नवीन लेखन...

गळफास बोलला फांदीला

गळफास बोलला फांदीला का गं ? एवढी गर्दी आज ह्या पांदीला आज पर्यंत कसं सारं सुनं सुनं होतं भेगाळल्या भुईवर काळं कुञही येत नव्हतं मग अाज कसा आला ह्यो ताफा भर उन्हाळ्यात कशा तोंडातुन वाफा मी ही आज तोवर पडुन होतो सांदीला कसा लटकलो ह्या सुकल्या फांदीला गळफास बोलला फांदीला………… …………………………………………………   वाळलेलं झाड बया पाखरांनी भरलं ज्यान त्यान इथं येऊन का मौन धरलं कुणीच काही बोलत नाही…. कालपासुन ह्यो बाॅ चिपकुन बसलाय मला मलाही आता याचा भार तोलत नाही कुणी तरी याला उतरवेल असं वाटतय पण ह्यो लटकलाच का..? प्रश्नच पडतय …………………………………………………….   सुकलेली, पानं झडलेली फांदी मग गळा दाटुन लागली म्हणायला मला काही हे नवं नाही बाबा, माझ्या खालचा जवा करपुन जातो माल तवा असच होतं सारं, जे […]

अर्पण

आशिर्वाद श्री जगदंबेचा,  सहवास तुझ्या स्फूर्तीचा रचिली ओवीबद्ध कथामाला, ती अर्पितो मी तुजला   १ विचारांच्या उठल्या लहरी,  शब्द जुळता काव्या परी कविता रूप धारण करी,  ती अर्पितो मी तुजला   २ प्रभूचा असावा सहवास,  हीच अंतर्मनातील आंस विचारांची घालूनी शब्दरास ती अर्पितो मी तुजला   ३ प्रभू नसे जन्ममरण व्यथा,  अवतारास संबोधूनी जन्मकथा भावनेस व्यक्त करी कविता,  ती […]

संकोचलेले मन

मध्य रात्र झाली होती,  सारे होते शांत  । रस्त्यावरती तुरळक व्यक्ती,  वाटला एकांत  ।। एक गाडी मंदिरीं थांबली,  त्याच शांत वेळीं  । सूटामधली व्यक्ती कुणी एक, आली दारा जवळी  ।। सारे होते नशिबात त्याच्या,  धन संपत्तीचे सुख  । दिवस घालवी मग्न राहूनी,  कार्ये पुढती अनेक  ।। तर्कज्ञान  तीव्र असूनी,  आगळा बाह्य चेहरा  । परि अंर्तमन सांगत […]

शुर्पणखाची एक सुडकथा

रामायणातील एक प्रसंग आठवला. राम लक्ष्मण सीता हे वनांत होते, त्यावेळची ही गोष्ट. लंकेचा राजा रावण, याच्या लहान बहीणीचे नांव मिनाक्षी. ती अतीशय सुंदर होती. तीचे डोळे मत्सा अर्थात माशाप्रमाणे होते, म्हणून तीचे नांव मिनाक्षी ठेवले. तीची आई केकसी ही दैत्य कुळामधली. तर वडील विश्रवा ऋषी हे ब्राह्मण कुळातले. तीचे अर्थात रावणाचे आजोबा पुलस्ती ऋषी हे […]

दुष्टपणा

दगड टाकतां पाण्यावरी, तरंगे त्याची दिसून आली  । दगड होई स्थीर तळाशी, बराच वेळ लाट राहीली…१, जेव्हा कुणीतरी क्रोध करी, वातावरण दूषित होते  । क्रोध जातो त्वरीत निघूनी, दूषितपणा कांहीं काळ राहते…२, निर्मळपणा दिसून येई, स्थिर होवून जातां जल  । पुनरपि पडता खडा क्रोधाचा, सारे होवून जाते गढूळ…३, स्थिर होण्यास वेळ लागतो, गढूळ होई क्षणांत मन […]

भावनेस हसती विचार

भावनेच्या जावूनी आहारीं,  नुकसान करतात सारे, तर्कशुद्धता विसरून जाते,  अंगात भरूनी वेडे वारे ..१, भावनेची लाटच उठता,  मती होते एकदम गुंग, बरोबर वा चूक काय, जाण रहात नसते मग..२ आपले सारे खरे असावे,  हाच होत असे अट्टाहास, आपण केल्या कर्मावरच,  बसतो आपला विश्वास..३ इंद्रीय आणि भावना यांची,  जमुनी जात असतां जोडी तर्कशुद्ध विचारांत त्याला, राहत नसते […]

गेले ते दिन गेले !

असले जरी शिक्षण बेताचे वागलो नाही कधी विचित्र, चाळीतील मध्यमवर्गी आम्हीं राहत होतो एकत्र !   चाळीने आम्हांला शिकविले भेदभाव विसरायला, प्रसंग कोणावर बिकट आला शिकविले प्रथम मदत करायला !   चाळीत कॉमन नळाला पहाटे पाचला पाणी, सातवाजता पाणी गेल्यावर मिळणार नाही थेंब पाणी !   ब्रशने दात घासता घासता भरभर प्रातर्विधी उरकायचे, दुधासाठी सेंटरवर धावायचे […]

“माणूस”

उजाड  रस्ता,  मोकळा पण भकास सूर्य  आणि उध्वस्त दिशा ! वाट नजरेच्या टप्प्यात आहे , पण पावलंच नाहीयेत , तरीही मला जायचंय रांगत का होईना   मला जायचंय.. सगळं वाळवंट आहे. तप्त उष्ण वाळू, चटके बसतायत पावलांना, गिधाडं घिरट्या घालतायत. पाणी दिसतंय मला , पण फक्त डोळ्यातलं. मला पळायचंय  वाचवायचंय स्वतःला… काय सांगतोस ? तो पण अडकलाय […]

वर्षाचे भगिनी प्रेम

तप्त होतां धरणी माता, शांत करी वर्षा तिजला प्रफुल्लतेचे झरे फुटती, आंतूनी त्या मातीला…..१, जलमय होती नदी नाले, दुथडी भरूनी वाहती धबधब्यातील खरी शोभा, वर्षामुळेंच दिसती…२, हिरव्या रंगीं शाल पसरते, धरणी माते वरी ऊब यावी म्हणून मेघांचे, आच्छादन ती करी….३, वर्षा धरती बहिणी असूनी, प्रभूची भावंडे उचंबळूनी प्रेम येतां, धावून येते तिजकडे….४ डॉ. भगवान नागापूरकर संपर्क […]

स्वप्न आणि जागेपण

एक ती झोप     स्वप्न बघत राही शिणवून शरीर ताप   जीवास सुख देई स्वप्न जाई विसरुन    जाग येता मनां जागे मन   स्वप्नांत भासवी वेगळेपणा एकाच मनाच्या दिसे   ह्या दोन भुमिका भिन्नता त्यांत भासे     जाऊन दोन टोकां स्वप्न आणि जागेपण   देहाच्या दोन स्थिती नाण्याच्या बाजू दोन  एकमेका न मिळती डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

1 325 326 327 328 329 434
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..