कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
भेट
अवचीत भेट होती, मृद्गंधापरी तुझी ती अलवार पावसाची मी वाट पाहिली होती निमिषार्ध दर्शनेंही, तडितेपरीच होती घन-घोर संगराची मज आस लाविती ती निःशब्द आठवेंही येती, इंद्रधनू साकारत जाती मनीं उन्हात पावसाचा खेळ मांडुनी जाती मज ओढ शरद् ऋतूची, अनिवार सत्य होती तव पाऊलीं चांदण्यांचे संसार नित्य फुलती — श्री.उदय विनायक भिडे
चिंतन
ज्याचे चिंतन आम्ही करतो तोच ‘शिव’ चिंतन करतो स्वानुभवे चिंतन करुनी चिंतनशक्ति दाखवितो जीवनाचे सारे सार्थक लपले असते चिंतनात चिंतन करुनी ईश्वराचे त्यांच्यात एकरुप होण्यात सारे ब्रह्मांड तोच असूनी अंश रुपाने आम्ही असतो जेव्हां विसरे बाह्य जगाला तेव्हांच तयांत सामावतो चिंतन असे निश्चीत मार्ग प्रभूजवळ तो जाण्याचा लय लागूनी ध्यान लागतां ईश्वरमय होण्याचा डॉ. भगवान नागापूरकर […]
तू लपलास गुणांत
कृष्ण कमळ –
[…]
स्त्री-मुक्ती
कशाला करतोय आपण पोकळ वल्गना स्त्री-मुक्तीच्या…. जर होत असतील लहान,तरूण,विवाहीत,मतीमंद आणि निडर स्त्रियांवरही बलात्कार दिवसा ढवळ्या…. स्त्री मुक्त झाली कस म्हणणार जर समाज लादू पहात असेल बंधन त्यांच्या चालण्या- बोलण्यावर, राहण्या- वागण्यावर त्यांच्या स्त्री-सुलभ भावनेवर आणि स्त्रीच्याच गर्भात वाढणार्या स्त्रीचाच बळी घेत असेल ती गर्भात असताना… स्त्री-मुक्ती जर पुरूषांच्याच हातात असेल तर स्त्री – मुक्तीसाठी लढणार्या […]
