नवीन लेखन...

अध्यात्मिक / धार्मिक स्वरुपाचे लेखन या विभागात असेल…

दिस उजळला

दिस उजळला रात सरली बात उरली अंधाराची काजवे सावल्या गोड चांदण्या चंद्र कहाण्या ओठांवरी सुर किड्याचे बोल घुबडाचे तोल मनाचे ढललेले — शरद अर्जुन शहारे

निरंजन – भाग ४ – इच्छा भक्ती

चंचल अशा इच्छा जेव्हा योग्य पद्धतीने स्थिर होतात तेव्हाच त्या पूर्ण होतात. आणि स्थित होण्यासाठी महत्त्वाचे आहे इच्छाभक्ती ध्यान … […]

युवकांनो आध्यात्मात समरस व्हा !

आपल्या प्रत्येक प्राचीन गोष्टीत विज्ञान लपलेले आहे. फक्त त्याला आध्यात्मिक झालर लावून व भिती घालून आपल्याला सांगितले जाते. म्हणून आपल्याला त्या अंधश्रध्दा वाटतात. यावर पुढे सविस्तर चर्चा होईलच. एवढे उच्च व प्रगतशील आपले आध्यात्म आहे. म्हणून आध्यात्माला मागासलेले किंवा अज्ञानीपणाचे न लेखता युवकांनी आध्यात्मात समरस होऊन देशाचा व स्वत:चा सर्वतोपरी विकास साधावा. […]

ईश्वर नाम भाषेचे जनक – श्री संत राममारुती महाराज

(लेखक – दिलीप प्रभाकर गडकरी) – युनोतर्फे २००५ साली केलेल्या पहाणीनुसार जगात ६९१२ भाषा बोलल्या जात होत्या. भाषा तज्ञांच्या मते दर पंधरा दिवसांनी जगातील एक भाषा कायमची नष्ट होते. अशीच एक ईश्वर नाम भाषा १८९३ साली निर्माण झाली आणि २८ सप्टेम्बर १९१८ रोजी नष्ट झाली. त्या भाषेचे वैशिष्ट्य म्हणजे ती एका व्यक्तीने निर्माण केली. पंचवीस वर्ष वापरली, ह्या पंचवीस वर्षात त्यांनी इतर कोणत्याही भाषेचा वापर केला नाही. जगात ती भाषा फक्त त्यांनीच वापरली व त्यांच्या निधनानंतर ती भाषा नष्ट झाली. ही सुध्दा ईश्वराचीच इच्छा दुसरे काय ? […]

प्रगल्भ युवा निर्मिती आध्यात्मानेच शक्य !

एकेकाळी विद्वान व्यक्तीमत्वासाठी जगात प्रसिध्द असणारा आणि देश-विदेशातील लोकांची ज्ञानाची भूक क्षमविणारा आपला भारत देश आज स्वत:च अज्ञानात आणि अंधारात खिचपत पडलेला आहे. तक्षशिला, नालंदा, काशी, पैठण अशी विश्व प्रसिध्द ज्ञानाची विद्यापीठे असणारा आपला भारत देश आज ईतराकडे ज्ञानाची भिक मागतो आहे.  […]

निरंजन – भाग ३ – स्मरण भक्ती

स्मरण म्हणजे आठवण…एखादया गोष्टीचे चिन्तन…..बालपणापासुन खुप अश्या आठवणी आपण मनात जपलेल्या असतात. लहानाचे मोठे होई पर्यंत लहान सहान गोष्टी समोर येतात आणि खुप सार्‍या गोष्टी स्मरण करुन देतात. […]

निरंजन – भाग २ – आत्मविश्वास भक्ती

मी हे करु शकते, मला हे जमेलच किंवा हे असच घडेल, अशी अंतर्मनातुन येणारी शाश्वती म्हणजेच आपल्या आतुन येणारा आवाज….आपल्या अंतर्मनातल आत्मविश्वास….क्रूती घडवण्याआधी निकालासाठी रचलेला सकारात्मक द्रुष्टिकोन…….म्हणजेच आत्मविश्वास. […]

निरंजन – भाग १

एकाग्रतेने मनाची स्थिरता वाढते आणि स्थिरता वाढल्यामुळे मन एकचित्त होउन हाती घेतलेल्या कार्यामध्ये आपले आपसुकच चिंतन वाढते आणि जेव्हा चिंतन वाढते तेव्हा नैसर्गिकरित्या आपाल्याला खुप सार्‍या वेगवेगळ्या कल्पना आपोआपच सुचतात. ज्यामुळे कामाची गती वाढते, त्या कामामध्ये कोणतीही अडचण येत नाही. आणि हाती घेतलेले काम खुप सुंदर पद्धतीने पार पाडले जाते. ही जी एकाग्रता आहे ती प्रत्ये़कामध्ये […]

शिव ताण्डव स्तोत्रम् – मराठी अर्थासह

लंकेचा अधिपती रावण याचेबद्दल त्याच्या रामायणातीळ भूमिकेमुळे भारतातील अनेक लोकांच्या मनात अपसमज व अप्रीती दिसून येते. प्रत्यक्षात रावणाचे व्यक्तिमत्त्व खूपच भिन्न आहे. व्यापार,राज्यशास्त्र, आयुर्वेद,दर्शने,बुद्धिबळ यात तो पारंगत होता. संगीताचा रसिक दशानन रुद्रवीणेचा उत्कृष्ट वादकही होता. देवांना पराभूत करून बंदिवान करणारा शूरवीर रावण परम शिवभक्त होता. एक सक्षम राज्यकर्ता असलेल्या रावणाच्या लंकेची व जनतेची भरभराट झाली होती. काही अभ्यासकांच्या मते तो दशग्रंथी विद्वान होता. संस्कृतचा प्रकांडपंडित असलेल्या रावणाने रावणसंहिता, कुमारतंत्र, अर्कप्रकाशम्, शिवतांडव स्तोत्रम् इ. रचना केल्याचे सांगितले जाते. […]

1 92 93 94 95 96 143
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..