आपल्या प्रत्येकाला जगण्यापलीकडचं जीवन अधिक आनंद देत असतं. ह्या आनंदात अनेकदा आपण आत्मकेंद्रित झालो तर मात्र इतरांच्या बाबतीतील आपल्या जाणिवाच संपुष्टात येण्याची शक्यता असते. आयुष्यात दुसऱ्यांसाठी करण्यासारखं खूप काही असतं, पण आपलंच तिकडे लक्ष नसतं. आनंदातिरेकानं काहीवेळा आपल्याला जगाचा, इतरांचा विसर पडतो, पण दु:खाच्या वेळी मात्र प्रत्येकाच्या आठवणी आल्याशिवाय आपला एकही क्षण जात नाही. एखाद्याच्या दु:खापेक्षा […]
श्रवण भक्ती ज्याची अपार त्याचे कान होती तयार नुसती मान डोले तालासंगी काय कामाची!! अर्थ– शिवशाहीर कै श्री बाबासाहेब पुरंदरे यांनी 96 व्या वर्षी त्यांच्या एका व्याख्यानात मनातलं दुःख बोलून दाखवलं होतं, ते असं ” इतक्या वर्षांनंतर मला आज असं वाटतं की जर मी व्याख्यानं देण्यापेक्षा लिखाण जास्त केलं असतं तर बरं झालं असतं.” काय शिकायचं […]
आपल्या जीवनात आपण मानसिक स्वास्थ्यविषयक समस्यांचा सामना करत असलो, तर आपली विचारसरणी, अंतर्मनाची भावना आणि वागणूक ह्या सर्वांवर त्याचा थेट परिणाम होऊ शकतो. मानसिक स्वास्थ्यासाठी समस्या निर्माण करणारे नकारात्मक विचार जरी ते सामान्य आहेत असे वाटत असले तरीही सकारात्मक विचारांच्या माध्यमातून आपण निश्चितच परिवर्तन घडवून आणू शकतो. आपल्या व्यक्त होण्यातून आपले व्यक्तिमत्वाचे वेगळेपण त्यांतच सामावलेले असते. […]
प्रत्येक व्यक्तीमध्ये अनेक गुण असतात; त्यातील काही गुण इतरांसारखे देखील असतात, तर काही गुण इतरांपेक्षा वेगळे, निराळे असतात. खरे तर ह्या वेगळ्या गुणांमुळेच ती व्यक्ती ओळखता येते. म्हणूनच, व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तीमधील वैविध्यपूर्ण गुणविशेषांचा वैशिष्ट्यपूर्ण संच होय. […]
आपल्या संवादातून, लेखनातून, देहबोलीद्वारे आणि विविध क्रिया-प्रतिक्रियांतून आपण व्यक्त होत असतो. व्यक्त न होणाऱ्या व्यक्तीची घुसमट वाढत जाते. मोकळेपणाने मनांतील विषय एखाद्याला सांगितले कि मनावरचा ताण, दडपण कमी झाल्याचे देखील जाणवते. ह्या मोकळ्या होण्यातून आपल्या समस्यांचे निराकरण होत जाते. […]
नैराश्य आणि वैराग्य या दोन वेगळ्या वाटा आहेत, हे ज्याला समजलं तो आपल्या मानसिक स्थितीची योग्य फोड करून त्यावर काम करू शकतो किंवा त्याला सुस्थितीत आणण्याचे प्रयत्न करू शकतो. […]