नवीन लेखन...

थोडं थांबूया

किती तो मोह आता तरी आवर गरजेचं खरं काय याचा करूया विचार आधीची पिढी मानी समाधान खरं पोटापुरत जगणं आपलं आपण बरं एक पिळा दोरीवर दुसरा जोड अंगावर ठेवणीतले एखाद पातळ खणात नसे गच्च अडगळ नसे कधी अतिरिक्त ताण न ऋतू बदलता वरचेवर आजार तृप्त जेऊन सकस घरगुती अन्न बाळसे असे कायम अंगावर टेकता पाठ शांत […]

जन्म मानवी

दु:खांना सहजी झेलित झेलित मी सुखांना कुरवाळीत राहिलो सहवासातील क्षण सारेच सुंगंधी सुखानंदा नित्य उधळीत राहिलो।।१।। उलघाल जरी अंतरी संवेदनांची विवेके, संयमी सुखात राहिलो दान! जीवनी सारेच दयाघनाचे प्रारब्धा, उमजुनी जगत राहिलो।।२।। अनंत जन्मातुनी हा जन्म मानवी सुसंस्कारी सत्कर्म करीत राहिलो मनामनांनाच जगती सांधित जावे भावना! हीच उरी जपत राहिलो।।३।। जीव! हा नकळत जातो सोडुनी सत्य! […]

किती दिवसात..

किती दिवसात पावसाच्या सरीत चिंब भिजलेच नाही. रिमझिम रेशीमधारा आणि गोल गारामणी झेललेच नाही… किती दिवसात पागोळ्यांचे मणी ओंजळीत धरलेच नाही. आणि पत्र्याच्या तडमताशाचे आवाज ऐकून ताल धरलाच नाही… किती दिवसात कागदी बोट पाण्यात सोडून दिलीच नाही. आणि लांबवर जाऊन पाण्यात दूरवर गेलेली पाहिलीच नाही…. किती दिवसात भिजलेले केस कोरडे केलेच नाही. चुलीपाशी बसून आईच्या हातचा […]

काही म्हणतात प्रेमात पडायचे असते

काही म्हणतात प्रेमात पडायचे असते तर काही म्हणतात प्रेम करायचे असते… काहीही असो प्रेम महत्वाचे पण काहीना तेही आवडत नाही…. प्रेमात असताना अनेक जण किवा जणी खुप ‘ डोळस ‘ प्रेम करतात.. मग ते खरे प्रेम असते .. का तिथे पण ६०-४०% हिशेब असतो…. असेल बुवा ६०-४० चा नाद अनेकांना कदाचित वृतीने टक्केवाले अधिकारी-कर्मचारीअसतील… टक्क्यावर जगणारे… […]

त्याला हवा तसा हवा तेव्हा

त्याला हवा तसा हवा तेव्हा त्याचा टाईमपास तिच्याबरोबर झाला तिच्या दुखऱ्या मनाच्या अजून मग चिंधड्या लाख उडल्या.. आता ती किती चूक हेच फक्त त्याच्या लेखी उरलं कितीही अपमान त्याने केले तरी तीच दुःख त्याला न कळलं.. मन आणि भावनांची तिची कहाणी त्याला कधी कळणार नाही.. तिच्या मनाची जाणिव त्याला दिसणार कधीच ती नाही.. त्याचा ती टाईमपास […]

नशीब कठोर स्वीकार होता

नशीब कठोर स्वीकार होता अबोल अंतरी झाला दुःखी जीवाचा तिच्या अधुरा डाव जुगारी मांडला कितीक इच्छा दाबून टाकल्या वेदनेच्या कळा लागल्या न कौतुक न प्रेम न माया शांततेत होम पेटला काहीच नाही इच्छा आकांक्षा सर्वसाचा लाव्हा तप्तला भोग दुःखद जळत्या मनाला नकळे कुणाला भावना मेलेल्या मनात दुःख पसारा स्त्रीजन्म निःशब्द सारा भाव मेले मनात जखमा नियतीचा […]

काल जे असते

काल जे असते तसे आज नसते प्रेमात पण तसेच असते असे का त्याला उत्तरच नसते फक्त फरक लक्षात घ्यायचा असते निमुटपणे तरच सारे काही सुरळीत होते….. प्रेम प्रेम रहाते नाहीतर काही खरे नसते…… जसे भांड्याला भांडे लागते तसे प्रेमाला प्रेम ‘ लागते ‘…. — सतीश चाफेकर.

कळेल का तुला

कळेल का तुला माझी ही कथा, वेळ नसेल तरी तू समजून घे तेव्हा… कळेल का तुला माझी धडपड, दूर असेल मी तरी नजर तुझ्यावर… कळेल का तुला माझे निःशब्द प्रेम असेल हळवे अबोल ते दूर तू जातांना मन बैचेन.. कळेल का तुला मला ही हवे असते अबोल प्रेम तुझे ते समजून घे तू माझे मन ते.. […]

काही गोष्टी कधी

काही गोष्टी कधी लक्षात येत नाहीत.. तिला काय हवे ते ती कधी सांगत नाही.. फक्त सूचना देते… आणि आपण मात्र वेध घेत असतो भोळसटपणे…. प्रेमात हे असेच असते पटकन ओळखता आले पाहिजे प्रेमाला खरे तर शब्दांचा भार सोसवत नाही त्याला त्याची सवय नसतेआणि जिथे सवय असते तेथे प्रेम नसते असतो तो फक्त व्यवहार…. दोन देहाचा दोन […]

नकळे कुणास काही अंतरमन

नकळे कुणास काही अंतरमन वेदना अबोध काही वेढल्या, नकळे भाव मनीचे नाजूक कुणास नकळे खऱ्या जाणिवा.. त्यात अंतरी विरले भाव कितीक सोडल्या साऱ्या वेल्हाळ भावना, त्याच वळणावर तू भावाला अचानक नकळे काही मी मोहरले एकांता.. घेतलेस तू भाव स्वप्न मिठीत गुंतल्या तेव्हाच गोड भावना, विसरुन जावे त्याच वळणावर सारे परी न विसरल्या मधुर त्या भावना.. चाहूल […]

1 72 73 74 75 76 439
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..