नवीन लेखन...

आरोग्यविषयक लेख

सकाळचा नाश्ता

लहानांपासून थोरापर्यंत सकाळी-सकाळी नाश्त्याची आवश्यकता असते. रात्रभर शरीराने विश्रांती घेतली असली तरीही हा नाश्ता खूप उपयोगी आहे व जेवणाच्या कालावधीपर्यंत ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी उत्तम आहे. मात्र हा नाश्ता प्रत्येक ऋतुमानानुसार घेणं आवश्यक आहे. केवळ चहा पिणे म्हणजे रोगाला निमंत्रण देण्यासारखे आहे. नाश्ता म्हणजे काय ? सकाळी ९ च्या अगोदर नाश्ता महत्वाचा आहे. भरपेट जेवण म्हणजे नाश्ता […]

खेकडे खाल्ल्याने होणारे आठ फायदे

व्हॉटसऍपवर व्हायरल झालेला डॉ. भूषण सोहनी यांचा हा लेख वाचकांसाठी प्रकाशित करत आहोत.  अत्यंत उपयुक्त माहिती दिल्याबद्दल डॉक्टरांचे आभार  ’८′ हेल्दी कारणांसाठी ‘खेकड्यां’चा घ्या जरूर आस्वाद !  मांसाहार्‍यांच्या आहारात मासे, अंडी, चिकन या सोबतच आवर्जून आढळणारा एक पदार्थ म्हणजे ‘खेकडे’. सूप, सलाड आणि स्टार्ट्स अशा वेगवेगळ्या प्रकारातून त्याचा आहारात समावेश केला जाऊ शकतो. खेकड्यांमधून मिनरल्स, ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड्स, व्हिटामिन्स या सोबतच उच्च प्रतीच्या प्रोटीन्सचा शरीराला पुरवठा होतो. मग आहारात या चवदार पदार्थांचा […]

श्वासाचा मागोवा आणि चित्तांतील शांतता !

श्वासोछ्वास ही शरीराची अत्यंत महत्वाची नैसर्गिक क्रिया आहे. जीवंतपणाचे ते सर्वांत प्रमुख लक्षण असते. श्वास आहे तर जीवंतपणा आहे. त्याच्या शिवाय देह केवळ मृत झालेला असेल. जगण्यासाठी प्राथमिक गरज असते ती प्राणवायुची. अर्थात ऑक्सिजनची. वातावरणात तो मुबलक प्रमाणांत असतो. शरीर तो शोषून घेतो. व त्यातून शक्ती अर्थात उर्जा प्राप्त होते. जगण्याचे ते आद्य व प्रमुख साधन. […]

रघुवंशातील दिलीप राजा – गोष्टीतील शास्त्रीय विचार

श्रीरामप्रभूच्या रघुवंशाची ही कथा प्रसिद्ध आहे. रघुवंशातील थोर राजा दिलीप व त्याची पत्नी सुदक्षिणा यांना धन, धान्य, समृद्धी सर्वकाही परमेश्वराने ओतप्रोत दिले होते. परंतु निपुत्रिक असल्याने त्यांच्या आयुष्यात एक मोठे दुःख असते. पुत्रप्राप्तीसाठी वसिष्ठ ऋषि त्या दाम्पत्याला नंदिनी गाईची सेवा करण्यास सांगतात. ह्या सेवाव्रतामध्ये नंदिनी गाय ज्या ठिकाणी जाईल त्याठिकाणी तिच्याबरोबर दोघांनी जावे, ती बसेल तेव्हांच […]

आइसक्रीम खा…पण हे वाचा

बड्या बड्या कंपन्या आकर्षक आउटलेट्स उघडून खवैय्ये मंडळींना मेजवानी देण्याचा प्रयत्न करताना आपण पाहतो आहोत. परवाच चिपळूण मधेहि बस्किन रॉबिन या आंतरराष्ट्रिय ब्रैंडच आऊटलेट सुरु झालय. पण याच आईस्क्रमच्या पडद्यामागे अनेक गोष्टी आहेत. कदाचित त्या पासून आपण अनभिज्ञच आहोत. मागे एकदा रत्नागिरीला मिरजोळे एम आय डी सी मधे एका क्लाएंट बरोबर मिटींगसाठी माझ्या एका सरांबरोबर एका हॉटेलमध्ये गेलो होतो. तेव्हा माझ्या क्लायंटने अजून एका माणसाबरोबर ओळख करुन दिली . तो माणूस मुंबई मधे आईस्क्रीमचे निरनिराळे आणि नवनवीन फ्लेवर्स बनवतो आणि आईस्क्रीम कंपन्यांना विकतो. आता त्याला स्वतःचे माझ्या क्लायंट बरोबर आउटलेट उघडायचे होते त्यासाठी त्याला तिथे किंवा झाड़गाव एम आय […]

