अशक्तपणा वाटत असल्यामुळे मी आरामात चालत ईमिग्रेशन काउंटरला पोहचले. पण मागच्या वेळेसारखे खूप चालणे नव्हते आणि ईमिग्रेशनची लाईनपण जास्त नव्हती. देवच पावला! बाहेर येऊन टॅक्सी केली. आणि डायरेक्ट सडबरी टाऊनला गेले. […]
(माजी) प्राचार्य, (माजी) प्राध्यापक, आजीव प्रशिक्षक आणि त्याहीपेक्षा आजीव शिक्षक असे अनिल काळेले सर रायपूरच्या वास्तव्यात मला भेटणे हे आम्हां उभयतांचे भागधेय ! मराठी माणूस अमराठी मुलुखात भेटणे या अपूर्वाईपेक्षा दोन गोष्टींमुळे आम्ही अधिक जवळ आलो – शिकवणे आणि रंगभूमी ! […]
मानसिक स्वास्थ्य आपल्या भावनात्मक, मानसिक आणि सामाजिक बाबींशी निगडीत असतं. आपण कसा विचार करतो, अनुभवतो आणि कृती करतो ? यावर ते अवलंबून असतं. अनेकदा नकळत आपल्या अंतर्मनावर ताण येत असतो, तो जाणवत नाही आणि म्हणूनच कळतही नाही. […]
आपल्या पाडसांपासून तात्पुरते/कायमचे दुरावलेले नव्याने जुनंच जगायला लागतात- रुहमें फासले नहीं होते ! “क्लब ६०” हा असा दुर्लक्षित शिक्षक ! वयाच्या उताराला लागल्यावर त्या टप्प्याचे शिक्षण देणारा !! […]
चित्रपटाचे संगीतकार नौशाद हे ट्रायल पाहून, तणतणत मंगेश देसाईकडे आले व ‘साले, साऊंड मिक्सींग करनेवाले, मेरे गाने का सत्यानास किया तुने xxxx’ असे आवाज चढवून भांडू लागले. मंगेशने देखील त्यांना वरच्या पट्टीतच उत्तर दिले, ‘थिएटर में देखना और बुरा लगे तो इधर वापस मत आना xxxx’ ‘पाकिझा’ चित्रपटाचा ‘प्रिमिअर शो’ पाहून नौशाद, मंगेश देसाईला भेटायला आले व अक्षरशः त्याला लोटांगण घातले. […]
नैराश्य आणि वैराग्य या दोन वेगळ्या वाटा आहेत, हे ज्याला समजलं तो आपल्या मानसिक स्थितीची योग्य फोड करून त्यावर काम करू शकतो किंवा त्याला सुस्थितीत आणण्याचे प्रयत्न करू शकतो. […]
ती जिचं विजयला शाळेत असताना आकर्षण होतं ती म्हणजे निलिमा…विजयच आयुष्य ढवळून काढणारी पहिली मुलगी दिसायला ? विजयच्या आयुष्यात आलेली सर्वात सुंदर स्त्री…विजय आणि तिचीही एक गोड कथा आहे ती ही सांगू कधीतरी या कथेच्या ओघात… […]
कुणा कडे दुर्लक्ष करायचे. घासाघीस कुठे करायची. हे सगळे आम्हाला पण समजते. आमच्या काळी तर बाहेर जायचे नव्हतेच पण आम्ही मात्र मुलांना सातच्या आत घरात अशी समज दिली होती. […]
प्लेनच्या बाहेर आल्यावर थंडगार वाऱ्याने माझे स्वागत केले. मोकळा श्वास मन भरून घेतला. आणि जिना उतरून फ्रॅंकफर्टच्या जमिनीवर पाय ठेवला. मला नेहमीच पर-प्रांतीय भूमीवर पाय ठेवण्याचं फार कुतूहल होतं. वसुंधरा एकच, पण माती भिन्न, त्यात वाढणारे जीव वेगळे. त्यांची जडण, घडण वेगळी. त्या भूमीवर पाय ठेवताना असेच विचार मनात येत होते. ‘घटा-घाटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे’. तसेच काहीसे मला भूमीच्या बाबतीत वाटते. […]