नवीन लेखन...

विविध विषयांवरील वैचारिक लेखन

निरंजन – भाग १८ – निंदा

एखाद्याने केलेली निंदा ही ऐकणार्‍याने सकारात्मकतेने ऐकली तर बरे… नाहीतर एखादी व्यक्ती आधीच स्वत:च्या विचारांनी व्यापलेली असेल तर्…काही चांगले न होता त्याच्याकडुन बरेच असे वाईट घडुन जाते. म्हणुनच खरेतर ही म्हण “निंदकाचे घर नसावे शेजारी” अशी असायला हवी.  […]

निरंजन – भाग १७ – आस्तिकता

आस्तिकता म्हणजे परमेश्वराच्या भव्यदिव्य अखंड अस्तित्वावर असलेला विश्वास आणि निस्वार्थ अशी भक्ती…. अक्कलकोट मधलीच एका गोविंद नावाच्या देव-दैव न मानणार्‍या नास्तिक इसमाची ही गोष्ट.. […]

एकाकी लढा

आपला समाज कुटुंबरचनेचा पुरस्कार करतो. सर्वसाधारणपणे दोन-तीन पिढ्या एकत्र रहात असलेली कुटुंबे दिसतात. विस्तारामुळे कुटुंब विभक्त झाली तरी नाती दृढ राहतात. वेळप्रसंगी एक होतात मदतीसाठी, सांत्वनासाठी वा आनंद साजरा करण्यासाठी. असे असले तरी याला अपवाद सापडतात. अशीच एक घटना माझ्या मनाला अस्वस्थ करणारी ठरली. […]

स्तुत्य आणि अनुकरणीय वाट !

कोरोनामुळे जग बदलत आहे, अजूनही बदलणार आहे. जगण्याच्या विविध क्षेत्रांवरच नाही तर सामाजिक परंपरा आणि चालीरीतीवरही याचा परिणाम होत आहे, यापुढेही तो होणार आहे. मात्र, हा बदल महाराष्ट्रातील जनता लढाऊ वृत्तीने आणि सामाजिक जाण भान जपत स्वीकारत आहे, ही बाब कौतुकास्पद म्हणावी लागेल. आषाढी एकादशी आणि वारीच्या निमित्ताने त्याचा प्रत्यय आला. लाखो विठ्ठलभक्तांच्या उपस्थितीत जवळपास पंधरा दिवस साजरा होणारा पंढरीच्या वारीचा महोत्सव यंदा सरकारी नियम पाळून अगदी मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला. […]

निरंजन – भाग १६ – गुरुपौर्णिमा

गुरु म्हणजे जीवनाचे मांगल्य, जीवनाचे कल्याण, साक्षात जीवनाचे व्यवस्थापन, जीवनाला दिलेला अर्थ, गुरुविना जीवन म्हणजे दिशेविणा मार्ग , जीवनामध्ये गुरु असणं हे खुप महत्त्वाचे आहे. जन्मापासुन ते मॄत्युपर्यंत आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर गुरु हे लागतातच. ज्ञान देणं हे गुरुंचे परम कर्तव्य…आणि या कर्तव्याला धारण करणारी व्यक्ती म्हणजे गुरु… […]

कोरोनाची शाळा

पूर्वीच्या काळाची आठवण झाली. एक शिक्षक अनेक वर्गांना शिकवीत असत. या शाळेत मुळात एकच शिक्षक आहे. जगातले हे विलक्षण ज्ञानपीठ आहे. इथे मी काय शिकलो याची चाचणी देणे बंधनकारक नाही. मी जर एक चांगला माणूस बनू शकलो व निसर्गाचा आदर केला तर शाळा सोडल्याचा दाखला मला नक्की मिळेल. […]

तरुणाईच्या तरुण अपेक्षा

निवडणुकांची लगीनघाई सुरू झाली की लगेच तरुणांना केंद्रस्थानी ठेवून मीडियातील पत्रकार बांधव त्यांच्या कट्ट्यावर जाऊन मुलाखती घेतात. नवीन सरकार आणि लोकप्रतिनिधींकडून त्यांच्या अपेक्षा जाणून घेण्याचा हा प्रयत्न असतो. शाळा कॉलेजेस, व्यवसायसंधी आणि कधी नव्हे एवढी फुगलेली बेरोजगारी यावर चर्चासत्र आयोजिले जातात. वृत्तपत्रातील रकाने तरुणांच्या अपेक्षांनी भरले जातात. मग हेच हेरून लबाड राजकारणी आणि पक्ष आपल्या जाहीरनाम्यात तरुणांसाठी ‘खास तरतुदी’ करतात. हे सर्व निवडणूक आटोपेपर्यंतच असते. एकदाची निवडणूक संपली की तो केंद्रस्थानी असलेला तरुण आपोआपच त्या वर्तुळातून बाहेर फेकला जातो. […]

निरंजन – भाग १५ – विटंबना

एखाद्याची विटंबना करुन कधी कधी एखाद्याला खुप आनंद मिळत असतो. आणि आपल्या सर्वांना हा काही न घेतल्यासारखा अनुभव नाही किंवा अपरिचीत गोष्ट नाही. […]

निरंजन – भाग १३ – दृष्टी तसे दृश्य

एक सुंदर असे टुमदार एक गाव होते. त्या गावाच्या वेशीवर एक गुरुकुल होते. गुरुकुलामध्ये ज्ञान देणारे एक ॠषीमुनी होते. या गुरुकुलामध्ये नित्यनियमाने शिष्य येत असत. आपल्या गुरुंकडुन ज्ञान घेत असत. गुरुंसोबत गप्पागोष्टी करत असत. असा उपक्रम गुरुकुलामध्ये नित्यनियमाने होत असे. […]

1 58 59 60 61 62 133
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..