आज कित्येक मुल शिक्षणापासून वंचित आहेत. ग्रामीण भागातील परिस्थिती एवढी विपरीत आहे कि शिक्षण नावाचे अक्षरही त्या आईवडिलांना माहित नसते ,अडाणी आई वडिलांना शिक्षणाचे महत्व माहित नसल्याने त्यांच्या मुलांना देणे हि त्यांना आवश्यक नाही वाटत आणि ज्याना शिक्षणाचे मोल आहे त्या पालकांचे शिक्षणाच्या अवास्तव खर्चापायी मुलांना शिकवायचे स्वप्न स्वप्नच राहून जातात . […]
गणपती, दसरा- दिवाळी या सणासुदीच्या दिवसांनंतर पुण्यात संगीताचे वेगवेगळे महोत्सव एकानंतर एक चालु असतात. सवाईगंधर्व भीमसेन संगीत महोत्सव, स्वरगंधार आणि शेवटी वसंतोत्सव. सवाईच्या सीझन तिकीटसाठी आतुन फिल्डिंग लावल्यास लाईनमधे उभे राहण व निराशा टाळता येउ शकते, स्वर गंधारमधे स्टुडंट डिस्काउंट असते तर वसंतोत्सव चक्क फ्रीच असतो. तिन्ही कार्यक्रमांसाठी खचाखच गर्दी होत असते. झुंडीने होणार्या ह्या गर्दीत दर्दी आणि “बेदर्दी” दोन्ही गटांचे सभासद आढळतात. […]
आदर्शवत भारतीय संस्कृतीला लागलेला एक काळपट डाग म्हणजे “हुंडा पद्धती” असे म्हणता येईल. परंपरेने चालत आलेला हा प्रकार आज २१व्या शतकात देखील तेवढ्याच भयानतेने भारतीय संस्कृतीवर आघात करतो आहे.कारण आज सद्यस्तिथीचे सामाजिक चित्रण पाहता आजदेखिल बऱ्याच ठिकाणी प्रत्येक्ष अप्रत्येक्ष पणे हुंडा पद्धतीचा अवलंब केला जात आहे. […]
म्हातारपण म्हणजे झाडाचे सुकलेले पण वादळ आल कि कधी गळून पडेल काही सांगता येत नाही मग त्यांना अपेक्षित असलेले प्रेम त्यांना का मिळू नये म्हातारपण म्हणजे भिजलेल्या पापण्याचेच का असते ? हृदयात असंख्य दुखाचे आसवे का वाहतात ?शेवटी आईवडील म्हातारे झाले म्हणून ते दुल्क्षित करू नका या जगात निस्वार्थी प्रेम करणारे तेच आहेत त्यांच्या आयुष्याचे शेवटचे पण दुखाचे नको तर सुखाचे बनवा […]
सध्या लोक हसायला विसरले आहेत.सतत सगळे काळजीमध्ये दिसतात.चिंता करायची काहीच गरज नहिये,कारण दुःख सगळ्यांनाच असतात,काही लोक दाखवतात काही लोक उत्तमप्रकारे लपवतात.दुःख कोणाला चुकलेल नाहीये ते कोणामधे भेदभाव नाही करत.श्रीमंत लोकांना पण असत आणि गरिबांना पण.दुःख दुःख करुन एवढ सुंदर आयुष्य जगायच सोडून द्यायच का?? […]
जर तुम्हाला एकाएकी खुप पैसे मिळाले तर तुम्ही तुमचे आयुष्य कसे बदलाल?? या प्रश्नाच उत्तर देताना जर तुमचा पहिला निर्णय नोकरी सोडून देईन असा असेल तर ही धोक्याची सूचना आहे हे लक्षात घ्या. अनेक यशस्वी लोकांची जेव्हा तुम्ही आत्मचरित्र वाचाल तेव्हा तुम्हाला कळेल, त्यांनी कामाची एवढी गोडी लावून घेतली होती की ते काम करताना त्यांना खूप मज्जा येत होती किंवा त्यांनी असे क्षेत्र निवडले ज्याची त्यांना आवड होती त्यामुळे ती काम त्यांनी मनापासून केली आणि हेच त्यांच्या यशाचे रहस्य होते. […]
आपल्या ऊर्जेचा आणि वेळेचा जास्तीत जास्त वापर आपण आपल्यात बदल घडवण्यात म्हणजे स्वतःला आधी पेक्षा चांगले बनवण्यात करायला हवा म्हणून झालेले गेलेले सगळे विसरुन जा आणि आयुष्याच्या वाटेवर पुढे सकारात्मक वाटचाल करा. […]
‘तो’ चहा की ‘ती’ चहा, हा प्रश्न तसा माझ्या मनात नेहेमीच उभा असतो. अगदी ‘टू बी आॅर नाॅट टू बी’च्या धर्तीवर. कुणाला विचारावं, तर काय वेड लागलंय का माणसाला, अशा पद्धतीने बघण्याची भिती. पण धीर करुन काही दिवसांपूर्वी मी तो फेसबुकवरच्या माझ्या मित्रांना विचारायचं ठरवलं आणि लगेच विचारलाही. आणि त्या अवघ्या चार शब्दांच्या प्रश्नांवर घनघोर कमेंट्सही आल्या. […]
उदात्त प्रेम आज का निपजत नाही? पूर्वीची प्रेमगीते ही उदात्त होती, संस्कारक्षम होती, शरीर स्पर्शसुध्दा नव्हता. नग्नता मनाला शिवतही नव्हती. सौंदर्याचे आयाम इतके बदलले की केवळ नग्नतेच सौंदर्य शोधणं सुरु झाले. नग्नतेपलिकडेही काही सात्विक, सुंदर आहे, सत्य आहे, शिवासारखे आहे हे जाणवायला हवं तरच विकृती संस्कृतीवर मात करणार नाही. […]
महात्मा गांधी आज अनेकांना हवे आहेत, अनेकांना नको आहेत. आऊटडेटेड माणसं व तत्वज्ञान आजच्या परिस्थितीत वापरुन तरुणांना काही संदेश देतांना आजच्या परिस्थितीत relevance, त्याचं दाखवता आलं तरी पुरेसं आहे. महात्मा आज बंदिस्त झाले आहेत. नोटात महात्मा, फोटोत महात्मा, मात्र प्रत्यक्ष जीवनात सगळा खोटाच व्यवहार. […]