पिंपळाला भारतीय समाजात मानाचे व पूजनीय स्थान आहे. हिंदू संस्कृतीत, ज्या वृक्षांना ‘तोडू नये’ असा दंडक आहे, त्यापैकी हा एक. अश्वत्थ मारुतीचे (पिंपळाखाली असलेल्या मारुतीचे) मारुतीचे पूजन हितकारी, पुण्यकारक म्हणून वर्णिले आहे. श्रावण महिन्यातील शनिवारी पिंपळाची पूजा करतात. पिंपळ हा पुष्य नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे. […]
पुरुषसूक्त हे ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलातील नव्वदावे सूक्त आहे. आपल्याला दिसणारे जग हे विराट परमेश्वराचा केवळ अंशभाग आहे हा या सूक्ताचा मुख्य विषय. विश्वपुरुष व त्याच्यापासून निर्माण झालेली सृष्टी यांचे वर्णन करणार्या या सूक्तात सोळा ऋचा असून रचयिता नारायण ऋषी व देवता पुरुष (परमेश्वर) आहे. मुख्यत्वे अनुष्टुप् छंदात रचलेल्या या सूक्ताची शेवटची ऋचा मात्र त्रिष्टुप् छंदात गुंफलेली […]
वटवृक्ष हा पवित्र महावृक्ष आहे. भगवान शिवाचे हे निवासस्थान मानले असून मानवी संसाराप्रमाणेच वटवृक्षाचा विस्तार सदोदित होत असतो. त्याचा पारंब्या पुन्हा पुन्हा मूळ धरताता आणि आपले अस्तित्व कायम ठेवतात म्हणून वटवृक्षाला संसारातील सौभाग्याचे पावित्र्याचे प्रतीक मानतात. […]
इडलीसारखा दाक्षिणात्य पदार्थ, महाराष्ट्राच्या उपराजधानीतील एखाद्या कुटुंबाला जीवनाची व जगण्याची उभारीच नव्हे, तर भरारीही देऊ शकतो, यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. मात्र, मनीषनगर येथील वैशाली जोशी पूर्वीच्या वैशाली गडकरी यांच्या इडलीला आज, अर्ध्या नागपूरच्या चवीची ओळख मिळाली. […]
अरुण कॉर्पोरेट ऑफीस मध्ये मोठ्या हुद्द्यावर असल्याने त्याचा पगार महिन्याला दोन लाखाच्या पुढे होता शिवाय कंपनीची गाडी आणि ड्रायव्हर. तरीही स्टेटस सिम्बॉल म्हणुन त्याने गरज नसताना स्वतः ची अलिशान फोर व्हीलर घेतली होती. बायको सुध्दा एका कॉर्पोरेट ऑफीस मध्ये तिलाही लाखभर रुपये पगार होता. शहरातल्या सर्वात मोठ्या कॉम्प्लेक्स मध्ये करोडो रुपयांचा प्रशस्त फ्लॅट. […]
अजूनही पुढे येणाऱ्या पिढ्यानपिढ्या टाटांच्या ‘मोती’ साबणाशिवाय भारतीय नागरिकाला दिवाळी साजरी झाल्यासारखी वाटणारच नाही.. हीच तर खरी ‘स्वदेशी’ची जादू आहे!!! […]
दिवाळी हा सण ५ उत्सवांचे स्नेह सम्मेलन आहे. धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, दिवाळी, नवीन वर्ष, भाऊबीज हे पाच उत्सव विभिन्न सांस्कृतिक विचारधारांना घेऊन साजरे केले जातात. जर हा सण आध्यात्मिक रहस्यांना समजून साजरा केला तर जीवनामध्ये एक वेगळे परिवर्तन आणू शकतो. […]
१९२० साली याच दिवशी नागपूरच्या कॉंग्रेस अधिवेशनात महात्मा गांधी यांनी स्वतंत्र भारताची आरोग्यपध्दती आयुर्वेद ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली होती पण बहुसंख्य आयुर्वेदप्रेमींनी दिवाळीतील ‘धनोत्रयोदशी’ या दिवसाचाच आग्रह धरल्यावर तो मंजूर करण्यात आला. […]
भगवान धन्वंतरींनी काय-बाल-ग्रह-उध्र्वाग-शल्य-दष्ट्रा-जरा-वृषान या आठ शाखा निर्माण केल्या. आज या आठ शाखांच्या उपशाखा होऊन अनेक डॉक्टर ‘पदव्या’ घेऊन समाजाचे आरोग्य राखत आहेत. […]
बाबा रिटायर व्हायच्या पूर्वीच गावातील आमच्या जुन्या घराचे नूतनीकरण केले होते. गावातील आमचे दुमजली घर एखाद्या वाड्या सारखेच मोठे होते. घरातील वरचा माळा लाकडाच्या फळ्यांनी आणि त्याच्यावर आणखीन एक पोटमाळा. घराचे छप्पर अजूनही कौलारु आहे. साठ पासष्ट वर्ष होऊनही आमच्या त्या घराच्या भिंतीत खिळा ठोकता येत नाही एवढे मजबूत बांधकाम आजोबांनी करून घेतले होते. […]