नवीन लेखन...

हे कराल का ?

कशासाठी जगतो आपण, विचार तुम्हीं करतां कां ? मृत्यू येई तो जगावयाचे, हेच धोरण समजतां कां ? खाणे – पिणें वंश वाढविणे, हेच जीवन असते कां ? ऐष आरामी राहूनी तुम्ही, देहासाठी सारे, हे मानता का ? पाठीं लागूनी धनाच्या त्या, बरोबर संपत्ती न्याल कां ? पैसा मुलांसाठी ठेवून ही, शिव्या त्यांच्या चुकवाल कां ? सारे […]

येईल मागे मागे

नको लागूस प्रसिद्धीच्या मागें मागे  । येईल स्वयं ती तुझ्याच संगे संगे  ।। निराशूनी जावू नकोस रागें रागें  । हिंमत बांधूनी जावेस  आगे आगे  ।। विणाविस यशाची शाल धागे धागे  । सुखाच्या छटा चमकूनी रंगे रंगे  ।। सतत रहावे जीवनी जागे जागे  । तेव्हाच यश येत असते भागे भागे  ।। डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० […]

योग्यतेनुसार यश

उंचावून झेप, नको घेवू उडी खोल आहे दरी, पाय तुझा मोडी…१ अंदाज घे तूं,  खोलीचा प्रथम यश येई तुला,  तया मध्यें ठाम…२ अनुमान काढ,  आपल्या शक्तीचे झेपेल कां ते,  विचार युक्तीचे…३ निर्णय घ्यावेस,  सदा विचारांनी निराश न होई,  त्यामध्ये कुणी….४ जाणून घे तूं, स्वत:ची पात्रता यश असे पाठी,  ज्याची जी योग्यता…५ डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – […]

प्राण ज्योत

दिवा होता छोटासा, एक मजकडे  । इन्धन मिळतां तेलाचे, प्रकाश तो पडे  ।। तळांत होती योजना, तेल सांठवण्याची  । शिरीं असूनी वात ती, क्रिया चाले जळण्याची  ।। छिद्र पडतां तळाला, व्यर्थ जाई इंधन  । मंदावली ज्योत दिव्याची, शक्ती ती जावूनी  ।। देह आहे दिव्यासारखा, चैतन्य तेज तयाचे  । प्रकाश फेकी आनंदाचा, इंधन मिळतां शक्तीचे  ।। केंद्रित […]

गळफास बोलला फांदीला

गळफास बोलला फांदीला का गं ? एवढी गर्दी आज ह्या पांदीला आज पर्यंत कसं सारं सुनं सुनं होतं भेगाळल्या भुईवर काळं कुञही येत नव्हतं मग अाज कसा आला ह्यो ताफा भर उन्हाळ्यात कशा तोंडातुन वाफा मी ही आज तोवर पडुन होतो सांदीला कसा लटकलो ह्या सुकल्या फांदीला गळफास बोलला फांदीला………… …………………………………………………   वाळलेलं झाड बया पाखरांनी भरलं ज्यान त्यान इथं येऊन का मौन धरलं कुणीच काही बोलत नाही…. कालपासुन ह्यो बाॅ चिपकुन बसलाय मला मलाही आता याचा भार तोलत नाही कुणी तरी याला उतरवेल असं वाटतय पण ह्यो लटकलाच का..? प्रश्नच पडतय …………………………………………………….   सुकलेली, पानं झडलेली फांदी मग गळा दाटुन लागली म्हणायला मला काही हे नवं नाही बाबा, माझ्या खालचा जवा करपुन जातो माल तवा असच होतं सारं, जे […]

अर्पण

आशिर्वाद श्री जगदंबेचा,  सहवास तुझ्या स्फूर्तीचा रचिली ओवीबद्ध कथामाला, ती अर्पितो मी तुजला   १ विचारांच्या उठल्या लहरी,  शब्द जुळता काव्या परी कविता रूप धारण करी,  ती अर्पितो मी तुजला   २ प्रभूचा असावा सहवास,  हीच अंतर्मनातील आंस विचारांची घालूनी शब्दरास ती अर्पितो मी तुजला   ३ प्रभू नसे जन्ममरण व्यथा,  अवतारास संबोधूनी जन्मकथा भावनेस व्यक्त करी कविता,  ती […]

संकोचलेले मन

मध्य रात्र झाली होती,  सारे होते शांत  । रस्त्यावरती तुरळक व्यक्ती,  वाटला एकांत  ।। एक गाडी मंदिरीं थांबली,  त्याच शांत वेळीं  । सूटामधली व्यक्ती कुणी एक, आली दारा जवळी  ।। सारे होते नशिबात त्याच्या,  धन संपत्तीचे सुख  । दिवस घालवी मग्न राहूनी,  कार्ये पुढती अनेक  ।। तर्कज्ञान  तीव्र असूनी,  आगळा बाह्य चेहरा  । परि अंर्तमन सांगत […]

शुर्पणखाची एक सुडकथा

रामायणातील एक प्रसंग आठवला. राम लक्ष्मण सीता हे वनांत होते, त्यावेळची ही गोष्ट. लंकेचा राजा रावण, याच्या लहान बहीणीचे नांव मिनाक्षी. ती अतीशय सुंदर होती. तीचे डोळे मत्सा अर्थात माशाप्रमाणे होते, म्हणून तीचे नांव मिनाक्षी ठेवले. तीची आई केकसी ही दैत्य कुळामधली. तर वडील विश्रवा ऋषी हे ब्राह्मण कुळातले. तीचे अर्थात रावणाचे आजोबा पुलस्ती ऋषी हे […]

दुष्टपणा

दगड टाकतां पाण्यावरी, तरंगे त्याची दिसून आली  । दगड होई स्थीर तळाशी, बराच वेळ लाट राहीली…१, जेव्हा कुणीतरी क्रोध करी, वातावरण दूषित होते  । क्रोध जातो त्वरीत निघूनी, दूषितपणा कांहीं काळ राहते…२, निर्मळपणा दिसून येई, स्थिर होवून जातां जल  । पुनरपि पडता खडा क्रोधाचा, सारे होवून जाते गढूळ…३, स्थिर होण्यास वेळ लागतो, गढूळ होई क्षणांत मन […]

भावनेस हसती विचार

भावनेच्या जावूनी आहारीं,  नुकसान करतात सारे, तर्कशुद्धता विसरून जाते,  अंगात भरूनी वेडे वारे ..१, भावनेची लाटच उठता,  मती होते एकदम गुंग, बरोबर वा चूक काय, जाण रहात नसते मग..२ आपले सारे खरे असावे,  हाच होत असे अट्टाहास, आपण केल्या कर्मावरच,  बसतो आपला विश्वास..३ इंद्रीय आणि भावना यांची,  जमुनी जात असतां जोडी तर्कशुद्ध विचारांत त्याला, राहत नसते […]

1 329 330 331 332 333 439
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..