नवीन लेखन...

किती दिवसात..

किती दिवसात पावसाच्या सरीत चिंब भिजलेच नाही.
रिमझिम रेशीमधारा आणि गोल गारामणी झेललेच नाही…
किती दिवसात पागोळ्यांचे मणी ओंजळीत धरलेच नाही.
आणि पत्र्याच्या तडमताशाचे आवाज ऐकून ताल धरलाच नाही…
किती दिवसात कागदी बोट पाण्यात सोडून दिलीच नाही.
आणि लांबवर जाऊन पाण्यात दूरवर गेलेली पाहिलीच नाही….
किती दिवसात भिजलेले केस कोरडे केलेच नाही.
चुलीपाशी बसून आईच्या हातचा गरम गरम चहा प्यालेच नाही…
किती दिवसात चिखलात घसरून पडलेलीच नाही.
पडल्याने रस्त्यावर झालेली फजितीचे दु:ख पचवलेच नाही…
— सौ कुमुद ढवळेकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..