एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जगात मोठी क्रांती घडत होती ज्याच्या आगमनानं येणारी सर्व शतकं, अनेक पिढ्या “टेक्नो सॅव्ही” होणार होत्या, क्लास ए, बी, च्या प्रतिष्ठेला मानाचा तुरा प्राप्त झाला, “टाईप रायटर” च्या रुपानं कार्यालयीन कामकाजात लिखापढी वाढल्यानंतर मनुष्यबळाची मर्यादा लक्षात येऊ लागल्या व लेखन यंत्राची गरज ही भासू लागली. […]
जवळपास दीड दशकांपूर्वी सॉफ्ट ड्रींक्स चा विस्तार झपाट्याने होत होता; वेगवेगळ्या फ्लेवर्सची आणि नामांकित ब्रॅण्ड्सची शीतपेय लोकांना आवडू लागली होती आणि त्यांच्यासाठी अशी कोल्ड्रींक्स् म्हणजे काहीतरी खास असंच होतं…. […]
आज कधीतरी प्रदर्शनातून हिंडताना किंवा एखाद्या संग्रहालयाला भेट देतो त्यावेळी तांबा, पितळ व जर्मनच्या वस्तु विक्रीसाठी तर कुठे फक्त माहिती कळावी म्हणून ठेवलेल्या असतात. थोडसं हसू ही येतं, कारण काल परवा पर्यंत वापरातल्या गोष्टींना आता अॅन्टीकचा दर्जा प्राप्त झालेला आहे.. […]
आज महामार्ग, फ्लायओव्हर आणि रेल्वेच्या जाळ्याने एकसंघ बनलेल्या मुंबई शहराच्या दळणवळणाच्या सुविधांमध्ये तेव्हा पालखी, होड्या आणि घोडागाड्या यांचा समावेश असे. कालांतराने रस्तांचे जाळे विणले गेले. भारतातील पहिली रेल्वे मुंबईत सुरु झाली. वाहतुकीची साधने वाढली तशीच नव्या साधनांची गरजही वाढू लागली. १८७४ मध्ये मुंबईत ट्रामगाडयांची वाहतूक सुरु झाली. […]
मुंबईवरील इंग्रजी सत्तेची पहिली चाळीस वर्षे लोटल्यावर साधारपणे १७१० नंतर – रोग, पराचक्रे इ. संकटांचे भय बरेचसे ओसरले होते. बळ आणि आत्मविश्वास हे गुण वाढले तेव्हां काहीशा निर्भयपणाने इंग्रज प्रगतीचा मार्ग आक्रमू लागला. […]
गिरगावातील ‘माधवाश्रम’ हे हॉटेल १९०८ साली सुरू झाले. या हॉटेलला आता ११० वर्षे पूर्ण झाली आहेत. सीएसटी स्टेशनजवळचंच ‘विठ्ठल भेळवाला’ म्हणजे चाट पदार्थाचं शाही जॉइंट! विठ्ठल खांडवाला यांनी १८७५ मध्ये हे हॉटेल सुरू केलं. […]
……. त्या काळी रेल्वे गाडीमध्ये आणि रेल्वे स्थानकांवरही आजच्यासारखे मुबलक खाद्यपदार्थ मिळत नसत. त्यामुळे दादरला रेल्वेतून उतरल्या उतरल्या प्रवासी मामा काणे यांच्या उपाहारगृहात जात असत….. […]