नवीन लेखन...

नियंत्रण की मुस्कटदाबी?

प्रकाशन दिनांक :- 23/11/2003

शासनव्यवस्था कुठलीही असो, ती कोणत्याही एकाच घटकावर अवलंबून नसते किंवा त्या व्यवस्थेच्या सुचारूपणाला कोणताही एकच घटक जबाबदार नसतो. अगदी हुकुमशाही असली तरी हुकुमशहाला सैन्याची, मुलकी अधिकाऱ्यांची मदत घ्यावीच लागते. परस्परांशी संबंधित अशा अनेक घटकांनी मिळूनच कोणतीही शासन व्यवस्था प्रभावीपणे कार्य करू शकते, यशस्वी होऊ शकते.
[…]

पुरस्कार आणि तिरस्कार

प्रकाशन दिनांक :- 09/11/2003
जगात भारताची ओळख भारतातील नानाविध वैशिष्ट्यांमुळे अनेक प्रकारे स्थापित झाली आहे. अर्थात ही सगळीच वैशिष्ट्ये आपल्यासाठी भूषणावह आहेतच असे नाही, उलट बहुतेक वैशिष्ट्यांनी भारत जगाच्या पाठीवर कुचेष्टेचाच विषय ठरला आहे. सर्वाधिक सुट्ट्या घेणारा देश ही आपली एक ओळख आपल्या आळशी आणि बेपर्वा वृत्तीचे जसे जाहीर प्रदर्शन ठरते, तद्वतच विपुल नैसर्गिक साधन संपत्ती, मनुष्यबळ असतानादेखील देशात असलेली गरिबी आपल्या नियोजनशून्य कल्पकतेला उघडे पाडीत असते.
[…]

शासकीय दरोडा!

प्रकाशन दिनांक :- 19/10/2003

ब्रिटिशांच्या जोखडातून हिंदुस्थानला मुक्त करण्यासाठी असंख्य ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या सर्वस्वाची आहुती दिली. आज आपण स्वतंत्र आणि सार्वभौम देशात मुक्तपणे श्वास घेत आहोत ते या लोकांच्या बलिदानामुळेच. स्वातंत्र्यवीरांच्या समरगाथा आम्हाला नेहमीच स्फूर्तिदायक वाटत आल्या आहेत.
[…]

नेतृत्वाचे निकष?

प्रकाशन दिनांक :- 12/10/2003
‘तर्कदुष्ट विनोद’ या वाकप्रचाराची नेमकी व्याख्या कदाचित करता येणार नाही, परंतु तर्कदुष्ट विनोद ही संकल्पना स्पष्ट करणारी असंख्य उदाहरणे देता येतील. सर्वात मोठे उदाहरण तर इथल्या लोकशाही व्यवस्थेनेच उपलब्ध करून दिले आहे. साधा चपराशी कुणाला व्हायचे असेल तर त्याच्याजवळ सातवी किंवा दहावी उत्तीर्णची शैक्षणिक पात्रता असावी लागते; परंतु आमदार, खासदार, मंत्री एवढेच नव्हे तर अगदी पंतप्रधान होण्यासाठी ही कुठल्याही शैक्षणिक पात्रतेची गरज नाही.
[…]

देशभक्तीचे बदलते आयाम!

प्रकाशन दिनांक :- 28/09/2003
देशाला स्वातंत्र्य मिळून अर्धशतकाचा कालावधी उलटून गेला. स्वातंत्र्याचा उपभोग घेणारी तिसरी पिढी जन्माला आली. शेकडो वर्षांच्या संघर्षाचे एक पर्व संपले, परंतु त्याचा अर्थ संघर्ष संपला असा करता येणार नाही.
[…]

छोटीशीच; पण… खूप महत्त्वाची!

प्रकाशन दिनांक :- 21/09/2003

राघोबा दादांनी नारायणराव पेशव्यास ‘धरावे’ असा लिखित आदेश गारद्यांना दिला. तो आदेश गारद्यांच्या हाती पडण्यापूर्वी आनंदीबाईनी ‘ध’ चा ‘मा’ केला आणि शनिवारवाड्याच्या भिंतींनी अनुभवला क्रौर्याचा भीषण थरार! नारायणरावांच्या प्राणांतिक किंकाळ्यांनी अवघी पेशवाई हादरली.
[…]

कुणा मुखी पडते लोणी…!

प्रकाशन दिनांक :- 14/09/2003

भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र आह. आपल्या घटनेतच तसे लिहिले आहे. प्रजासत्ताक म्हणजे सत्तेची सूत्र प्रजेच्या हाती असलेले.
[…]

केवळ उत्सवप्रियताच!

प्रकाशन दिनांक :- 07/09/2003

मनुष्यप्राण्याची आणि त्यातही आपल्या देशातील मनुष्यप्राण्याची काही खास वैशिष्ट्ये सांगायची असतील तर त्यात ‘उत्सवप्रियता’ या वैशिष्ट्याचा प्रामुख्याने समावेश करावा लागेल. साजरा करणे या एकमेव ध्येयाने पछाडलेल्या या देशातील लोकांनी अगदी नको त्या गोष्टीला नको तितके महत्त्व देऊन उत्सवाचे स्वरूप दिले आहे. त्यामुळे अगदी वैयक्तिक किंवा खासगी स्वरूपात साजरी करण्याची बाबसुद्धा सार्वजनिक होऊन गेली आहे.
[…]

रिकामटेकड्यांचे उद्योग

प्रकाशन दिनांक :- 31/08/2003

‘घ्ह घ्ह्ग्र्ी ानीब् ूग्स ग्े ूार्ी ूग्स, ाहूग्ीा म्दल्हूीब् ग्े ल्ीग्हर्ीत् र्ीह् ानीब् स्र्ीह ग्े ार्ेजीू ग्ह ानीब् िगत्् ार्ेमज्ू प्ग्े दैह िगत््’
भारताला भेट दिलेल्या एका अमेरिकन माणसाने केलेले हे भारताचे वर्णन आहे. या वर्णनात अतिशयोक्ती अजिबात नाही. हेटाळणीचा सूर असेल, परंतु तो वस्तुस्थितीला सोडून नाही.
[…]

दिशाहीन संवेदनशीलता!

प्रकाशन दिनांक :- 24/08/2003

‘नेमेचि येतो मग तो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे येण्या-जाण्याची सराईत नियमितता पाळणारा स्वातंत्र्यदिन आला आणि गेलाही. 56 वर्षाच्या वहिवाटीने निर्माण झालेला तोच तोचपणा वगळता बाकी नवीन काही नव्हते. जिथे स्वातंत्र्यच दीन झाले आहे तिथे स्वातंत्र्यदिनात तरी उत्साह कुठला म्हणा!
[…]

1 37 38 39 40 41 44
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..