नवीन लेखन...

पहिल्या पानावरुन तसेच इतरही विभागातून प्रमोट करण्यासारखे काही खास लेख

चौकटीबाहेरचा माणूस – कुशल बद्रिके

अमूक एका चौकटीत बसणारा अभिनेता असं कुशलचं वर्णन करता येत नाही. कुशलचा अभिनय, त्याचं भाषेवरील प्रभुत्व, संवादांची फेक, अभिनयाची उंची हे सारं पाहता कुशल येणाऱया काळात छोटय़ा पडद्यापेक्षा रूपेरी पडदा चांगलाच गाजवेल, अशी खात्री मला वाटते. कलाकार चेहऱयापेक्षा त्याच्या अभिनयाने ओळखला जातो, ही जाण असलेले दिग्दर्शक पुढे आले की कुशलचा हात अभिनय क्षेत्रात कोणी धरणार नाही, हे नक्की! […]

फोर्टमध्ये फिरताना – भाग ४

भारतातील रेल्वेची मुहुर्तमेढ जिथे रोवली गेली ते बोरीबंदर स्थानक म्हणजे नगर चौकातले एक महत्त्वाचे आकर्षण. दररोज लाखो प्रवाशांची वर्दळ असलेले हे स्थानक आता “छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस” या नावाने ओळखले जात असले तरी अजूनही अनेकांच्या तोंडत व्ही.टी. स्टेशन (व्हिक्टोरिया टर्मिनस) हेच नाव बसलेले आहे. […]

काश्मिर खोर्‍यात सोशल मिडीयावर दहशतवादाचा प्रसार

बदलत्या युगात सोशल माध्यमे ही संपर्कासाठी विशेष महत्त्वाची ठरत आहेत; पण या माध्यमांचा चांगल्या कामासाठी वापर करणारी मंडळी आपल्याकडे कमी आहेत. या माध्यमांचा गैरवापर करून समाजात तेढ निर्माण करणे, एखाद्या व्यक्तीची प्रतिमा मलीन करणे, असा अनेकांचा कार्यक्रम सुरू असतो. नेमके हेच काश्मिर खोर्‍यात होत आहे. ही बाब घातक असून त्यासाठी सर्वांनी या माध्यमाचे महत्त्व जाणून त्याचा योग्य वापर केला पाहिजे. […]

डास चावताना घडणारा घटनाक्रम

हजारो माणसांमधून बरोबर आपल्यासाठी योग्य असे यजमान डास कसे शोधतात, त्यासाठी त्यांना मार्गदर्शन कसे व कुठून मिळत असावे हे प्रश्नचिन्ह माणसापुढे आजही, अजूनही आहे. निसर्गतः मिळालेली ही देणगी डासांसाठी हजारो वर्षे तशीच चालू आहे. […]

मैं रहूँ भूखा तो तुझसे भी न खाया जाए्‌

वाढलेल्या महागाईचा सामना करण्यासाठी वेतन आयोग जरुरीचाच. पण, महागाई फक्त कर्मचा-यांनाच असते का? शेतकरी किंवा बाकीचे असंघटित वर्ग काय वैभवात लोळत आहेत का? आज देशभरातील शेतकर्यांची अवस्था दयनीय झाली आहे. दहा वर्षानंतर एक वेतन आयोग या नियमाप्रमाणे स्वातंत्र्याच्या सात दशकात कर्मचाऱ्यांसाठी सात आयोग सरकारने नेमले आणि लागू देखील केले. मात्र कृषिप्रधान म्हणवल्या जाणाऱ्या या देशात शेतकऱ्यांसाठी आजवर केवळ एक (स्वामिनाथन)आयोग नेमण्यात आला, आणि त्याच्याही नशिबी वनवासच आला आहे. […]

चोखंद़ळ – सोनाली खरे

दूरदर्शनवरील ‘बंदिनी’, ‘दामिनी’ यासारख्या मालिकांतून अभिनयाचा श्रीगणेशा केलेल्या सोनाली खरेनं अल्पावधीतच मराठी इंडस्ट्रीत ग्लॅमरगर्ल म्हणून एक वेगळी ओळख निर्माण केली. या मालिकांमुळे सोनालीचा चेहरा महाराष्ट्रभर घराघरात पोहोचला. आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी मालिकांनंतर थेट हिंदी रुपेरी पडद्यावरून सोनालीनं रसिकमनावर मोहिनी घातली. […]

‘मानवनिर्मित प्रलय : केदारनाथ’

महापूर, भूकंप, ज्वालामुखी या अगोदर ‘नैसर्गिक आपत्ती’ म्हणून ओळखले जायचे. पण माणसाच्या स्वार्थी प्रवृत्तीमुळे त्याच आता ‘मानव निर्मित आपत्ती’ म्हणून ओळखले जातात. याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे २०१३ साली उत्तराखंडमध्ये आलेला महापूर. […]

राजकारण्यांचे नाकाने कांदे सोलणे

कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला असताना ‘राज’कारण्यांनी नाकाने कांदे सोलायला सुरवात केली आहे. राजकारणी आणि सत्ताधीशांनी किमान आतातरी नाकाने कांदे सोलणे थांबवावे आणि शेतीसाठी अनुकूल आणि पूरक धोरणे राबवून शेतीमध्ये निष्कारण होणारी शासकीय लुडबुड थांबवावी…!! […]

रंग… कला… आणि कटिंग चहा – रवी जाधव

रवी जाधव… आजचा आघाडीचा चित्रपट दिग्दर्शक… पण त्याच्या जडणघडणीत भक्कम असलेला त्याच्या कलेचा पाया महत्त्वाचा ठरतो… ‘टाइमपास’, ‘बालक पालक’, ‘नटरंग’, ‘बालगंधर्व’ या मराठी सिनेमांनी केवळ राज्यातच नव्हे तर देश-परदेशातल्या सिनेरसिकांवर आपली भुरळ घालत कोटय़वधी रुपयांचा गल्ला जमवला.आपल्या दिग्दर्शनात सातत्य राखत विक्रमांचे अनेक थर रचून मराठी सिनेसृष्टीत नवी क्रांती घडवून आणणारा दिग्दर्शक म्हणून रवीकडे पाहिलं जातं. […]

द रशियन कनेक्शन : रशिया टुरची नवी ओळख

जगातला सर्वात मोठा देश रशिया व ह्याच रशिया टुरसाठी आपण खरेच काय पाहतो ? रुशिया टूर करायची असल्यास आपण काय पाहतो तर, मॉस्को व सेंट पीटर्सबर्ग. ह्या रशियाच्या खऱ्या दोन राजधान्या होत, पण ह्यासाठी आपण किती दिवस देतो तर प्रत्येकी दोन किंवा तीन  दिवस ! पाच दिवसाच्या रशिया टूर मध्ये फक्त भुज्याला शिऊन येतो. आणि रशिया पर्यटन म्हणजे  केवळ मॉस्को व सेंट पीटर्सबर्ग पर्यंतच सीमित नाही. […]

1 200 201 202 203 204 240
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..