख आणि इच्छा अपूर्ण असल्याचे दुख. फक्त सुख आणि दुख म्हणजे जीवन नव्हे. जीवन म्हणजे जगण्यातील जिवंतपणा आणि तो आज नाहीसा झालेला दिसतो. जे खरे जीवन आहे ते प्रकृतीचे व वास्तवातले आणि खोटे ते कल्पनेतले मग जरा विचार करूया या जीवनामध्ये जगण्या इतके आपले आयुष्य असते तरी किती ? जर साठ वर्ष धरले तर वीस वर्ष झोपण्यात गेले, दहा वर्ष बालपण , दहा वर्ष career साठी, शेवटचे दहा वृद्ध अवस्थेत पश्य ताप करत बसण्यात. राहले दहा, व्यर्थ गोष्टी व मूर्खपणा जाणे केवळ वेळ वाया जातो अशा गोष्टी साठी पाच वर्ष. राहले पाच मग इतकेच असते जे जगायला मिळते हो फक्त इतकेच. मग असे ही एक वेगळं जीवन आहे, ते थोडं भिन्न व नैसर्गिक जे प्रकृती अनुसार असते. […]
आज सिमेंट च्या जगलात माणूस नुसता कोडातलाय त्याला रात्र न दिवस फक्त आणि फक्त पैसा एके पैसा च दिसतो बारा बारा तास काम करून येऊन साधी झोप पण नीट घेईना झालाय आजच माणूस. […]
आमची संस्कृती नष्ट होत चालली आहे असं आमचे विचारवंत म्हणतात. पण इतिहास वेगळंच चित्र दाखवतो. परदेशी विद्वानही म्हणतात की भारतीय वांशिक समुह आपल्या संस्कृतीचं वेगळेपण नेहमी जपत असतो. म्हणूनच आमची संस्कृती व आमची भाषाही नष्ट होण्याचा पुढलया शतकात तरी कांहींहीं संभव दिसत नाहीं. […]
ज्या इंग्रजीच्या आक्रमणाची आपल्याला एवढी धास्ती वाटते, तिचंच उदाहरण पाहूं. इंग्रजीनं अनेक शब्द इतर भाषांमधून मुक्तपणे घेतले आहेत आणि त्यामुळे इंग्रजी भाषेची प्रगतीच झालेली आहे […]