लॉक डाउन मुळे प्रकाशन व्यवसायावर आणि प्रकाशित पुस्तका, काव्य संग्रह, कथासंग्रह वर चांगलाच परिणाम होणार आहे आणि झाला पण आहे. काहिं मासिकां च्या आवृत्या ज्या वर्षोपासुन नियमित निघायच्या त्यात खंड पडला. पण जे वेब मासिक निघत होते त्यांच्यावर असर झाला नाही. […]
सिद्धांत आणि मानव खूप जवळचे मित्र. त्यातला मानव अर्धे शिक्षण गावात पूर्ण करून आलेला आणि सिद्धांत अस्सल शहरी मुलगा. दोघेही विज्ञान शाखेचे पदवीधर. खूप दिवसांनी मानव आणि सिद्धांत ऐकमेकांना भेटतात. ते एका हॉटेल मध्ये भेटतात. त्यावेळी त्यांच्या जुन्या आठवणी ताज्या होतात. […]
१९४९-५० सालचा काळ होता तो, नासिक जवळील संसरी या टुमदार गावातील वास्तव्य.मला स्पष्ट पणे आठवते. देवळाली कॅम्पातुन नंतर जवळच्या संसरी गावी आम्ही रहायला गेल्याचे आठवते. […]
‘साहित्य’ हा समाजमनाचा आरसा असतो. माणसाला व्यक्त व्हावेसे वाटते. ती त्याची मानसिक गरज असते. व्यक्त होण्याचे प्रकार निरनिराळे. त्यातलाच एक प्रकार ‘पांढ-यावर काळे’ करणे किंवा साहित्यनिर्मिती. काळानुरूप हे ‘पांढ-यावर काळे’ काॅम्प्यूटर’ किंवा स्मार्ट फोनच्या स्क्रीनवर व्हायला लागले आहे. […]
रमेश तामिळनाडू मधून एम.टेक. करण्यासाठी केरळच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये आला होता.त्याचे गाव पाँडेचरीच्या आसपास कुठेतरी होते. तामिळ पिक्चरचा जबरदस्त फॅन असलेला रमेश दिसायला आणि वागायला पण एकदम टिपिकल तामिळ सिनेमातले कॅरॅक्टर! उंच, सावळा, कपाळावरचे केस थोडेसे मागे गेलेले आणि टिपिकल रजनीकांत स्टाईल मिशा ठेवणारा. आम्ही सगळे त्याला “अण्णा” म्हणूनच हाक मारायचो! […]
तुमच्या आमच्या साऱ्यांच्या जीवनात कितीतरी महत्वाची भूमिका बजावणारी ही टपालपेटी आता फारशी दिसत नाही. पूर्वी ती अशीच कुठेतरी शहराच्या मध्यवर्ती चौकात, झाडाच्या खोडाला, गावात कुणाच्या तरी दारात तरी लावलेली असायची. ठराविक वेळेला ती पेटी उघडण्यासाठी टपाल खात्याचा कर्मचारी यायचा आणि गाठोड भरून पत्र, पाकिट घेऊन जायचा. […]
आपण सारेच उत्सवप्रिय आहोत. आपल्याकडे सातत्याने उत्सव साजरे होत असतात. समारंभ होत असतात कार्यक्रमही होत असतात. उत्सव आणि कार्यक्रमात आपल्याकडे फारच उत्साह संचारलेला पहायला मिळतो. कार्यक्रमाचे तर विचारूच नका. कार्यक्रम कोण केव्हा कसा घेईल हे सांगता येत नाही. त्यातही नाना तऱ्हा असतात कार्यक्रमाच्या. […]
तुमच्या माझ्या आयुष्यात येणारा आणि सतत पाहिला जाणारा घटक म्हणजे तार. आपल्या सर्वांच्या आयुष्यात तसं म्हणायला गेलं तर तारेचा कितीसा उपयोग आहे, असं विचारलं तर काहीच नाही, असंच काहीस उत्तर पटकन येतं. पण जेव्हा आपण थोडसं डोळसपणे हे जाणून घ्यायला लागलो की डोळ्यांनी न दिसणाऱ्या तारेच महत्व आपल्याला पटु लागतं. […]
समाज म्हणून आपण इतके निर्ढावलेलो आहोत की आपल्या समोर येणाऱ्या आत्महत्यांच्या घटनांचे आपल्याला काहीच वाटत नाही. अंगावरची घाण झटकावी इतक्या सहजपणे आपण या घटना वाचतो, ऐकतो आणि दुसऱ्या क्षणाला विसरुन जातो. […]