नवीन लेखन...

अनुभवाचे शहाणपण

बदलून गेले जीवन अर्थ कळल्यानंतर परिस्थितीची आली जाण जाग आल्या नंतर  ।।१।। श्रीमंतीच्या नादानें ऐषआरामी झालो पैशाच्या गर्वाने माणुसकी विसरलो   ।।२।। तारुण्यातील उर्मीने अहंकारी बनविले शरिरातील गुर्मीने निर्दयी मज ठरविले   ।।३।। धंद्यामध्ये येता खोट निराश अति झालो गरिबीची चालतां वाट प्रेमळ मी बनलो   ।।४।। देह बनला दुर्बल विकार तो जडूनी जर्जर- पिडीतां बद्दल सहानुभूती आली मनी   […]

ज्ञानेश्वराची चेतना

जीवंतपणी घेई समाधी,  ज्ञानेश्वर राजा  । दु:खी होऊनी हळहळली,  विश्वामधली प्रजा  ।। सम्राट होता बालक असूनी,  राज्य मनावरी  । हृदय जिंकले सर्व जणांचे,  लिहून ज्ञानेश्वरी  ।। आसनीं बसत ध्यान लावता,  समाधिस्त झाले  । बाह्य जगाचे तोडून बंधन,  प्राण आंत रोकले  ।। निश्चिष्ठ झाला देह जरी ,  बाह्यांगी दर्शनी  । जागृत आसती प्राण तयांचे,   आजच्याही क्षणी  ।। […]

ध्यानाने काय साधले

ध्यानाने काय साधले ऐका सगळे लक्ष्य देऊनी हेच साधले ध्यान लावूनी   ।।धृ।। संसारांत रमलो,मोहांत गुंतलो सुख दुःखात अडकलो उकलोनी जीवन कोडे   समर्पित झालो प्रभू चरणीं   ।।१।। हेच साधले ध्यान लावूनी जाई पैशाच्या पाठीं   देह सुखासाठीं समाधानापोटीं धडपडीतील चुक दिली दाखवूनीं ।।२।। हेच साधले ध्यान लावूनी धानाची समज   उपदेशिला मज ऐक मनाचा आवाज तोड सर्व विचार चित्त […]

संशयी मन

भरवशाची घेऊन शिदोरी,  पाऊलवाट  चालत होता  । कुणीतरी आहे मार्गदर्शक,  यापरी अजाण होता  ।। बरसत होती दया त्याची,  जात असता एक मार्गानी  । आत्मविश्वास डळमळला,  बघूनी वाटेमधल्या अडचणी  ।। संशय घेता त्याचे वरती,  राग येई त्याच कारणें  । विश्वासाला बसतां धक्का,  आवडेल कसे त्यास राहणे  ।। ओढून घेई मृत्युचि आपला,  अकारण तो त्यास दुराऊनी  । जागृत […]

यशासाठी प्रयत्नाची दिशा

प्रयत्न करितां जीव तोडून,  जेव्हां यश तुम्हा न येई सोडून देता त्याला तुम्हीं,  नशिबास दोष देत राही..१ दोष नका देवू नशिबाला,  मार्ग निवडले तुम्ही चुकीचे का न मिळाले यश तुम्हां,   मूल्यमापन करा प्रयत्नाचे…२ चूक दिशेने प्रयत्न होतां,  वाहून जातो सदा आपण यश जेव्हा मिळत नसते,  निराश होवून जाते मन…३ पुनः पुन्हा प्रयत्न करूनी,  यश न आले […]

नवरा-बायको

नवरा-बायकोच्या नात्यांची अलगद गुंफण करणारी कविता काल वाचनात आली. […]

प्रवास आयुष्याचा

एक म्हातारा त्याचा आयुष्याचा प्रवास कसा झाला ? आणि शेवटी त्याला समजले तेव्हा तो काय सांगतो ? याबाबत मनोगत व्यक्त करतो. त्यातून बरेच काही शिकता येईल. ते मनोगत असे ……. माझे आयुष्य कसे गेले, हेच कधी उमजले नाही l कुणासाठी जीवन जगलो, हेच मला समजले नाही ll लहानपणी जमवायचो, सोबतीला सारे सवंगडी l विटीदांडू, आबाधुबी अन्, […]

सदृढ शरीरी चिंतन

योजना तुमची चुकून जाते,  जीवनाच्या टप्प्याची  । अखेरचा क्षण जवळीं येतां,  आठवण होते त्याची  ।। जोम असतां शरीरीं तुमच्या,  करीता देहासाठीं  । वृद्धत्वाचा काळ तुम्हीं ठेवता,  ईश चिंतना पोटीं  ।। गलित होऊनी गेली गात्रे,  अशांत करी मनां  । एकाग्रचित्त होईल कसे तें,  मग प्रभू चरणां  ।। दवडू नका यौवन सारे,  ऐहिक सुखामागें  । त्या काळातील प्रचंड […]

संत तुकारामांचे `शब्द’ या शब्दावरील काव्य

संत तुकारामांनी सहज लिहिता लिहिता किती छान लिहून ठेवलेय बघा…. घासावा शब्द | तासावा शब्द | तोलावा शब्द | बोलण्या पूर्वी || शब्द हेचि कातर | शब्द सुईदोरा बेतावेत शब्द | शास्त्राधारे || बोलावे मोजके | नेमके ,खमंग ,खमके | ठेवावे भान | देश ,काळ ,पात्राचे बोलावे बरे | बोलावे खरे | कोणाच्याही मनावर | पाडू […]

त्यांची शाळा

आंस लागली मजला, बघून याव्या त्या शाळा, देहू, आळंदी, परिसर, जाऊनी तो धुंडाळला ।।१।। कोठे शिकले तुकोबा, कसे ज्ञानोबांना ज्ञान मिळाले, साधन दिसले नाहीं, परि तेज आगळे भासले ।।२।। विचार झेंप बघतां, आचंबा आम्हां वाटतो, कोठून शिकले सारे, मनी हा प्रश्न पडतो ।।३।। त्यांची शाळा अतर्मनीं, गंगोत्री ज्ञानाची ती, वाहात होती बाहेरी, पावन करी धरती ।।४।। […]

1 327 328 329 330 331 439
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..