कलिंगडाच्या आरोग्यदायक बिया

आता कडक उन्हाळा सुरू झालाय. जिकडेतिकडे कलिंगडाचे ढीग रचलेले दिसतायत. उन्हामुळे शरीरातील कमी झालेलं पाणी भरुन काढायला कलिंगडाची मदत होते. ऊन्हाळ्यात फ्रूट-प्लेट सगळ्यांच्या आवडीची. त्यात आता कलिंगडाचं प्रमाण जास्तच असणार. मात्र, कलिंगड खाताना त्यातील बिया आपण नेहमीच फेकून देतो. पुढच्यावेळी कलिंगड खाताना बिया फेकून देऊ नका. कलिंगडाप्रमाणेच त्याच्या बिया गुणकारी असून आपल्या शरीराला फायद्याच्या असतात. कलिंगड […]

भारत ही मधुमेहाची जागतिक राजधानी आहे. पण का?

भारत ही मधुमेहाची जागतिक राजधानी आहे. मी स्वतः इंग्लंड, अमेरिका आणि सर्व स्कॅन्डीनेव्हियन देशांमध्ये भरपूर प्रवास केला आहे. वास्तविक ह्या देशांमधील खाण्यापिण्याच्या सवयी पहिल्या तर आपल्यापेक्षा जास्त गोड पदार्थ त्यांच्या जेवणात असतात. तरीदेखील भारताला मधुमेहाचा हा शाप का? ह्याविषयी सर्वात मुख्य लक्षात आलेला मुद्दा म्हणजे रात्रीच्या जेवणाच्या वेळा. ह्या वेस्टर्न कंट्रीजमध्ये, अगदी न्यूयॉर्क सारख्या मोठ्या शहरांमध्ये […]

हास्य उजळू दे

ताणतणावाच्या विरुद्ध क्रिया म्हणजे हास्य! हास्य ही परमेश्वराने मानवाला दिलेली सर्वांग सुंदर देणगी ! सुंदर हास्य हे मानवाशिवाय त्याने कोणालाच दिलेलं नाही. माकडचाळे केल्यावर माकड हसतं असे म्हणतात पण ते म्हणजे दात विचकण, त्याला सुंदर हास्य म्हणता येणार नाही. कोणत्याही अपेक्षेशिवाय तुमच्या स्वास्थासाठी मिळालेल्या या देणगीचा मानवाला कैकवेळा विसर पडतो आणि कधी उगाचच ताणतणावाच्या गर्तेत खोल […]

सकारात्मक नैतिक बळ

आपल्या शरीरात बिघाड होतो त्यामुळे एखादी व्याधी उत्पन्न होते. कधीकधी आयुष्यात सतत अडचणी, त्रास आणि समस्या यांच्या मालिकाच निर्माण होतात. मग हे दोन्ही प्रकारचे म्हणजे शारीरिक आणि मानसिक त्रास घालविण्यासाठी आपण आपल्या विचारात योग्य बदल करुन सुधारू शकतो का ? याचं उत्तर ‘होय ‘ असं द्यायला काहीच हरकत नाही. कारण मानसिक स्वास्थ बिघडलं तर त्यातून शारीरिक […]

जरा हसून पाहा !

आपण पाहातो, अनुभवतो की मानसिक ताणतणावामुळे प्रथम मनाचं आणि नंतर शरीराचं आरोग्य धोक्यात येतं. कारण ताणतणाव हे मानसिक अनारोग्याचं लक्षण आहे. एकदा अंतरंगातच बिघाड झाला तर त्याचे विपरीत परिणाम शरीरावर दिसायला कितीसा वेळ लागणार? मग या ताणतणावाच्या अगदी विरुद्ध क्रिया केली तर? आपलंच शरीर आणि मन. त्यात दोन वेगवेगळ्या भावनांच्या प्रभावाने जर दोन वेगळे परिणाम मिळणार […]

1 147 148 149 150 151 163
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..