नवीन लेखन...

राजकारण, राजकीय व्यक्ती, राजकीय पक्ष यासारख्या विषयांवरील लेखन

अर्थहीन निवडणुका !

निवडणुका येतात, निवडणुका जातात ! राजकीय पक्षांची ध्येयधोरणे, भूमिका ठरलेल्या असल्या तरी त्या भूमिका वठविणारे कलाकार आपल्या दिशा सतत बदलवत राहतात. यंदाही नियमानुसार सर्वच राजकीय पक्ष आपापल्या भूमिका घेऊन लोकांसमोर येत आहेत. ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांना स्वतःवर खूप अन्याय झाल्याची भावना निर्माण होऊन टोप्या बदलाव्या तसे पक्ष बदलत आहेत. त्यामुळे सध्याच्या वातावरणात “निष्ठा” नावाची गोष्ट उरली नाही.  […]

मोरूचा बाप, मोरुला म्हणाला..

मोरूचा बाप मोरूला म्हणाला , ‘ ऊठ लेका , जागा हो , तोंड खंगाळ आणि काऊने दिलेला चहा प्राशन करून दाराबाहेर ही कागदांची चळत घेऊन उभा राहा . आता कोणत्याही क्षणी मतांची भीक मागायला आणि आपली सेवा करावयाला विविध पक्षांचे विनम्र पाईक कर जोडून येतील , त्या प्रत्येकाच्या हाती यातील एकेक कागद दे , त्यांना म्हणावे , हे आमचे अपेक्षापत्र आहे. […]

मतदान नव्हे मताधिकार

प्रत्येक निवडणुकीला इथला नागरिक मतदान करत असतो परंतु तो मतदान नव्हे तर मताधिकार बजावत असतो हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. संविधानिक तरतुदीनुसार हा मताचा अधिकार इथल्या प्रत्यक नागरिकाला दिला आहे .आणि ते दुसऱ्याला दान म्हणून देने हे थोडे अयोग्य वाटते कारण सर्वसाधारण पणे आपण आपले अधिकार कधी दान केले असे वास्तवात कोणतेच चित्रण अद्याप दिसलेलं नाही किंवा दिसणार ही नाही. […]

मोदी खरंच असे का वागतात ?

लेखक – प्रा. विनायक आंबेकर, पुणें ः न्यूज़ चॅनेलवरील चर्चा ऐकुन आणि कॉंग्रेसी व शरद पवारांसारख्या इतर धुर्त नेत्यांची विधाने ऐकुन मोदींचे खरंच काही चुकत तर नाही ना ? या विचाराने मनातून गोंधळलेल्या देशभक्त सर्वसामान्य नागरीक बंधू भगिनींसाठी एक विस्तृत स्पष्टीकरण […]

काळाची चाहूल ?

नियती अनेक गाेष्टी घडवून आणते. तिघेही केंद्रात असते तर त्यांच्या निधनाचे हे धक्के सरकारसाठी सुरळीत कामकाजाच्या दृष्टीने समस्या हाेऊ शकले असते. पर्याय शाेधताना आणि गाडे रुळावर आणताना त्रास झाला असता. कुठल्या अंतस्थ शक्तीने त्यांना राेखले, हे परमेश्वर जाणाे. पण आपल्यामुळे देशाचे नुकसान हाेता कामा नये, याचा आदर्शपाठ या तिघांनीही घालून दिला. ताे नव्या पिढ्यांसाठी अनुकरणीय ठरेल. […]

कलम ३७० पश्चात काश्मीरच्या विकासाला चालना

गेली ७० वर्षे या ‘कलम ३७०’ मुळे भारतातील इतर कुठलेही कारखाने, उद्योगपती, उद्योजक काश्मीरमध्ये जाऊन आर्थिक व्यवहार, उद्योग-व्यवसाय करू शकत नव्हते. जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी जो प्रचंड निधी केंद्र सरकारकडून दिला जात असे, त्याचा दुरूपयोग केला जायचा. एखादा प्रकल्प महाराष्ट्रात १० लाखांमध्ये बांधला जात असेल, तर तो जम्मू-काश्मीरमध्ये अनेक पटीने जास्त पैसे खर्च करून तयार केला जायचा. ९० टक्के पैसे हे काश्मीरमधील २५० कुटुंबाच्या खिशात जात होता. त्यामध्ये राजकीय पक्ष, तेथील काही उद्योजक आणि हुर्रियत कॉन्फरन्ससारखे समर्थक होते.  […]

मोदी है तो मुमकिन है !

आता खऱ्या अर्थाने काश्मीरचे भारतात विलनीकरण झाले असून काश्मीर ते कन्याकुमारी असं अखंड भारतीय संघराज्य अस्तित्वात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या महत्त्वांकाक्षी निर्णयामुळे काश्मीरमध्ये विकासाची नवी पहाट उगवू शकेल ! तसेच गेल्या सात दशकापासून कुटील राजकारणाचं केवळ एक खेळणं बनून राहिलेला काश्मीर आता खऱ्या अर्थाने भारताचं नंदनवन बनू शकेल. गेली सात दशकं काश्मीरचा प्रश्न सोडविण्याची इच्छाशक्ती कुणी दाखवू शकलं नाही, मात्र ‘मोदी है तो मुमकिन है !’ या घोषवाक्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेवटी करून दाखवलंय.. […]

असंवेदनशीलतेचा ‘महा’ पूर !

महापुरात अडकलेल्या सांगली, कोल्हापुरातील भीषण परिस्थिती पाहून अवघ्या महाराष्ट्राची झोप उडाली आहे..स्वतःचा जीव जात असतानाही कडेवरच्या लेकराला घट्ट पकडून राहिलेल्या मृत महिलेचे आणि बाळाचे छायाचित्र काळीज पिळवटून काढत आहे..पलुस दुर्घटनेतील एका-एका मृतदेहाचे चित्र आठवले तरी मनाला चटका लागुन डोळ्यात चटकन पाणी येते.. आणि, अशावेळी पूर परिस्थतीची पाहणी करण्यासाठी आलेले राज्याचे जलसंपदा मंत्री हसत हसत सेल्फीसाठी ‘पोज’ देतात, या असंवेदनशीलतेला काय म्हणावे ? […]

ऐतिहासिक निकाल!

वर्षानुवर्ष आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाचे चटके सहन करत संविधानिक मार्गाने आरक्षणासाठी लढा उभारणाऱ्या सकल मराठा समाजाच्या संघर्षाला यश आले असून मराठा समाजाला शिक्षण आणि नोकर्‍यांत आरक्षण देण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आपली मोहोर उमटवली आहे. […]

1 4 5 6 7 8 40
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..