नवीन लेखन...

पहिल्या पानावरुन तसेच इतरही विभागातून प्रमोट करण्यासारखे काही खास लेख

लोकल

पहिला वर्ग असू द्या नाही तर दुसरा वर्ग, इतक्या गर्दीतून तास-दोन तास मेंढरांसारख डब्यात कोंडून तुम्ही प्रवास करता तरी कसा ? आपल्याला तर गुदमरल्यासाखं होतं. परगांवाहून आलेला पाहुणा सांगत राहतो. ‘आम्हाला याची सवय आहे’ मुंबईकर अभिमानाने सांगत राहतो. रोजची दगदग हसत-हसत झेलत राहतो. लोकल पकडण्याचं आणि उतरण्याचं भयंकर दिव्य रोजचं करीत राहतो. […]

तोंडचं पाणी

पळत पळत तो मॅनेजरकडे गेला. पाणी कसं येणार ? सर्व इमारती पूर्ण झाल्यावरच पाणी मिळेल. तोपर्यंत काय ? तोपर्यंत टँकरनं पाणी पुरवठा. रात्री दहा-बारा टँकर आले. इमारतींच्या टाकीत पाणी टाकून गेले. ते पाणी दोन तासात संपलं. रात्रीपर्यंत ठणाणा. रात्री पाणी आलं. लोकांनी ते आपल्या टाक्यांत साठवल. दोन तासात पाणी संपलं. […]

मैदानाचा मृत्यू

सुरुवातीला पोहण्याच्या तलावासाठी तासाला दोन रुपये होते. ते कसेबसे भरुन उन्हाळ्यात का होईना पोरं पोहायला जात. वर्षभर शक्यच नव्हतं. कोट्यावधी रुपये खर्चून बांधलेला दृष्ट लागेल असा कॉम्प्लेक्स ओसच राहिला. नुकसान टाळण्यासाठी महापालिकेने तरण तलाव खाजगी कंत्राटदाराकडे दिला. त्याने तासाची फी १५ रुपये केली. पोरं बाहेरच राहिली.
[…]

चालणारा पोपट

चालणारा पोपट पहिल्यांदाच बघत होतो. त्यााला कधीच उडता येणार नव्हतं. कारण पंखांची टोकं कलात्मक पद्धतीनं कापून टाकलेली होती. उडणारे पोपट बघितले, पिंजऱ्यातले पोपट बघितले. पण चालणारा पोपट पहिल्यांदाच बघितला. […]

कथा कर्जत स्टेशनची

दहिवली या खेड्याचा आधार घेत कर्जत स्टेशनची बांधणी झाली. दहिवली, वेणगाव, तमनाथ, कडाव अशा अनेक खेड्यांना पेशव्यांनी भेटी दिल्याचाही उल्लेख आहे. १८५३ मध्ये मुंबई-ठाणे या मार्गावर सुरू झालेली रेल्वे १८६० सालापर्यंत कल्याण, बदलापूर, नेरळ, कांपोली (खोपोली) असा अडीच तासांचा रेल्वेप्रवास करीत होती. त्यावेळी मुंबई ते खोपोली तिकीट होतं २ रुपये. याच मार्गावर घाटाच्या पायथ्याशी रेल्वेमार्गांच्या बांधकामाचं सामान उतरवण्याकरता म्हणून व घाटात आवश्यक असलेला गाडी चढण्यापूर्वीचा मोठा थांबा, अशा दोन कारणांकरता कर्जतच्या अवाढव्य स्टेशनची बांधणी झाली. […]

गँगमन (कथा)

मैलोगणिक पसरलेल्या रेल्वे रुळांच रक्षण करुन ते व्यवस्थित ठेवायचे. म्हणजे ऊन-पावसात मैलोगणिक चालण्याची शारिरिक क्षमता हवी. इतकं चालणार कोण ? दिवसाकाठी दहा मैल डोंगरकपारी तुडवणारा आदिवासी या कामाला योग्यच होता. पण शहरापासून बिचकून राहणारा हा लाजाळू माणूस गँगमन म्हणूनकाम करायलाकसा तयार झाला कुणास ठाऊक. […]

माय रेट्रो… व्हॅलेन्टाईन

ही कथा सुरू होत आहे १९७२-७३ च्या काळात… तो काळ हिंदी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या राजेश खन्नाचा. तो त्या काळचा सुपरस्टार आणि जोडीला चटपटीत गोल चेहऱ्याची मुमताज ही जबरदस्त हीट जोडी! ‘कटी पतंग,’ ‘आराधना’, ‘अमर प्रेम’, ‘सफर’, ‘आनंद’, ‘अपना देश’, ‘दो रास्ते’ सारखे जबरदस्त हिट सिनेमे देणारा आमचा हिरो राजेश खन्ना. जणू आमचे दैवतच! अपऱ्या नाकाची, फुगीर गोबऱ्या गालांची मुमताज साथीला आल्यावर सिनेमात प्रेमसरिता खळाळून वाहू लागायची. मग आमचा अवतारही काही वेगळा नव्हता… […]

पुलाखालची माणसं (कथा)

ही पुलाखालची माणसं मुंबईच भयावह चित्रण आहेत. कुठेतरी वाळवी लागली आहे. बाकी सर्व प्रश्न सुटू शकतात पण एकदा लागलेली ही वाळवी शहर आतून-बाहेरून पोखरून काढणार. वर्षा-दोन वर्षापूर्वी पुलाखाली माणसं नव्हती. आता कुठल्याही पुलाखाली जाऊन पाहा. नशेत बुडालेल्या केविलवाण्या चेहऱ्यांची ही कळकट-मळकट मंडळी जनावराच्या नजरेन तुमच्याकडे पाहतील. […]

स्टेशन चिरेबंदी (कथा)

अस्ताव्यस्त पसरलेल्या या स्टेशनवर किती प्लॅटफॉर्म आहेत हे स्टेशनमास्तरला सुद्धा सांगता येणार नाही. किती पूल आहेत तेही मोजावे लागतील. कुठल्या पुलावर चढल्यावर कुठल्या प्लॅटफॉर्मवर उतरता येईल ? कुठे जाता येईल ? सांगता येणार नाही. कोण कुठे अडवील समजणार नाही. गर्दीत काहीही स्वत:च डोक न चालवता चालत राहिलात तरच स्टेशनच्या बाहेर पडू शकाल. […]

सापळा (कथा)

माणूस मुंबईत पाय ठेवतो. तो एकदा या सापळ्यात अडकला की खाऊन-पिऊन इतका गब्बर होतो की, सापळ्यात माणसं अडकतात, उंदीर नाहीत. ते रुळावर बसून गंमत बघतात. […]

1 83 84 85 86 87 240
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..