पाच दिवस माहेरपणाला राहून, आजच आमची लेक सासरी रवाना झाली, आणि लेकीच्या वास्तव्याने गजबजलेलं आमचं घर शांत झालं. तसे आम्ही घरात तिघं असतो. आणि उभयतां पती पत्नी, आणि आमचा लेक. पण तो असतो पाऊण दिवस त्याच्य कामात आणि त्यानंतर आपल्या मोबाईल मध्ये अथवा वाचनात, ही स्वयंपाक, इतर कामं निपटून, तिच्या असंख्य मैत्रिणींच्या व्हॉट्सॲप समूहात आणि मी […]
आयुष्यात आनंद मिळवायचा हा मूळ उद्देश सोडून देऊन तो आनंद कसा मिळवायचा यावरून जगामध्ये भांडणं आणि कट्टरता सुरू आहे. आपल्या धर्माकडे तटस्थ वृत्तीने बघून जे त्याज्य आहे ते टाकून देऊन जे उपयुक्त आहे जे आधुनिक सुधारीत जगामध्ये उपयुक्त आहे तेच स्वीकारायचे, हा विवेकानंदांचा धर्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन मुस्लिम समाजानेही आत्मसात करावा, या मताचा मी आहे. […]
अस म्हणतात की शेवटच्या काळात माणसाला आपल्या चुकांची, पाप पुण्याची, आत्मपरीक्षण करण्याची इच्छा होते. आणि आज माझ्या बाबतीत असेच झाले आहे. आता जून महिन्यात शाळा सुरू होणार असून त्यासाठी मुलांना गणवेश. इतर शालेय वस्तू आणण्यासाठी आईबाबांची लगबग सुरू होते. काल नातू वरद म्हणजे कान्हा माझा हा बाजारात जाऊन हे सगळे आणले. ते दाखवत असताना मी त्याला […]
दिग्दर्शकाच्या मार्गदर्शनाखाली, कलाकारांच्या अभिनयातून रंगमंचावर साकारले जाणारे नाटक सर्वात आधी उमटते ते नाटककाराच्या मनात. कधी एखादी सामाजिक समस्या कधी कुठली राजकीय बातमी, कधी चक्क पुराणकथा, कधी मनात उमटणारे भावनांचे संदर्भहीन तरंग, कशामुळे नाटककाराच्या मनात नाटकाची ठिणगी पडेल सांगता येत नाही. पण ही ठिणगीच नंतर प्रेक्षकांच्या मनात विचारांची ज्वाला पेटवते. नाटक हे जसं करमणुकीचं साधन आहे, तसंच […]
कोरोना पित्यर्थ सतत बाहेर पडणारी माणसे आता घरात पडून आहेत. सप्ताहात एकदा घरी असले की कसे गोड वाटायचे.आता मात्र खिडकीवाटे डोकावले तरी , डोकावण्याचे सुख काय असते याचा अनुभव येतो. […]
आधीच्या दोन नाटीकांत पाहिलतं ना मुखवटे कसे घालावे लागतात ते आणि ते मुखवटे कसा चेहरा मोहराच बदलून टाकतात ते? तरीही मुखवटे घालण्याची हौस कांही जात नाही. जोपर्यत मानवजात ह्या जगांत आहे तोवर तोंडाला रंग फासणे चालूच रहाणार. […]
स्वारी च्या संभाषणातून इंग्लिश शब्दांचा अगदी भडीमार होत होता आधी त्याच्या मित्राचा फोन असावा बहुतेक यावर त्याने त्याच्या ऑफिस बद्दल बर्याच फुशारक्या मारल्या. […]
ज्ञानेश्वरीतील पहिल्या काही ओव्या वाचल्या कि माऊलींच्या प्रतिभेची ताकत लक्षात येते. आणि आपण किती नकळतपणे आपला देव अक्षर रुपात पाहू लागतो, याची आपल्याला कल्पनाही येत नाही. […]
आता तुझ्या वर आईचे संस्कार झालेले आहेत म्हणून त्याबद्दल जास्त सांगत नाही. फार तंग कपडे. हवामानाचा विचार करून. आवश्यक तेवढेच. वारेमाप खर्च करून आवडते म्हणून आणणे बरोबर नाही. हौस मौज करावी नक्कीच पण मर्यादित. सांगायला बरेच काही आहे म्हणून तुला जास्त सांगणार नाही. पैसा वाचवणे म्हणजे मिळवणे होय. खर तर मला हे सांगायला नको वाटते तरीही सांगावेसे वाटते की आयुष्यात तुमच्या भाषेत सांगायचं तर एन्जॉय म्हणून मूल उशिरा होऊ देणे हे अजिबात चुकीचे आहे. आधीच वय शिक्षण नोकरी लग्न हे सगळे वेळीच होत नाही त्यात हा विचार याचा काय परिणाम होतो याचा विचार करून निर्णय घ्यावा. […]
अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये प्राचार्य डॉ. विश्वास पाटील यांनी लिहिलेला हा लेख महाराष्ट्राच्या संत परंपरेचे रहस्य आपल्या अभंगातून मांडताना बहिणाबाईंनी सार्थपणे असे म्हटले आहे की ज्या वारकरी धर्माचा पाया ज्ञानोबांनी घातला त्याच्या कलश स्थानी तुकोबा आहेत. तुकोबांचा अभ्यास म्हणजे एका महायात्रेच्या प्रस्थानासाठी सिद्ध होणे आहे. ही आंतरिक अशी यात्रा आहे. ही धरणीवरल्या माणसाला आकाशाची […]