नवीन लेखन...

वर्तुळ पूर्ण होतेय!

प्रकाशन दिनांक :- 25/05/2003

सृष्टीतील घटनाक्रमाचा उल्लेख करताना हमखास किंवा एकमात्र वापरला जाणारा शब्द आहे ‘चक्र’. सृष्टी हा शब्द, त्या शब्दातून प्रकट होणारी संकल्पना त्याला चक्र जोडल्याशिवाय पूर्णपणे साकार होत नाही. ‘सृष्टीचक्र’ या पूर्ण शब्दातून होणारा बोध हेच स्पष्ट करतो की, एका ठराविक कालावधीनंतर संपूर्ण सृष्टी पुन्हा – पुन्हा त्याच ठिकाणी येत असते.
[…]

सवयीचे गुलाम

प्रकाशन दिनांक :- 18/05/2003
परवा सहजच एका परिचिताच्या संदर्भात दवाखान्यात जाण्याचा प्रसंग आला. गर्दी भरपूर होती. त्या गर्दीतीलच दोघांचा संवाद कानी आला.
[…]

वैचारिक प्रदूषण सर्वाधिक घातक!

‘आनो भद्रा ऋतवो यन्तु विश्वत:’. वेदातील या प्रार्थनेचा अर्थ आहे, सकल विश्वातून उत्तमोत्तम विचार आमच्यापर्यंत येवोत. व्यक्ती किंवा समाजाच्या घडवणुकीतील उत्तम विचारांचे महत्त्वच या प्रार्थनेतून अधोरेखित होते. […]

सज्जनांनो, आग लावा व्यवस्थेला!

प्रकाशन दिनांक :- 04/05/2003

कलियुगाला प्रारंभ केव्हा झाला याबद्दल तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. काहींच्या मते भारतीय युद्धाच्या (संदर्भ – महाभारत) प्रारंभापासून कलियुगाला सुरूवात झाली तर बरेच लोक श्रीकृष्णाच्या निर्याणापासून कलियुग प्रारंभ झाल्याचा दावा करतात. भीम आणि दुर्योधन यांच्यातील अंतिम गदायुद्धात भीमाने श्रीकृष्णाच्या निर्देशावरून दुर्योधनाच्या मांडीवर गदाप्रहार केला.
[…]

विदर्भाच्या मागणीचे ‘इगीत’

प्रकाशन दिनांक :- 27/04/2003

हिन्दुस्थानला इंठाजांच्या जोखडातून सोडविण्याकरिता हजारो नव्हे, लाखोंनी बलिदान दिले. हे स्वातंत्र्य मिळविण्याकरिता अनेकांनी अनेक मार्ग चोखाळले. भगतसिंग-राजगुरुंचा आपला मार्ग होता, तर सुभाषचंद्र बोसांचा व सावरकरांचा वेगळाच मार्ग.
[…]

यापेक्षा सरळ गोळ्याच घाला

प्रकाशन दिनांक :- 30/03/2003

आपल्या देशात सध्या सर्वाधिक महाग वस्तू काय आहे, असा प्रश्न कोणी केलाच तर चटकन सेकंदाचाही वेळ न लावता उत्तर समोर येईल, ते म्हणजे ‘जगणे’. अर्थात हे उत्तर राजकारणी आणि नोकरशाही या जमातीला लागू पडत नाही कारण या महागाईचे उद्गाते ते स्वत:च आहे. ज्याच्या हाती पलिता आहे तो स्वत:ला त्याची आच कशी लागू देईल?
[…]

गोमाता आणि म्हैस

प्रकाशन दिनांक :- 23/03/2003

घटना तशी जुनी, परंतु फार उद्बोधक आहे. रेसमध्ये धावणारे घोडे बाळगणारा एका तबेल्याचा मालक एकदा फार चिंतेत पडला होता. रेसमध्ये नेहमीच आघाडीवर राहून, रेस जिंकून त्याला भरपूर पैसे मिळवून देणारे त्याचे घोडे अचानक माघारु लागले.
[…]

आदर्शाचे मापदंड

प्रकाशन दिनांक :- 16/03/2003

सध्याची युवा पिढी भरकटली आहे, हे सगळेच मान्य करतात. या पिढीच्या भरकटण्यामागे अनेक कारणेदेखील सांगितली जातात आणि त्यातील सर्वाधिक महत्त्वाचे कारण असते ते या युवा पिढीसमोर कोणताही आदर्श नसणे. अर्थात हे कारण महत्त्वाचे आहे यात वादच नाही, परंतु याचा अर्थ समाजातील आदर्श संपलीच आहेत असाही होत नाही.
[…]

धोक्याची घंटा

प्रकाशन दिनांक :- 02/03/2003

एखादे राष्ट्र उभे राहते, टिकते, विकसित होते ते कशामुळे? त्या राष्ट्रातल्या नैसर्गिक साधन संपत्तीमुळे, वाहणाऱ्या नद्यांमुळे, जमिनीच्या पोटात सापडणाऱ्या खनिजामुळे, दूरवर पसरलेल्या डोंगररांगामुळे की, विपुल पीक देणाऱ्या शेतीमुळे? नाही!
[…]

मेरा भारत..?

नुकताच संपूर्ण भारत वर्षात 54 वा प्रजासत्ताक दिन हर्षोल्हासात साजरा झाला, अगदी नेहमीप्रमाणे! दिल्लीत लाल किल्ला सजला, पंतप्रधान राष्ट्रपतींनी राष्ट्राला शुभेच्छा संदेश दिले, राजपथावर सैन्याचे शिस्तबध्द दिमाखदार संचलन झाले, विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून राष्ट्रीय एकतेचे प्रदर्शन यथास्थित पार पडले. 15 ऑगस्टपासून धुळखात पडलेल्या देशभक्तीपर गीतांच्या ध्वनिफिती अगदी रामप्रहरापासून दिवसभर देशभक्तीचा माहौल निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होत्या. […]

1 39 40 41 42 43 44
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..