नवीन लेखन...

पहिल्या पानावरुन तसेच इतरही विभागातून प्रमोट करण्यासारखे काही खास लेख

भाषेची शुद्धाशुद्धता : एक चर्चा

२० ऑगस्ट २०१८ च्या ‘लोकसत्ता ( पुणें आवृत्ती)मधील बातमीद्वारें सई परांजपे यांचें भाषेबद्दलचें मत वाचलें ; तसेंच २१ऑगस्टच्या लोकसत्तातील ‘लोकमानस’मध्ये या विषयावरील विनित मासावकर व श्रीनिवास जोशी यांची मतेंही वाचनांत आली. ( एक स्पष्टीकरण : सई परांजपे यांची चर्चात्मक मुलाखात मी प्रत्यक्ष पाहिलेली-ऐकलेली नाहीं. त्याबद्दल ‘लोकसत्ता’मध्ये आलेल्या बातमीचाच संदर्भ मी येथें देऊं शकतो). सई परांजपे यांच्याबद्दल […]

हिंसक आंदोलनात सुरक्षा सामान्य माणसांची

गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात आणि एकूण देशात हिंसाचाराच्या घटना वाढल्या आहेत. या हिंसाचारात सर्वाधिक बळी जातात ते सामान्य माणसांचे. स्त्रिया, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक जे हिंसाचार घडत असलेल्या ठिकाणी अडकतात आणि ते मारहाण, जाळपोळ याला बळी पडतात. कामाकरिता बाहेर पडलेल्या लोकांना अचानक उसळलेल्या हिंसाचाराला बळी पडावे लागते. […]

स्वर्गीय अटलजी

मी भाग्यशाली होतो, १९९७ मध्ये प्रधानमंत्री कार्यालयात पोस्टिंग झाली. अटलजी प्रधानमंत्री झाले आणि […]

रंगांच्या दुनियेतील विविधरंगी रसायन… प्राध्यापक गजानन शेपाळ

काही माणसं उपजतच कलेचं लेणं घेऊन आलेली असतात. ती इतकी मोठी असतात पण तरीही प्रसिद्धिपराङमुख असतात. `राष्टपतीपदक’ विजेते.. चित्रकार प्राध्यापक गजानन शेपाळ हे अशांपैकीच एक. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये दिसणारे महात्मा ज्योतिबा फुले यांचे चित्र म्हणजे प्रा. शेपाळ यांचीच देणगी…. याच चित्रासाठी त्यांना राष्टपतीपदकाने गौरवण्यात आले. […]

मेरा भारत महान?

देश स्वतंत्र होऊन आज ७१ वर्ष पूर्ण झाली. सन १९४७ साली देश स्वतंत्र होताना आपण देशाची अखंडता आणि विविधतामे एकता राखण्याची शपथ घेतली असेल किंवा तसा संकल्प सोडला असेल. तसं आपण दरवर्षी ही शपथ घेतोच. आज पुन्हा ७२व्यांदा तशी शपथ घेऊन संकल्प सोडू आणि लगेच दुसऱ्या दिवसापासून आपापल्या जाती-धर्माच्या संम्मेलनात, महासंम्मेलनात, मोर्चात, सभांत किंवा अगदी गेला बाजार ज्ञातीवर्धक मंडळाच्या वळचणीला जाऊन कोण श्रेष्ठ, कोण कनिष्ठ याची हिरीरिने चर्चा करु. […]

खराब रस्ते

आपल्याकडे दरवर्षी नेमके पावसात किंवा पावसाच्या आधी रस्ते खराब होत असतात. खड्डे पडतात. प्रवासाला निघतांना आपण म्हणतो “ पावसाचे दिवस आहेत, रस्ते खराब झाले असणार – लवकर निघूया.“ अशी मानसिकता आपल्यात का आली? आपण मान्य करून घेतले कि पावसात रस्ते खराब असायलाच हवेत. परदेशी पण बर्यापैकी पाऊस पडतो तेथे का नाही रस्ते खराब होत? खराब होणारे […]

महाभारतातील स्त्री व्यक्तीरेखा

महाभारत सर्व भारतीयांच्या मनात आदर व विशेषतः हिंदू धर्मीयांच्या भाव भावनांचे प्रतीक. महाभारत किंवा त्यातील विविध पात्रे माहीत नाहीत अशी व्यक्ती सापडणे हे अत्यंत दुर्मिळ. मानवी जिवनातील भावभावनांचे प्रतिबींब आपणास यात पहायला मिळते. माणसाच्या विनाशास कारणीभूत ठरणारे काम, क्रोध, लोभ,मोह,मद, मत्सर हे षड्रिपू जर कुठे एकत्रीत पहायचे असतील तर तुम्ही फक्त महाभारत अभ्यासा तुम्हाला ते पावलोपावली […]

काय म्हणतंय तुमचं ड्रायव्हिंग?

“मग काय म्हणतंय तुमचं ड्रायव्हिंग?” हा प्रश्न विचारून लोक नवशिक्या ड्रायव्हरच्या जखमांवर का मीठ चोळतात कळत नाही. म्हणजे अशा प्रश्नांना काय उत्तर द्यायचे हा एक प्रश्नच असतो. बर्‍याचदा हा प्रश्न निर्मळ मनाने विचारला जातो की उगाचच डिवचायला हे समजणे अवघड असते. बरं ड्रायव्हर लोकांना नवीन गाडी शिकणार्‍याची व्यथा तरी समजते पण ज्याला ड्रायव्हिंगचे ओ का ठो […]

1 190 191 192 193 194 222
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..