नवीन लेखन...

आरोग्यविषयक लेख

गोरेपणाच्या मलमांच्या पानभर जाहिराती

प्रसिद्ध त्वचारोग तज्ञ डॉ. किरण नाबर यांनी दैनिक लोकसत्ताच्या संपादकांना लिहिलेले पत्र वाचा आणि पुढेही पाठवा…. प्रति, संपादक, दैनिक लोकसत्ता. महाशय, आपल्या वर्तमानपत्रात गेले कित्येक दिवस यू बी फेअर व नो स्कार मलमाच्या पान-पान भरून जाहिराती येत आहेत. या मलमांमध्ये स्टीरॉइड हे औषध आहे. ही मलमे चेहऱ्यावर लावल्यामुळे मुरमे येणे , त्वचा पातळ बनणे, त्वचा कायमची […]

नखांची स्वच्छता

निरोगी आरोग्यासाठी शरीराच्या स्वच्छतेसोबत हातांची आणि हातासोबत नखांची विशेष स्वच्छता करणे गरजेचे आहे. नखांमध्ये साचणार्‍या घाणीमुळे अनेक आजार होऊ शकतात. नखातील मळ अन्नपदार्थाच्याद्वारे आपल्या शरीरात जाऊन त्याचे आपल्याला अपाय होतात. यासाठी नखे नियमित स्वच्छ करावीत. नखांची अवाजवी वाढ ही आज-काल फॅशन मानली जात असली तरी ती आरोग्यासाठी धोकादायक आहे. यासाठी वाढलेली नखे लगेचच काढावीत. हात धुताना […]

त्वचेची स्वच्छता

आपली त्वचा ही अत्यंत नाजूक असते. त्यामुळे त्वचेची निगा राखण्याची नितांत गरज आहे. केवळ त्वचा स्वच्छ राखण्यामुळेही आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो. सध्या अनेक कारणांमुळे त्वचारोगांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. बाहेरून आल्यावर लगेचच हात-पाय, चेहरा पाण्याने स्वच्छ धुवावे. शक्य असल्यास साबणही वापरावा. त्वचेसाठी साबण निवडताना विशेष काळजी घ्यावी. आज-काल बाजारात साबणाचे शेकडो नमुने मिळतात. पण […]

पुरुष वंध्यत्व – आयुर्वेदाच्या चष्म्यातून

गर्भधारणेसाठी ऋतु – क्षेत्र – अम्बु – बीज हे चार घटक सुयोग्य स्थितीत असणे आवश्यक आहे. ऋतु म्हणजे योग्य काळ, क्षेत्र म्हणजे ठिकाण, अंबु म्हणजे आवश्यक असे सर्व हॉर्मोन्स व बीज म्हणजे सामर्थ्यवान पुरुष व स्त्रीबीज. हे चार घटक सर्वदृष्टीने समृद्ध आणि सामर्थ्यवान होण्यासाठी गर्भधारणेपूर्वी पुरुष व स्त्री दोघांनी पंचकर्माने शरीरशुद्धी करावी असा शास्त्रादेश आहे. दैनंदिन […]

शून्य कचरा परिसर !

सध्या मुंबईची लोकसंख्या दीड कोटींच्यावर आहे आणि त्यात रोज वाढच होत आहे त्यात दररोज जमा होणारा कचरा कित्येक मेट्रिक टन आहे. तसेच सातत्याने वाढणाऱ्या झोपडपट्ट्या, गृहसंकुलं त्यामुळे त्यात होणारी कचऱ्याची वाढ, त्याचे व्यवस्थापन आणि विल्हेवाट लावण्यासाठी होणारा कैक कोटींतील खर्च, डंम्पिंग ग्राऊंडच्या समस्या, ढिसाळ कारभार, भ्रष्टाचार, नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी आणि त्यावरील तोकडे उपाय अश्या सगळ्यातून मार्गक्रमण […]

अद्यावत तंत्रज्ञानाचे विनाशकारी दुष्परिणाम

एटीएम मधून डेंग्यू आणि मलेरियाचे लार्व्हा नोटांसोबत बाहेर येत असल्याचे, भारताच्या राजधानी दिल्ली व परिसरातील झालेल्या सर्वेक्षणात सिध्द झाले आहे.दिल्ली व परिसरात “राष्ट्रीय संक्रामक रोग नियंत्रण विभागाने” ५०० एटीएम यंत्रांचे सर्व्हेक्षण केल्यानंतर हे धक्कादायक सत्य उघडकीस आले.
[…]

कंटकारी / डोर्ली …एक अनुपम्य औषधी..!

