१० मे १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाची स्मृती जागवा
१० मे २०१६ ला भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य-युद्धाला १५९ वर्षें पूर्ण होतील. तें युद्ध १० मे १८५७ ला सुरूं झालें होतें. जरी इंग्रजांनी त्याची ‘गदर’ म्हणून संभावना केली असली तरी, तें स्वातंत्र्ययुद्धच होतें, हें स्वातंत्र्यवीर सावरकरांनी १९०७ मधील त्यांच्या ग्रंथाद्वारें दाखवून दिलेलें आहे. हें स्वातंत्र्ययुद्ध असफल झालें असें म्हटलें जातें. बहादुरशहा जफर याला दूर ब्रह्मदेशात कैदेत ठेवलें […]