नवीन लेखन...

मानसिक आरोग्यासाठी व्यक्त होणे गरजेचे

व्यक्त होणारीच व्यक्ती असते; अशाच व्यक्तीचे व्यक्तिमत्व चार चौघांपेक्षा निराळे असते. जन्माला आलेला प्रत्येक जीव काही ना काही प्रकारे व्यक्त होण्याचा प्रयत्न करतच असतो. ते व्यक्त होणे आवाजाच्या माध्यमातून, लिखित स्वरूपांत, देहबोलीच्या वापरांतून होत असते. आपल्या अंतर्मनांत येणारे विचार, विषय, घटना, अनुभव आपण अगदी जवळच्या, आपल्या हक्काच्या व्यक्तीजवळ बोलून दाखवत असतो. म्हणजेच एकप्रकारे आपण व्यक्तच होत असतो. तसे करण्यामुळे आपल्या मनांत साठून राहिलेले विचार बाहेर पडतात, त्यांना मोकळी वाट करून दिली जाते. निसर्ग नियमानुसार ते गरजेचे असते.

आपल्या संवादातून, लेखनातून, देहबोलीद्वारे आणि विविध क्रिया-प्रतिक्रियांतून आपण व्यक्त होत असतो. व्यक्त न होणाऱ्या व्यक्तीची घुसमट वाढत जाते. मोकळेपणाने मनांतील विषय एखाद्याला सांगितले कि मनावरचा ताण, दडपण कमी झाल्याचे देखील जाणवते. ह्या मोकळ्या होण्यातून आपल्या समस्यांचे निराकरण होत जाते. काहीवेळा उद्भवलेल्या प्रश्नांची उकल होत जाते. मनातील भय, न्यूनगंड दूर होण्याच्या दृष्टीने मोकळेपणाने आपल्या मनांतील शंका व्यक्त करणे उपयुक्त ठरते. आपल्याला पडलेले प्रश्न केवळ आपल्याच भ्रम आणि संभ्रमामुळे निर्माण होत असतात. एखाद्या समस्येचे उत्तर सर्वांनाच लागू होत नाही.

आपल्याला दैनंदिन जीवनात निरनिराळे अनुभव येत असतात. ज्यामुळे आपली मानसिकता बदलत राहते. या बदलत जाणाऱ्या मानसिकतेच्या अनुशंगाने जरा हटके विचार करण्याची जरुरी असते. नंतरच कार्यकृती करणे योग्य ठरत असते. आपल्या अंतर्मनांत जीवनासाठी अभ्यासपूर्वक विचार होणे आवश्यक असते. ह्यात सकारात्मक आणि विवेकी विचारांना अधिक महत्व असते. आपल्या जीवनाच्या समृद्धीसाठी आयुष्याची सुरुवातच घरामध्ये सकारात्मक विचारांनी करायची असते. कारण ह्या सर्वच बाबींचा संबंध आपल्या व्यक्त होण्यासठी असतो.

विद्यावाचस्पती विद्यानंद

ईमेल : vidyavachaspati.vidyanand@gmail.com

Avatar
About विद्यावाचस्पती विद्यानंद 32 Articles
शिक्षण तज्ज्ञ, जेष्ठ पत्रकार, लेखक, साहित्यिक, व्याख्याते, स्तंभ लेखक, कवी, व्याख्याते, अभिनेते, मानसशास्त्रीय समुपदेशक, करिअर आणि आध्यात्मिक मार्गदर्शक. एकूण १८ पुस्तकांचे लेखन (पैकी ६ क्रमिक पाठ्य पुस्तके गेल्या ६ वर्षांपासून विद्यापीठातील अभ्यासक्रमासाठी उपलब्ध), २००० पेक्षा अधिक लेखांना विविध माध्यमांतून प्रसिद्धी, ३० वर्षे शैक्षणिक क्षेत्रांत प्राध्यापक, प्राचार्य आणि संचालक म्हणून योगदान, ३५ वर्षे वैविध्यपूर्ण व्यवसायातील अनुभव, निरनिराळ्या विद्याशाखांमधून एकूण २८ पदवी व पदव्योत्तर शिक्षण तसेच २ विषयांमध्ये पी. एच. डी. (मानसशास्त्र व व्यवस्थापनशास्त्र), सद्यस्थितीत तिसऱ्या पी. एच. डी. चे (आध्यात्म विषयांत) काम सुरु.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..