आपल्या सभोवती अनेक वनस्पती असतात, परंतु त्यांच्या उपयोगाबाबत माहिती नसल्याने आपण त्या वनस्पतींना कचरा समजून बसतो. ह्याच वनस्पतींच्या माध्यमातून औषधी निर्माण करणाऱ्या कंपन्या योग्य उपयोग करून लाखो रुपये कमवितात. ग्रामीण भागात उपलब्ध असणाऱ्या वनस्पतींच्या उपयोगाबाबत, ग्रामीण जनता अनभिज्ञ असल्याने त्याचा जोड-व्यवसायासारखा उपयोग करत नाही. पर्यायाने औषधी खरेदी करतांना अनावश्यक किंमत मोजावी लागते. सहजतेने उपलब्ध होणाऱ्या वनस्पतींच्या […]

चाय पे चर्चा – आवळ्याचे तेल – देशी/ विदेशी

ऐन जवानीच्या दिवसांत ‘मम्मी ने तुम्हें चाय पे बुलाया है‘ हे गाणे कैकदा ऐकले होते. पण अस्मादिकांचे दुर्भाग्य, कुठल्या हि सुंदर पोरीच्या आईने आम्हाला चाय पे बोलविले नाही. एका सरकारी बाबूची पत ‘पोरींच्या आईच्या दरबारी किती आहे, हे हि कळले. गुपचूप माँ साहेबानी पसंत केलेल्या मुलीच्या गळ्यात वधूमाला घातली. चहा म्हंटले कि चर्चा तर होणारच. चहा […]

वराहकणींचे झाड, शेतकर्‍यांना मिळवून देईल घबाड !!!

विविध ताकदवान औषधांच्या निर्मितीत वापरली जाणारी, अश्वगंधा ही झुडूपवर्गीय वनस्पती असुन, सामान्यता भारतात मध्यप्रदेश व महाराष्ट्रात आढळून येते. भारताशिवाय स्पेन, मोरोक्को, इस्त्राईल, बलुचीस्थान व पूर्व आफ्रिकन देशांमध्ये उत्पादित केली जाते. ह्या वनस्पतीच्या झाडाला हातावर घासले असता घोड्याच्या मुत्रासारखा हिचा गंध येतो. […]

चमत्कारिक औषधी वनस्पती अगस्त !

प्राचीन भारतीय आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये हजारो वनस्पतींची माहिती व त्यांचे उपयोग दिलेले आहेत, परंतु पाश्चात्य संस्कृतीच्या अंधानुकरणाने भारावून गेलेल्या तथाकथित विद्वानांनी, ‘भारतीय ते त्याज्य आणि पाश्चात्य ते पूज्य अशी भ्रामक कल्पना रुजविल्याने भारतीय शास्त्र मागे पडत गेलीत.’

महागड्या एलोपेथिक उपचारांची वारंवार पुनरावृत्ती करूनही जे विकार बरे होत, नाही ते विकार आयुर्वेदातील सामान्य वनस्पतींच्या वापराने बरे होतात. फक्त यासाठी तज्ञ आणि अनुभवी वैधकीय मार्गदर्शकाची गरज आहे. वनस्पतींमध्ये निसर्गाने चमत्कारिक क्षमता भरून ठेवलेली आहे, या क्षमतेचा पुरेपूर आणि डोळसपणे वापर करणे आवश्यक आहे.

” वृषागस्तयो: पुष्पाणि तिक्तानि, कटूविपकानि क्षयाकासहरानि च |

अगस्तयं नातिशितोष्णम नक्तान्धानां प्रशस्यते || ” (सुश्रुत सूत्र. )

प्राचीन भारतीय ज्ञानाचा उपयोग जर, रोगोपचाराबरोबर राष्ट्रविकास आणि आर्थिक उन्नतीसाठी करता आला तर हा दुग्धशर्करा योगच ठरेल. […]

1 149 150 151 152 153 163
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..